आम्ही रोमॅंटिक डेटवर गेलो, रात्रंदिवस चॅटिंग केली, सुखी संसाराची स्वप्न रंगवली अन् एके दिवशी अचानक भयानक

प्रश्न : मी 26 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. माझा स्वभाव खूप इमोशनल आहे. मी प्रॅक्टिकल होण्याचा प्रयत्न करत असले तरी विनोदी चित्रपट पाहताना सुद्धा मला अश्रू अनावर होतात. मला लोकांच्या संपर्कात जास्त काळ राहता येत नाही याचे हे देखील एक कारण आहे. खरं तर, काही दिवसांपूर्वी मला एक मुलगा भेटला. पहिल्या भेटीनंतर आम्ही एकमेकांना डेट करायला सुरूवात केली. मला तो आवडू लागला होता. पण दुर्दैवाने हे नातं सुरू करण्याआधी जसं वाटलं होतं तसं आमच्यामध्ये काहीच घडलं नाही. अशा परिस्थितीत आम्ही दोघांनी आमच्यातील संबंध संपवण्याचा निर्णय घेतला.

जरी, मी त्याच्या प्रेमात खूप जास्त गुंतले नसले तरी त्याच्यापासून दूर झाल्यावर मला खूप वाईट वाटू लागले. माझे कशातच मन लागेना. मी या आधी जेव्हा रिलेशनशिपमध्ये होते तेव्हाही माझ्या बाबतीत असेच घडले होते. खरे सांगायचे तर मला आजवर आलेला प्रेमाचा अनुभव खूप वाईट आहे. मी खूप लवकर भावनाविवश होते. जेव्हा गोष्टी माझ्या मनाप्रमाणे होत नाहीत तेव्हा मला खूप वाईट वाटते. माझ्या या भावनिक स्वभावावर नियंत्रण कसे ठेवावे हेच मला समजत नाहीये. (गोपनीयतेच्या कारणामुळे आम्ही व्यक्तीची ओळख उघड करत नाही.)

एक्सपर्ट्सचे उत्तर

एक्सपर्ट्सचे उत्तर

मुंबईतील रिलेशनशिप कौन्सिलर रचना अवत्रामणी म्हणतात की, भावनिक असणे ही पूर्णपणे एक मानसिक स्थिती आहे, जी भावना आणि व्यवहाराशी निगडीत आहे. तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुम्ही लोकांशी भावनिकदृष्ट्या खूप लवकर जोडल्या जाता, हा गुण तुमच्या आईकडून तुमच्यात आला आहे. मला मान्य आहे की आजूबाजूच्या लोकांशी भावनिकरित्या कनेक्ट असणे आव्हानात्मक असू शकते, परंतु त्यात काहीही चुकीचे नाही. तथापि, या प्रकारचा स्वभाव असलेल्या लोकांना अनेकदा निराशेचा सामना करावा लागतो. पण याचा दोष स्वत:ला देणे योग्य नाही.

हेही वाचा :  WhatsApp Tips: आता एकाच स्मार्टफोनमध्ये चालवू शकता दोन व्हॉट्सॲप अकाऊंट, फक्त या सोप्या स्टेप्स करा फॉलो

(वाचा :- मी सप्तपदी चालत होती व बॉयफ्रेंड रडत कोप-यात उभा होता, याच हळव्या झालेल्या मुलाने पुढे जे केलं ते ऐकून हादराल)​

वाईट वाटणे साहजिक आहे

वाईट वाटणे साहजिक आहे

तुम्ही सांगितले की तुम्ही जास्तीत जास्त प्रॅक्टिकल होण्याचा प्रयत्न करता पण तुम्हाला ते जमत नाही आणि तुमचा भावनिक स्वभावच नेहमी समोर येतो. तुम्ही अशा व्यक्तीच्या प्रेमात पडला आहात ज्याला तुम्ही फक्त काही वेळा भेटलात आणि त्यानंतर तुम्हाला कळले की हे नाते जास्त काळ टिकणार नाही. यामुळे वाईट वाटणे साहजिक आहे. पण याचा दोष तुम्ही स्वत:ला देत असाल तर मी तुम्हाला एवढचं सांगेन कीही गोष्ट पूर्णपणे सामान्य आहे. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला तुमचा भावनिक स्वभाव बदलावा लागेल, तर तुम्हाला स्वतःमध्ये काही बदल करावे लागतील.

