“आदित्यजी तुमची ‘दिशा’ चुकतीये…”; आदित्य ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्यावरून चित्रा वाघ यांचा टोला

अमृता फडणवीस आणि आदित्य ठाकरे यांच्यात सुरू असलेल्या शाब्दिक वादात आता चित्रा वाघ देखील आल्या आहेत.

अमृता फडणवीसांनी मुंबईतील तीन टक्के घटस्फोट हे इथल्या ट्रॅफिकच्या समस्येमुळे होत असल्याचं विधान केलं आणि त्यांच्या या विधानावरून जोरदार कलगीतुरा रंगू लागला आहे. मंत्री आदित्य ठाकरेंनी अमृता फडणवीसांच्या वक्तव्याला कॉमेडी म्हटलं तर आपण सर्वेक्षणातून समोर आलेली आकडेवारी सांगत असल्याचं अमृता फडणवीस म्हणाल्या. दरम्यान, आदित्य ठाकरेंनी अमृता फडणवीसांना टोला लगावल्यानंतर चित्रा वाघ यांनी ट्वीट करत आदित्य ठाकरेंना त्यांची ‘दिशा’ चुकत असल्याचं म्हटलंय.

“आदित्य’जी तुमची ‘दिशा’ चुकतीये.  अमृता फडणवीसांवर टिका करण्यापेक्षा तुमच्या पेंग्विनप्रेमामुळे चुराडा झालेल्या जनतेच्या पैशाचा हिशोब द्या. राठोड, राऊत, परब सारख्या पात्रामुळे शिवसेना‘हास्य जत्रा’बनलीये. कितीही वैयक्तिक हल्ले केले तरी आम्ही घाबरणार नाही..‘चला.. हवा येऊ द्या..’,” असं चित्रा वाघ यांनी म्हटलंय.

दरम्यान, चित्रा वाघ यांनी अप्रत्यक्षपणे दिशा पटानीचं नाव घेत आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे. तसेच संजय राठोड, संजय राऊत आणि अनिल परब यांच्यासारख्या नेत्यांमुळे शिवसेना हास्यजस्त्रा बनली आहे, असं म्हणत कितीही वैयक्तिक हल्ले केले तरी आम्ही घाबरणार नाही, असं म्हटलंय.

हेही वाचा :  कल्याणमध्ये ज्वेलर्सकडून १ कोटी ५६ लाखांचा गोल्ड स्कीम फ्रॉड; १८ टक्के परताव्याचं आमिष दाखवून फसवणूक

“छोटे राजा साहेब, यापेक्षा मोठी कॉमेडी…;” आदित्य ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्याला अमृता फडणवीसांचं प्रत्युत्तर

काय म्हणाल्या होत्या अमृता फडणवीस –

“मी एक सामन्य नागरिक म्हणून बोलत आहे. मी बाहेर निघते तेव्हा मला किती वाहतूक कोंडी होते हे दिसतं, खड्ड्यांनी आम्हाला किती त्रास होतो हे दिसतं. मुंबईत वाहतूक कोडींमुळे घटस्फोट होण्याचं प्रमाण तीन टक्के आहे. कारण आपण आपल्या कुटुंबाला वेळ देऊ शकत नाही”, असं त्या म्हणाल्या होत्या. मात्र नंतर, “सर्वे मंकीच्या सर्वेक्षणातील निरीक्षणांवरूनच मी हे विधान केलं”, असा खुलासा अमृता फडणवीस यांनी केला होता.

अमृता फडणवीसांच्या ‘ट्रॅफिकमुळे घटस्फोट’ विधानावर आदित्य ठाकरेंचा टोला; म्हणाले, “आपण कॉमेडी…”!

आदित्य ठाकरेंचा टोला –

ट्रॅफिकमुळे घटस्फोट होत असल्याच्या अमृता फडणवीसांच्या विधानावर आदित्य ठाकरेंनी खोचक निशाणा साधला. या विधानाविषयी विचारणा केली असता “मला वाटतं कॉमेडी आपण टीव्हीसाठी ठेवू. राजकीय मंडळी म्हणून आपण जे समाजकारण करत असतो, तेच आपण करत राहू”, असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. याआधी शिवसेनेकडून मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी देखील अमृता फडणवीस यांच्या या विधानावर टीका करताना “त्यांच्या या विधानावर हसावं की रडावं हेच कळत नाही”, असं म्हटलं होतं.

हेही वाचा :  ठाण्यातून सुरु होणार ओबीसी जनजागरण अभियान

Loksatta Telegram

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

“मराठी कलाकार स्वत: सेटवर हिंदीत बोलतात”, अजय-अतुलच्या जोडीतील अतुलने केली तक्रार

मराठी राजभाषा दिनाच्या निमित्तानं दिलेल्या मुलाखतती अतुलने ही तक्रार केली आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि …

Russia – Ukraine War : ठाणे जिल्ह्यातील ३१ विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले

हे सर्व विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी युक्रेनमध्ये गेलेले आहेत. ठाणे जिल्ह्यातील विविध शहरांमधील ३१ विद्यार्थी …