Tag Archives: Maharashtra

Akola News : मुलांची काळजी घ्या! कुलरचा शॉक लागून 7 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

जयेश जगड, झी मीडिया, अकोला (Akola News in Marathi) : विदर्भ, मराठवाड्यासह राज्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढतोय. अशात गरमपासून वाचण्यासाठी घरोघरी कूलर लावण्यात येतात. विदर्भात उन्हाचा पारा 44 अंशावर पोहचला असून उन्हामुळे नागरिकांच्या जीवाची लाहीलाही होतेय. अशात उन्हापासून दिलासा म्हणून विदर्भात कुलरचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येतो. मात्र अकोल्यात कुलरचा वापर एका 7 वर्षीय चिमुकलीच्या जीवावर बेतला आहे. कुलरचा शॉक लागून एका 7 वर्षीय …

Read More »

‘मुंबईत गिरगावमध्ये नोकरीची संधी पण मराठी उमेदवार नको’; महिला HR ची संतापजनक पोस्ट

HR LinkedIn Post Related to Marathi People : सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे, ज्यात एका कंपनीच्या HR नं लिंक्डइनवर केलेल्या एका पोस्टमुळे वाद सुरु झाला आहे. ही HR गुजरातची एक फ्रीलांस रिक्रुटर आहे. ती सध्या मुंबईतील एका कंपनीसाठी असलेल्या एका ग्राफिक डिझायनरच्या रिक्त पदासाठी योग्य उमेदवारच्या शोधात आहे. पण हे सगळं सांगत असताना तिनं अशी एक गोष्ट …

Read More »

‘मोदींची कौटुंबिक पार्श्वभूमी…’; ‘पवारांना कुटुंब संभाळता आलं नाही’वर पवार स्पष्टच बोलले

Sharad Pawar On PM Modi Comment About His Family: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रवादीचे संस्थाप शरद पवारांवर त्यांच्या कुटुंबाचा उल्लेख करत केलेल्या टीकेवर शरद पवारांनी प्रतिक्रिया नोंदवली आहे. पंतप्रधान मोदींनी एका मुलाखतीमध्ये पवार कुटुंबाचा उल्लेख करत शरद पवारांना त्यांचं कुटुंब संभाळता आलं नाही ते महाराष्ट्र काय संभाळणार अशी टीका केली होती. त्यावरुनच शरद पवारांनी आता उत्तर दिलं आहे. मोदींनी तरी स्वत:चं कुटुंब …

Read More »

‘कुटुंब संभाळता आलं नाही ते..’ मोदींचा टोला; पवारांचा नातू म्हणाला, ‘कुटुंब सांभाळण्याची गोष्ट आपल्या तोंडून..’

Modi Slams Sharad Pawar Rohit Pawar Reply: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांचा उल्लेख पुण्यातील सभेमध्ये ‘भटकती आत्मा’ असा केल्यानंतर या प्रकरणावरुन नवीन वाद निर्माण झालेला असतानाच आता एका मुलाखतीत पंतप्रधानांनी पुन्हा एकदा पवारांवर निशाणा साधला आहे. शरद पवारांच्या कारकिर्दीसंदर्भात बोलतना पंतप्रधांनी शरद पवारांना कुटुंब संभाळता येत नाही तर ते महाराष्ट्र काय संभाळणार? असा सवाल उपस्थित करत टोला …

Read More »

Big News : राज्याच्या धान्य कोठारात तब्बल 541 कोटी रुपयांचं धान्य खराब होण्याच्या मार्गावर; काय आहे यामागचं कारण?

प्रवीण तांडेकर, झी मीडिया, गोंदिया: राज्यातच नव्हे तर, सध्या संपूर्ण देशामध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना आता महाराष्ट्रातील धान्याचं कोठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोंदिया जिल्ह्यात मात्र वेगळं चित्र पाहायला मिळत आहे. गोंदिया जिल्ह्यातील राईस मिलर्स संघटनेच्या वतीनं विविध मागण्यां पूर्ण होईपर्यंत धान्य भरडाई बंद केली आहे. (Maharashtra News) गेल्या सहा महिन्यांपासून खरीप हंगामादरम्यान खरेदी केलेलं 24 लक्ष 77 हजार 996 क्विंटल …

