Tag Archives: mumbai news

Disha Salian Case: स्वत: कार चालवत नितेश राणे वडिलांसहीत चौकशीसाठी पोलीस स्थानकात पोहचले; Tweet करत म्हणाले…

दिशा सतीश सालियन मृत्यू प्रकरणात वादग्रस्त विधान केल्यामुळे दाखल झालेल्या गुन्ह्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे आमदार पुत्र नितेश राणे यांनी आज मालवणी पोलीस स्थानकामध्ये चौकशीसाठी हजेरी लावली. दुपारी १२ च्या सुमारास नारायण राणे आणि नितेश राणे चौकशीसाठी मालवणी पोलीस स्थानकामध्ये दाखल झाले. विशेष म्हणजे राणेंचा ताफा जेव्हा पोलीस स्थानकामध्ये दाखल झाला तेव्हा यावेळी नितेश राणे हे स्वत: गाडी …

Read More »

मध्य रेल्वेवर रविवारी आठ तासांचा मेगाब्लॉक

मुंबई : विविध तांत्रिक कामांसाठी मध्य रेल्वेच्या दिवा ते कल्याण दरम्यानच्या दोन्ही धीम्या मार्गावर येत्या रविवारी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत आठ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे लोकल फेऱ्यांच्या वेळापत्रकावरही काहीसा परिणाम होईल. ठाणे येथून कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या धीम्या आणि अर्ध जलद लोकल ब्लॉकच्या वेळी दिवा ते कल्याण दरम्यान जलद मार्गावर चालवण्यात येणार आहेत. तर कल्याणहून ठाण्याच्या …

Read More »

Russias attack on Ukraine : “बॉम्ब हल्ले होत असताना जिवंत परतण्याची शाश्वती नव्हती” ; वसईच्या ऐश्वर्याचा थरारक अनुभव

आम्ही बंकर मध्ये लपायचो. कधी काय होईल सांगता येत नव्हतं, असंही सांगितलं आहे. “शहरात बॉम्ब हल्ले होत असताना आम्ही बंकर मध्ये लपायचो. कधी काय होईल सांगता येत नव्हतं. सुखरूप परतायची आशा नव्हती, पण सुदैवाने मी माझ्या घरी पोहोचली. अशा शब्दात युक्रेन मधून सुखरूप परतलेल्या वसईच्या ऐश्वर्या राठोड या तरुणीने युक्रेनमधील थरारक अनुभव सांगितले. वसईच्या वसंत नगरी येथे राहणारी ऐश्वर्या राठोड …

Read More »

संजय राऊत भेटीदरम्यान काय म्हणाले? कप्तान मलिक म्हणतात, “त्यांनी सांगितलं की घाबरुन…”

सकाळी दहाच्या सुमारास संजय राऊत नवाब मलिक यांच्या कुर्ला येथील निवासस्थानी कुटुंबियांची भेट घेण्यासाठी पोहोचले. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या कुटुंबियांची शिवसेना खासदार संजय राऊत यांनी घरी जाऊन भेट घेतली. मलिक यांना २३ फेब्रुवारी २०२२ सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अटक केली आहे. त्यानंतर कालच मलिक यांची ईडीची कोठडी सात तारखेपर्यंत वाढवण्यात आली. याच पार्श्वभूमीवर …

Read More »

“आम्ही कुणाच्या दबावाला भीक घालत नाही”; विरोधी पक्षनेत्यांना अजित पवारांचं प्रत्युत्तर

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भात राज्य मागासवर्ग आयोगाकडून सादर करण्यात आलेला अंतरिम अहवाल नाकारल्यानंतर या मुद्द्यावरून वाद सुरू झाला आहे. त्यावरून विधानपरिषदेत बोलताना विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी राज्य सरकारवर टीका केली. ओबीसी आरक्षणासंदर्भात सरकारवर कोणाचा दबाव आहे का याची माहिती मिळायला हवी असे प्रविण दरेकर यांनी म्हटले. त्यानंतर उपमुख्यमंत्री …

Read More »

maharashtra budget session 2022 : सरकार-राज्यपाल संघर्षांचा नवा अंक ; दोन मिनिटांत अभिभाषण आटोपले

महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यातील संघर्षांचा नवा अंक गुरुवारी पाहायला मिळाला़  विरोधक आणि सत्ताधाऱ्यांच्या घोषणांच्या गोंधळात राज्यपालांनी अवघ्या दोन मिनिटांत विधिमंडळातील अभिभाषण आटोपले आणि राष्ट्रगीत सुरू होण्यापूर्वीच ते सभागृहातून तडक निघून गेले. राज्यपालांच्या या कृतीचा राज्य मंत्रिमंडळाने निषेध करून नापसंती व्यक्त करणारे पत्र राष्ट्रपतींना पाठविण्याचा निर्णय घेतला. त्यातच राज्यपालांनी सहकार कायद्यात बदल करणारे विधेयक परत पाठवल्याने हा …

Read More »

Maharashtra Budget Session 2022 : सहकार कायद्यातील बदलाचे विधेयक राज्यपालांकडून परत

मुंबई : सहकार कायद्यात बदल करण्यासाठी हिवाळी अधिवेशनात मंजूर करण्यात आलेल्या विधेयकातील संस्थांना अभय देण्याच्या विशेषाधिकाराच्या तरतुदीला आक्षेप घेत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी हे विधेयक फेरविचारार्थ परत पाठवल़े  त्यामुळे महाविकास आघाडी सरकारला मोठा धक्का बसला आह़े केंद्र सरकारने केलेल्या ९७ व्या घटनादुरुस्तीच्या अनुषंगाने राज्य सरकारने २०१३ मध्ये सहकार कायद्याच्या विविध कलमांत सुधारणा केल्या होत्या. मात्र, काही महिन्यांपूर्वी या घटनादुरुस्तीतील काही …

Read More »

युक्रेनच्या वैद्यकीय अभ्यासक्रमांचा भूलभुलैया ; २० ते ३० टक्केच विद्यार्थी भारतात काम करण्यास पात्र

युक्रेन, रशिया युद्धस्थितीत अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांमुळे देशातील वैद्यकीय शिक्षणाची परिस्थिती, युक्रेनचे स्थान अशा मुद्दय़ांचा ऊहापोह सुरू झाला आहे. भारतातून युक्रेनला जाणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी बहुतेक विद्यार्थी हे वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेणारे आहेत. मात्र, अभ्यासक्रम पूर्ण करून भारतात काम करण्यासाठी पात्र ठरणाऱ्या डॉक्टरांचे प्रमाण हे जेमतेम वीस ते तीस टक्के असल्याचे दिसते आहे. तेथील काही विद्यापीठांमध्ये वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांपैकी एकही विद्यार्थी …

Read More »

माहुलवासियांचे कुल्र्यात पुनर्वसन ; मुंबई महापालिकेला १६०० सदनिका देण्याचे राज्य सरकारचे आदेश

मुंबई : गेल्या काही वर्षांपासून प्रदूषणामुळे हैराण झालेल्या माहुल येथील पुनर्वसित प्रकल्पग्रस्तांचे आता कुर्ला येथील प्रीमियर मिलच्या जागेवरील एचडीआयएलच्या गृहनिर्माण प्रकल्पात पुनर्वसन करण्यात येणार आहे. त्यासाठी मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाच्या ताब्यातील १६०० घरे मुंबई महापालिकेस हस्तांतरित करण्याचे आदेश नगरविकास विभागाने गुरुवारी दिले. त्यामुळे माहुलमधील रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. शहरातील जलवाहिन्यांच्या सुरक्षिततेसाठी तेथील अतिक्रमणे हटविण्यात आली होती. या प्रकल्पग्रस्तांचे माहुल …

Read More »

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नको ; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये इतर मागासवर्गीयांचे (ओबीसी) राजकीय आरक्षण पुनस्र्थपित करण्यासाठी सादर करण्यात आलेला राज्य मागासवर्ग आयोगाच अंतरिम अहवाल सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावला. त्यामुळे राजकीय कोंडीत सापडलेल्या राज्यातील महाविकास आघाडी सरकारने आता ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नकोत, असा पुन्हा सूर लावला आहे. आरक्षणाचा प्रश्न मार्ग लागेपर्यंत निवडणुका पुढे ढकलाव्यात, अशी राज्य निवडणूक आयोगाला विनंती करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात …

Read More »

