Tag Archives: maharashtra news in marathi

मुख्यमंत्री खरे की रश्मी ठाकरे खऱ्या आहेत याची स्पष्टता व्हायला पाहीजे – किरीट सोमय्या

किरीट सोमय्या कोर्लई गावात पोहचताच शिवसेना-भाजप कार्यकर्ते आले आमनेसामने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरेंच्या नावे कोर्लई गावात १९ बंगले नावावर असून या व्यवहारासंबंधी आरोप केल्यानंतर किरीट सोमय्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आरोप सिद्ध करण्याचं आवाहन दिल्यानंतर किरीट सोमय्या यांनी आज कोर्लई गाव गाठले. तर सोमय्या हे ग्रामपंचायत कार्यालयाजवळ पोहचताच शिवसेना कार्यकर्ते आक्रमक झाले आणि …

Read More »

“उगाच अंहकारामुळे हातचं घालवू नका,” आव्हाडांच्या सल्ल्यावर एकनाथ शिंदेंनी दिलं उत्तर, म्हणाले “शिवसेनेने कधीच…”

ठाणे महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने जितेंद्र आव्हाड आणि एकनाथ शिंदे यांच्यात शाब्दिक युद्ध ठाणे महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यात सध्या शाब्दिक युद्ध सुरु झालं आहे. ठाणे महापालिकेत राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्षाची सूत्रं दोन्ही नेत्यांची हाती असून त्यांच्यातील वादाचे परिणाम राज्यातील इतर जिल्हयांमध्ये उमटण्याची भीती आहे. ठाणे महापालिका निवडणुकीत आघाडी नकोच अशी ताठर …

Read More »

चंद्रपूर : वन्यप्राण्याने १६ वर्षीय मुलाला उचलून नेल्याने वन खात्यात खळबळ

चंद्रपूरात वाघाच्या हल्ल्यात एका कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच चंद्रपूर महाऔषणीक केंद्राच्या समोर असलेल्या दुर्गापूर नेरी येथे अल्पवयीन मुलाला वन्यप्राण्याने उचलून नेले. रात्री ११ वाजण्याच्या सुमारास भाडके या अल्पवयीन मुलाला वन्य प्राण्याने उचलून नेल्याने खळबळ उडाली आहे. हा मुलगा दुर्गापूर वॉर्ड नंबर १ मध्ये आदिवासी आश्रम शाळेच्या मागील परिसरात राहत होता. याच परिसरात ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. …

Read More »

उर्दू घरास मुस्कान खानचे नाव; मालेगाव महापालिकेत ठराव मंजूर

हिजाबप्रकरणी धैर्य दाखविणाऱ्या कर्नाटकातील मुस्कान खान या विद्यार्थिनीचे नाव एका उर्दू घरास देण्याचा सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने आणलेला ठराव गुरुवारी झालेल्या मालेगाव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला. महापौर ताहेरा शेख यांच्या अध्यक्षतेखाली आभासी पद्धतीने ही सभा पार पडली. परस्परविरोधी मतप्रवाहांमुळे आठवडाभरापासून नामकरणाचा विषय येथे चर्चेत होता. कर्नाटकातील शैक्षणिक संकुलांमध्ये हिजाब परिधान करण्यास विरोध करण्यावरून उद्भवलेल्या वादामुळे येथील मुस्लीम समाजात तीव्र …

Read More »

“…नाहीतर जिल्ह्यातून हद्दपार करू” म्हणत रायगडमध्ये शिवसेनेचा राष्ट्रवादी काँग्रेसला इशारा

शिवसेनेच्या रायगड जिल्हा कार्यकारणीची बैठक आज अलिबाग येथे पार पडली. “अडीच वर्षे खूप सहन केले आहे. आता मात्र पाणी डोक्यावरून जायला लागले आहे. शिवसेना आमदारांच्या कामांचे श्रेयही पालकमंत्री घेण्याचा प्रयत्न करत आहेत. आता मात्र हे सहन केले जाणार नाही.” असं सांगत, “कोणी पण द्या पण रायगड जिल्ह्याला शिवसेनेचा पालकमंत्री द्या.”, अशी मागणी शिवसेनेच्या रायगड जिल्हा कार्यकारणीने एकमुखाने केली आणि सत्तेत …

Read More »

आदित्य ठाकरेंची सोमय्या-राऊत आरोप-प्रत्यारोपांवर सूचक प्रतिक्रिया; म्हणाले, “राऊतांनी काल मॅच सुरू केली, आता…”!