Read More »

राज ठाकरेंचं अथर्व सुदामेबरोबर कोलॅब! व्हायरल Reel पाहिलात का? दिला महत्त्वाचा संदेश

Maharashtra Din Atharva Sudame Raj Thackeray Reel: महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी आज मुंबईतील हुतात्मा चौकातील स्मारकाला पुष्पचक्र वाहून संयुक्त महाराष्ट्रासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या 107 हुतात्म्यांना आदरांजली अर्पण केली. मात्र केवळ इतक्यावरच न थांबता राज ठाकरेंनी प्रसिद्ध रिलस्टार अर्थव सुदामेच्या सोबतीने मराठी तरुण-तरुणींना एक मोलाचा संदेश महाराष्ट्र दिनानिमित्त त्यांच्याच आवडत्या माध्यमातून म्हणजेच रिलमधून दिला आहे. काय आहे या …

Read More »

Recipe: झणझणीत गावरान मिरचीचा खर्डा; 3 पद्धतीने बनवा अस्सल महाराष्ट्रीय ठेचा

Maharashtra Din Recipe: हिरव्या मिरचीचा ठेचा किंवा खर्डा म्हटलं तरी तोंडाला पाणी सुटते. महाराष्ट्राची रेसिपी असलेली हा खर्डा आता देशभरात चांगलाच लोकप्रिय झाला आहे. आता अनेक हॉटेलांत मिरचीचा ठेचा बनतो. मात्र अस्सल गावरान चव मात्र त्याला येत नाही. गरमा गरम भाकरी आणि झणझणीत ठेचा व जोडीचा कांदा या जेवणाने मराठी माणूसाचे मन आणि पोटही तृप्त होते. झणझणीत ठेचा कसा बनवायचा …

Read More »

‘मोदी सरकारच्या महाराष्ट्र द्वेषाची यादी न संपणारी’; ठाकरे गट म्हणतो, ‘गुजरातला वेगळा..’

Onion Export Issue Gujrat-Maharashtra: कांदा निर्यातीच्या मुद्द्यावरुन ठाकरे गटाने केंद्रामध्ये सत्तेत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारवर निशाणा साधला आहे. “केंद्रातील मोदी सरकारला अखेर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांपुढे झुकावेच लागले. महाराष्ट्राची कांदा निर्यातबंदी उठविणे भाग पडले आहे. त्यावरून सत्तापक्ष स्वतःच स्वतःची पाठ थोपटून घेत आहे. मोदी यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना ‘गिफ्ट’ दिले, अशा पिपाण्या वाजवीत आहे. मात्र हे गिफ्ट वगैरे काही नाही. महाराष्ट्रातील …

Read More »

‘मोदी-शहांचे नाव घेतले तरी महाराष्ट्रात लोक चिडतात’, राऊतांचा हल्लाबोल; म्हणाले, ‘केलेल्या पापकर्मांची..’

Sanjay Raut On PM Modi Amit Shah: “लोकसभेचा दुसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला व नरेंद्र मोदींकडील प्रचाराचे सर्व मुद्देही संपले. त्यामुळे देशातील महिलांच्या मंगळसूत्रांचे काय होणार? हा प्रश्न त्यांनी निर्माण केला. मोदींचा हा प्रचार म्हणजे ढोंग आणि फसवेगिरी आहे. मोदी यांनी आतापर्यंत कधीच मंगळसूत्र या पवित्र बंधनाचा स्वीकार आणि सन्मान केला नाही, मात्र आता तेच मोदी निवडणुका जिंकण्यासाठी मंगळसूत्रावर प्रवचने देताना …

Read More »

Maharashtra Weather : पुढचे 3 दिवस जाणवेल उन्हाचा तडाखा, कशी असेल मुंबईत परिस्थिती

देशाच्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये उन्हाचा तडाखा चांगलाच जाणवत आहे. महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये पाऊस, तर काही जिल्ह्यांमध्ये उष्माघात अशी परिस्थिती आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढचे काही दिवस भरपूर ऊन्हाचा तडाखा झेलावा लागणार आहे. नागरीकांना स्वतःची काळजी घेण्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊसाची शक्यता देखील वर्तवली आहे.  …

Read More »