(वाचा :- मलायका अरोराचा समस्त पुरूष जातीला प्रेमळ सल्ला, अरबाजसोबत 19 वर्षांचा संसार तोडल्यानंतर हळवी होत म्हणाली की..!)​

असा ठेवा कंट्रोल

असा ठेवा कंट्रोल

तुम्हाला या समस्येतून बाहेर पडायचे असेल तर आधी तुम्ही भावनिकदृष्ट्या संवेदनशील आहात हे स्वीकारा. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला ही स्थिती बदलण्यासाठी खूप काम करावे लागेल. शक्य असल्यास तुम्ही सेल्फ डेवलपमेंट वर्कशॉप और इमोशनल इंटेलिजेंस सेशन्समध्ये सहभागी होऊ शकता. अशा कार्यक्रमांमधून तुम्हाला खूप महत्त्वाच्या गोष्टी शिकायला मिळतील. यामुळे केवळ तुमचे व्यक्तिमत्त्वच मजबूत होणार नाही तर भावनिकदृष्ट्या तुम्ही स्वत:वर खूप कंट्रोल करायला शिकाल.

हेही वाचा :  बॉयफ्रेंडला लागले दुसऱ्या बाईचे वेड, क्षणार्धात झालं होत्याचं नव्हतं!

(वाचा :- Sleep Divorce: घटस्फोट घेण्याचा काळ गेला आताचे कपल्स घेतात थेट स्लीप डिवोर्स, संकल्पना ऐकून हलेल डोक्याची नस.!)​

ब्रेकअपनंतर काय करावे?

ब्रेकअपनंतर काय करावे?

माणूस जेव्हा प्रेमात असतो तेव्हा त्याला इतर जगाशी काहीही पडलेली नसते. त्या व्यक्तीसाठी आपला जोडीदारच सर्वस्व असतो. यामुळे कुटुंबातील रक्ताचे लोक, मित्र मैत्रिणी यांच्याशी संबंध तुटतो आणि त्यांच्याशी असलेले नाते काहीसे दुरावले जाते. प्रेमात असलेल्या माणसाला तुम्ही या गोष्टी कितीही समजावून सांगितल्या तरी तो ऐकणार नाही. पण जेव्हा ब्रेकअप होते आणि मानसिक आधार द्यायला हीच सगळी लोकं मदत करतात तेव्हा त्या व्यक्तीला आपली चूक कळते आणि ती व्यक्ती आपल्या कुटुंबाला आणि मित्र मैत्रिणींना जास्त प्राधान्य देते. त्यांच्या सोबत राहून तिला आनंद सुद्धा मिळतो.

(वाचा :- मी बहिणीच्या लग्नात अप्सरेसारखी सजून पोहचली अन् समोर बघते तर काय..! ज्यामुळे आम्हा दोघींचं आयुष्य झालं बेचिराख)​

करियरवर फोकस करा

करियरवर फोकस करा

ब्रेकअप नंतरचा सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे ती व्यक्ती करियरवर फोकस करू लागते. प्रेमाच्या नादात आपलं आपल्या करियरकडे झालेलं दुर्लक्ष पाहून त्या व्यक्तीला पश्चाताप होतो आणि प्रेम वगैरे सगळं खोटं असतं हा समज मनात घेऊन ती व्यक्ती आपल्या करियरवर लक्ष केंद्रित करते. या दरम्यान ती व्यक्ती नवीन व्यक्तींना सुद्धा आपल्या आयुष्यात येऊ देत नाही. तर मंडळी, अशाप्रकारे ब्रेकअपचे विविध साईड इफेक्ट्स दिसू लागतात आणि व्यक्तीच्या आयुष्यात बदल घडतो.

हेही वाचा :  कपिल शर्मा का वळलाय या मार्गाला,जगाला हसवणारा व्यक्तीच का आणतोय बायकोच्या डोळ्यांत पाणी

(वाचा :- जमिनीवर नको त्या अवस्थेत पडलेल्या पतीला बघून मी घाबरले व अ‍ॅम्ब्युलन्स बोलावली,नंतर जे सत्य समजलं ते हादरवणारं)​

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पाणीटंचाईमुळे गावातील तरुणांचं लग्न थांबलं, वर्ध्याच्या 8 गावांची 60 वर्षांपासून पाण्यासाठी लढाई

Wardha Drought 8 village : उन्हाळा लागला की पाणी समस्या सगळीकडे बिकट होताना बघायला मिळते. …

मतदान करायचंय पण आधार, पॅनकार्ड सापडत नाही? तब्बल 12 ओळखपत्रांना आहे मान्यता

ECI Lists Out 12 Identity Proofs : राज्यात लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील दोन टप्प्यातील …