संजय राऊतांनी किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांच्यावर शिवसेना भवनातील पत्रकार परिषदेत गंभीर आरोप केले आहेत. किरीट सोमय्या आणि संजय राऊत असा उभा राजकीय सामना सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात रंगताना पाहायला मिळत आहे. एकीकडे भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी संजय राऊत, राज्यातील महाविकास आघाडी सरकार आणि उद्धव ठाकरे कुटुंबीय यांच्यावर गंभीर आरोप केले असताना दुसरीकडे शिवसेना खासदार संजय …

Read More »

“संजय राऊतांना भीती वाटणं साहजिक आहे कारण…”; किरीट सोमय्या-संजय राऊत आरोप-प्रत्यारोप सुरूच!

आता उद्धव ठाकरेंचे १९ बंगले पायाखाली आले म्हणून आत्ता नोटीस पाठवली आहे, असंही सोमय्या म्हणाले. शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यात गेल्या काही दिवसांपासून आरोप प्रत्यारोपांचं सत्र सुरुच आहे. अशातच आता किरीट सोमय्या यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरीट सोमय्या यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्या सांताक्रुझमधील मालमत्तेची पाहणी केली होती. त्यामुळे …

Read More »

चंद्रपूर वीज केंद्र परिसरातून वाघाने कामगाराला उचलून नेले; रात्री उशिराच घटना

वीज केंद्राने याची माहिती वन खात्याला दिली होती. दरम्यान वन खात्याने बंदोबस्त करण्यापूर्वीच वाघाने कामगाराचा बळी घेतला. February 16, 2022 11:20:07 pm रात्री उशिराच घटना चंद्रपूर:चंद्रपूर वीज केंद्र परिसरातून रात्री 10.45 वाजताच्या सुमारास भोजराज मेश्राम या कामगाराला वाघाने उचलून नेले. त्यामुळे या परिसरात भीती व दहशतीचे वातावरण आहे. दोन दिवसापासून या भागात वाघ फिरत आहे. काल मंगळवारी रात्री या भागात …

Read More »

ही दोस्ती तुटायची नाय! सोलापुरात एकाचवेळी निघाली तीन मित्रांची अंत्ययात्रा; निरोप देण्यासाठी जमली हजारोंची गर्दी

मुंबई-पुणे हायवेवरील अपघातात मित्रांचा दुर्दैवी मृत्यू झाला सोलापुरातील तीन मित्रांचा अपघातात मृत्यू झाल्यानंतर त्यांना शेवटचा निरोप देण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली होती. मुंबई-पुणे हायवेवरील खोपोलीजवळ झालेल्या अपघातात या तरुणांनी आपला जीव गमावला. त्यांच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर शहरात शोककळा पसरली होती. दरम्यान त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली होती. मुंबई-पुणे महामार्गावर झालेल्या अपघातात गौरव खरात, सौरव तुळसे आणि सिद्धार्थ …

Read More »

ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचा ५७० कोटींचा ड्रीम प्रोजेक्ट चंद्रपुरात; राज्यातला पहिलाच फ्लोटिंग सोलर

चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रालगत इरई धरणाच्या पाणलोट क्षेत्रात १०५ मेगावॅट क्षमतेचा फ्लोटिंग सौर प्रकल्प व भद्रावती तालुक्यातील कचराळा व गुंजाळा येथे ५६९.६८ कोटी खर्च करून १४५ मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. येत्या एक ते दिड वर्षात हे दोन्ही प्रकल्प उभे राहणार आहेत. राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट असल्याचे सांगण्यात येत आहे. चंद्रपूर वीज केंद्रालगत इरई …

Read More »

मतिमंद मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला १२ वर्षे सक्तमजुरी; एक लाखाचा दंड