महाराष्ट्रातील ‘या’ गावात सापडली आदिमानवांची 25 हजारवर्षांपूर्वीची अवजारं; अश्मयुगातील अनेक रहस्य उलगडणार

आशीष अम्बाडे, झी मीडिया, चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील भोयेगाव जवळ अश्मयुगीन अवजारे सापडली आहेत.  मध्यपाषाण युगातील आदिमानवांची ही अवजारं भूशास्त्र आणि पर्यावरण अभ्यासक सुरेश चोपणे यांनी शोधून काढली आहेत. आर्कीयन काळातील रुपांतरीत खडकापासून बनलेली असून त्यात अर्ध मौल्यवान समजल्या जाणाऱ्या जास्पर ,अगेट, क्वार्ट्झ या खडकांचा समावेश आहे. वर्धा नदीच्या किनारी असलेल्या जंगलात सापडले अवशेष चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील वर्धा नदीच्या …

Read More »

महारेराचा बिल्डर लॉबीला दणका; पार्किंचा वाद टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

MAHARERA: बिल्डिंगमध्ये अपुऱ्या जागेच्या अभावी पार्किंग करण्यास अडचणी येतात. हल्ली काही बिल्डर घर खरेदी केल्यानंतरच सोबतच पार्किंगही विकत घेतात. मात्र तरीही पार्किंगवरुन होणारे वाद कायम आहेत. या वाद-विवादावर  महाराष्ट्र स्थावर संपदा प्राधिकरण (महारेरा)ने मोठे पाऊल उचलले आहे. य बिल्डरने यापुढे करारनाम्यात पार्किंगबाबत संपूर्ण तपशील देणे बंधनकारक आसणार आहे. महारेराने अलीकडेच हे नियम बंधनकारक केले आहेत. पार्किंग स्पेसची विक्री करत असतानाच …

Read More »

किती तापमानावर Heat Wave चा इशारा दिला जातो; ग्रीन, यलो अलर्टचा नेमका अर्थ काय?

Maharashtra Heat Wave:  राज्यात तापमानाने चाळिशी पार केली आहे. अनेक जिल्ह्यात उन-पावसाचा खेळ सुरू आहे. हवामान विभागाने उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. उन्हाच्या काहिल्यामुळं नागरिक हैराण झाले आहेत. मुंबईचा ही पारा एप्रिलच्या मध्यातच 35 अंशाच्या वर पारा गेला आहे. त्यामुळे अंगाची काहिली होत आहे.मुंबईत आद्रता वाढत असल्याने घामाच्या धारा वाहत आहेत तर राज्यात अनेक ठिकाणी उष्णतेच्या झळा जाणवत आहेत. …

Read More »

पाऊस, परभणी अन् प्रचार… पाऊसधारा अंगावर झेलत उद्धव ठाकरेंकडून भाजपचं खोचक नामकरण

Uddhav thackeray parbhani ralley video : पाऊस आणि प्रचारसभा यांचं समीकरण कायमच चर्चेचा विषय ठरतं. यावेळी हाच पाऊस उद्धव ठाकरे यांच्या परभणीतील सभेसाठी हजेरी लावताना दिसला आणि या सभेतील अनेक व्हिडीओ आणि फोटोंनी पाहता पाहता सोशल मीडियावर गर्दी केली. लोकसभा निवडणुकीच्या धर्तीवर (Loksabha Election 2024) परभणी मतदारसंघातील महाविकासआघाडीच्या वतीनं निवडणुकीच्या रिंगणात असणाऱ्या संजय जाधव (Parbhani Sanjay Jadhav) यांच्या प्रचारासाठी उद्घव …

Read More »

महाराष्ट्रातील एकमेव गाव जिथे हनुमानाची पूजा करत नाहीत; ‘मारूती’ नावाची गाडीही कुणी घेत नाही

लैलेश बारगजे, झी मिडिया, अहमदनगर : देशभरात हनुमानाचे लाखो भक्त आहेत. महाराष्ट्रात एक असे जाव जिथे हनुमानाची पूजा करत नाहीत. इतकचं काय तर  ‘मारूती’ची नावाची  गाडीही कुणी घेत नाही.  अहमदनगरमधील पाथर्डी तालुक्यातील दैत्यनांदूर गाव असं आहे. जिथं हनुमानाच मंदिर नाही तर दैत्यमहाराजांचे मंदिर असून वर्षभर दैत्यांची पूजा अर्चा करून मनोभावे भक्ती गावकऱ्यांकडून होते.  पोथी पुराना उल्लेख असल्याप्रमाणे, निंबादैत्य व हनुमंत …