सार्वजनिक शौचालयात एका मतिमंद मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याबद्दल नरेश जनार्दन कोंडा (२१) याला जिल्हा व सत्र न्यायाधीश यू. एल. जोशी यांनी दोषी धरून १२ वर्षे सक्तमजुरी आणि एक लाख रूपये दंडाची शिक्षा सुनावली. आरोपी नरेश कोंडा याच्या घराजवळ राहणारी आणि त्याच्या ओळखीची असलेली पीडित मतिमंद मुलगी २० जानेवारी २०२१ रोजी घराजवळील सार्वजनिक शौचालयात शौचासाठी गेली होती. ती मंतिमंद असल्याचे माहीत …

Read More »

संजय राऊतांच्या पत्रकार परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया ; प्रवक्ते नवाब मलिक म्हणाले…

“…पण आता महाराष्ट्रात कोणी घाबरणार नाही ; पाच वर्षच काय २५ वर्ष हे सरकार चालणार” असंही मलिक यांनी सांगितलं आहे. राज्यभर चर्चेचा विषय ठरलेली खासदार संजय राऊत यांची पत्रकार परिषद अखेर आज दुपारी झाली. या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी अपेक्षेप्रमाणे भाजपा, केंद्रीय तपास यंत्रणांवर निशाणा साधला. शिवाय, शिवसेना कोणत्याही दबावाला झुकणार नाही, ठाकरे सरकार राज्यात कायम राहणार असल्याचे सांगितले. …

Read More »

भाजपाचे ‘ते’ साडेतीन लोक कोण? संजय राऊत म्हणतात, “कुणी अर्धा आहे, कुणी पाव आहे, कुणी चाराणेवाला…”!

“भाजपाचे साडेतीन लोक लवकरच अनिल देशमुखांच्याच कोठडीत असतील”, असं संजय राऊत म्हणाले होते. शिवसेना खासदार संजय राऊत हे जाहीर पत्रकार परिषदेतून भाजपाच्या साडेतीन लोकांचा भांडाफोड करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली होती. सोमवारी संजय राऊत यांनी “भाजपाचे साडेतीन लोक काही दिवसांत अनिल देशमुखांच्याच कोठडीत असतील”, असं देखील विधान केलं होतं. त्यामुळे आजच्या पत्रकार परिषदेमध्ये संजय राऊत या साडेतीन लोकांविषयी खुलासा …

Read More »

शिवजयंती निर्बंध: “शिवरायांच्या मावळ्याला माहितीय करोनासोबत कसं जगायचं, जीवाची काळजी कशी घ्यायची; या तीन पक्षांनी…”

“हिंदूचे सण किंवा उत्सव आले की महाराष्ट्रातील ठाकरे सरकार खडबडून जागं होतं, जाचक अटी घालतं करोनाच्या नावाखाली.” येत्या शनिवारी म्हणजेच १९ फेब्रुवारी रोजी शिवजंयीच्या निमित्ताने आयोजित करण्यात येणाऱ्या शिवज्योत दौडीत २०० जण आणि जन्मोत्सव सोहळ्याकरिता ५०० जणांना उपस्थित राहता येणार असल्याचं राज्य शासनाने सोमवारी जारी केलेल्या नियमांमध्ये म्हटलंय. यासंबंधीच्या गृह विभागाच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली आहे. मात्र …

Read More »

“केवळ हिंदूंना टार्गेट केलं जातंय असं म्हणणं…”; शिवजयंतीबद्दलच्या आक्षेपावर गृहमंत्री वळसे पाटलांची प्रतिक्रिया

शिवजयंतीच्या निमित्ताने आयोजित करण्यात येणाऱ्या शिवज्योत दौडीत २०० जण आणि जन्मोत्सव सोहळ्याकरिता ५०० जणांना उपस्थित राहता येणार आहे. आरोग्य नियमांचे पालन करून, सर्वांच्या आऱोग्याची आणि स्वच्छतेची काळजी घेत शिवजयंती साजरी करण्याचं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. तसंच या निमित्ताने होणाऱ्या शिवज्योत दौडीत २०० जण तर जन्मोत्सव सोहळ्यासाठी ५०० जणांना परवानगी देण्यात आली आहे. त्यावरून भाजपाने सरकारवर टीका केली …