Read More »

Weather Update: राज्यात पुढील 3-4 दिवसांत तापमानात होणार वाढ; हवामान विभागाचा इशारा

Weather Update : मार्च महिना सुरू झाला असून, थंडी कमी होऊन उकाडा जाणवू लागलाय. अशा स्थितीत अपेक्षेच्या विरुद्ध मुंबईच्या किमान तापमानात गेल्या काही दिवसांत घट झाली आहे. आता थंडी हळूहळू गायब होताना दिसत असून राज्यात येणाऱ्या काही दिवसांमध्ये राज्यातील तापमानात वाढ होताना दिसणार आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, पुढील 3-4 दिवसांत महाराष्ट्रात किमान आणि कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.  हवामान …

Read More »

महाराष्ट्रच नाही तर देशातील एकमेव उभा नंदी; रायगड जिल्ह्यातील अनोखे शिव मंदिर

Shiva Temple In Raigad : नंदीचे दर्शन घेवून शिव मंदिरात दर्शनासाठी जावे लागते. सर्व शिव मंदिराबाहेर नंदीची मूर्ती दिसतेच.  रायगड जिल्ह्यात अनोखे शिव मंदिर आहे जिथे बसलेला नव्हे तर उभा नंदी आढळतो. महाराष्ट्रच नाही तर देशातील एकमेव  मंदिर आहे जिथे उभा नंदी आहे. महाशिवरात्री निमित्ताने या मंदिरात भाविकांची गर्दी पहायला मिळाली.  देशभरात महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असताना ग्रामीण …

Read More »

महिला धोरण जाहीर! ‘या’ महिलांना मासिक पाळीच्या दिवसांत मिळणार भरपगारी सुट्टी

Maharashtra Women’s Policy 2024: जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून आज राज्याचं महिला धोरण जाहीर करण्यात आलं आहे. आजच्या महिला दिनानिमित्त एक दिवस आधीच हे धोरण जाहीर करण्यात आलं आहे. या धोरणामध्ये महिलांना विशेष सूट देण्यापासून ते मासिक पाळीमध्ये सुट्टी देण्यापर्यंत अनेक गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी राज्यस्तरावर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या समिती तसचे महिला …

Read More »

हाच का पुरोगामी महाराष्ट्र? मुरबाडमध्ये 75 वर्षांच्या वृद्धाला आगीवर नाचवलं, कारण काय तर..

चंद्रशेखर भुयार, झी मीडिया, उल्हासनगर : पुरोगामी महाराष्ट्रात आजही अंधश्रद्धा, जादूटोणासारख्या गोष्टींवर विश्वास ठेवला जातो. याचं एक ज्वलंत उदाहरण ठाणे जिल्ह्यातील मुरबाडमध्ये समोर आलं आहे. जादूटोणा करत असल्याच्या संशयातून 75 वर्षांच्या एका वृद्धाला पेटत्या आगीवर नाचवण्यात आलं. महाराष्ट्रात जादूटोणा विरोधी कायदा (Witchcraft) अस्तित्वात आला तरी देखील या कायद्याला धाब्यावर बसवून दिवसाढवळ्या करणी, जादूटोणा आणि भानामतीचे प्रकार असताना उघड होत आहेत. …

Read More »

Loksabha Election 2024 : अमित शाह सोडवणार महायुतीतील जागावाटपाचा तिढा? गृहमंत्र्यांच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष

Loksabha Election 2024 :  लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील पक्षांमध्ये जागावाटपावरुन खलबत सुरु आहे. त्यात महायुतीमध्ये शिवसेनेने 22 आणि राष्ट्रवादीने 16 जागांची मागणी केल्याने भाजपची डोकेदुखी वाढलंय. आता हा तिढा केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह सोडवणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. अमति शाह मंगळवार आणि बुधवारी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून (Amit Shah Maharashtra tour) ते मुंबईत (Mumbai News) बैठक घेणार …

Read More »