Read More »

…तर धनंजय मुंडे आज जेलमध्ये असते; करुणा शर्मा यांचं मोठं विधान

करुणा शर्मा यांनी आता निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची घोषणा केली आहे. सोमवारी कोल्हापुरात बोलताना करुणा शर्मा यांनी आपला शिवशक्ती पक्ष आता कोल्हापूर उत्तर मतदार संघाची पोटनिवडणूक लढणवार असल्याचं जाहीर केलं. तसंच लोकसभा, विधानसभा ते नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पोटनिवडणुका अशा सर्व प्रकारच्या निवडणुकांमध्ये पक्षाचे उमेदवार असतील असंही त्यांनी यावेळी सांगितलं. अपेक्षित उमेदवार न मिळाल्यास स्वत: निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचं करुणा …

Read More »

“…त्याशिवाय राज्यात सत्ता बदलाची शक्यता नाही” ; हसन मुश्रीफ यांचं चंद्रकांत पाटील यांना प्रत्युत्तर!

“१० मार्चनंतर महाविकास आघाडीवर सत्ता सोडण्याची वेळ येईल” असं चंद्रकांत पाटील यांनी राजकीय भाकीत केलेलं आहे; जाणून घ्या मुश्रीफ नेमकं काय म्हणाले आहेत. “पाच राज्यांतील निकालानंतर महाराष्ट्रात सत्ता बदल होईल, असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. तथापि भाजपाकडे १४५ आमदारांचे संख्याबळ होत नाही तोपर्यंत सत्ताबदलाची शक्यता नाही. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षे सत्तेवर राहणार.” असे प्रत्युत्तर ग्रामविकास …

Read More »

Covid 19 : राज्यातील दैनंदिन करोनाबाधितांची संख्या आली दोन हजारांपेक्षा खाली ; रिकव्हरी रेट ९७.६६ टक्के

आज राज्यात ८ ओमायक्रॉन संसर्ग असणारे रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. राज्यातील करोना संसर्गाची तिसरी लाट आता ओसरली आहे. दररोज आढळणारी नवीन करोनाबाधितांची संख्या आता कमी झाली आहे. आज (सोमवार) दिवसभरात राज्यात १ हजार ९६६ नवीन करोनाबाधित आढळून आले आहेत. तर, राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९७.६६ टक्के एवढे झाले आहे. आज ११ हजार ४०८ रुग्ण बरे होऊन घरी …

Read More »

“ दापोलीतील ‘ते’ रिसॉर्ट ९० दिवसांत पाडण्याचे भारत सरकारचे आदेश ; महाराष्ट्र सरकारकडून फौजदारी कारवाईत गोंधळ ”

भाजपा नेते किरीट सोमय्या यांचा आरोप ; राज्य सरकार आणि मंत्री अनिल परब यांच्यावर केली आहे टीका भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी आज (सोमवार) पत्रकारपरिषद घेत दोपोलीमधील साई रिसॉर्टवरून मंत्री अनिल परब आणि राज्य सरकारवर टीका केली. तसेच, रिसॉर्ट बांधणाऱ्याविरोधात फौजदारी कारवाई करण्यासाठी राज्य सरकारकडून टाळाटाळ केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.पत्रकार परिषदेत बोलताना किरीट सोमय्या म्हणाले की, “भारत सरकारने …

Read More »

“महाविकास आघाडी सरकार पाडलं तरी…”; राष्ट्रवादीच्या नेत्याचं मोठं वक्तव्य

राज्यातील माहविकास आघाडी सरकारची सत्ता १० मार्चपर्यंत जाईल असं वक्तव्य करणारे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंनी उत्तर दिलं आहे. चंद्रकांत पाटील हे सत्तेतून बाहेर पडल्याने अस्वस्थ झाले असल्याने ते अशी टीका करत असल्याचा टोला खडसेंनी लगावलाय. इतकच नाही तर त्यांनी हे सरकार पडल्यास पुन्हा हेच सरकार येईल असंही म्हटलंय. चंद्रकांत पाटील नक्की काय म्हणाले होते?“राज्यातील सत्ताधारी …

Read More »