“मुंबई महापालिकेत आदित्य सेनेने भ्रष्टाचाराचा…”: भाजपा आमदाराचे गंभीर आरोप

मुंबई महानगर पालिकेत आदित्य सेनेने जणू काही भ्रष्टाचाराचा वर्ल्ड रेकॅार्ड करायचे ठरवले आहे, असा आरोप भाजपाचे आमदार अमित साटम यांनी केला आहे. त्यांनी सुधार समितीच्या बैठकीत प्रकल्पबाधितांसाठी आणलेल्या एका प्रस्तावावरून टीका केली आहे. त्या प्रस्तावात तीनशे चौरस फुटाची सदनिका ही तब्बल एक कोटी सत्तावन लाख रूपये किमतीची आहे. म्हणजेच ५२ हजार प्रति चौरसफुट या दराने ५२९ सदनिका घ्यायचे पालिकेने ठरवले …

Read More »

Maharashtra Budget Session : अधिवेशनात संघर्षांचा संकल्प ; ‘भाजपकाळातील घोटाळेबाजांवर कारवाई’

राज्य विधिमंडळाच्या आज, गुरुवारपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष असलेल्या भाजपने संघर्षांचा संकल्प केला़  हे सरकार दाऊद समर्पित असल्याची टीका करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची कोंडी करण्याचे संकेत दिल़े  दुसरीकडे, भाजप सरकारच्या काळातील घोटाळेबाजांवर कारवाईचा इशारा देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारकडून जोरदार प्रत्युत्तराचे सूतोवाच केल़े मुंबई : केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या …

Read More »

हे दाऊद समर्पित सरकार ! देवेंद्र फडणवीस यांचे टीकास्त्र; अधिवेशनात सरकारला धारेवर धरणार

मुंबई : कुख्यात दाऊद इब्राहिम आणि गुन्हेगारी जगताशी आर्थिक व्यवहार करणाऱ्या अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांना राज्य सरकार वाचवीत असून देशात असे कधी घडले नाही. हे ‘दाऊद समर्पित सरकार’ असल्याचे टीकास्त्र बुधवारी सोडत विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारच्या चहापानावर बहिष्कार घातल्याचे जाहीर केले. या अहंकारी सरकारला जनता धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही. मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीबरोबरच शेतकरी कर्जमाफी, वीज बिल …

Read More »

चीनला तोंड देण्यासाठी अमेरिकेवर अवलंबून राहणे चुकीचे! ; आशियाई देशांशी आण्विक सहकार्य आवश्यक- संरक्षण व भूराजकीयतज्ज्ञ भरत कार्नाड यांचे मत

मुंबई : चीन कधीच भारताला बरोबरीने- सन्मानाने वागवणार नाही हे लक्षात घेऊन चीनच्या भूराजकीय आव्हानाला तोंड देण्यासाठी धोरण आखण्याची गरज असून त्यासाठी अमेरिकेवर अवलंबून चालणार नाही. तर तैवान, व्हिएतनाम, फिलिपाइन्ससारख्या देशांना अण्वस्त्र सज्ज होण्यासाठी मदत करून चीनच्या अवतीभवती एक वेढा तयार केला तरच चीनच्या विस्तारवादाला तोंड देता येईल, असे परखड मत संरक्षण व भूराजकीयतज्ज्ञ भरत कार्नाड यांनी बुधवारी व्यक्त केले. …

Read More »

‘एसटी’चे खासगीकरण ; विलीनीकरणाची शक्यता मंत्रिमंडळाने फेटाळली

मुंबई : राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याची मागणी मुख्य सचिवांच्या समितीने फेटाळली. ९० हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांचे विलीनीकरण व्यावहारिक नसून, त्यातून चुकीचा पायंडा पडेल, असा निष्कर्ष समितीने काढला. बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत या अहवालाची नोंद घेण्यात आली. त्यानुसार संप मिटला नाही तर टप्प्याटप्प्याने एसटीचे खासगीकरण करण्यावरही बैठकीत चर्चा झाल्याचे समजते. एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीवरून एसटी कर्मचारी गेल्या …

Read More »

नवाब मलिक यांचा राजीनामा नाही ; राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे स्पष्टीकरण

मुंबई : केंद्रातील भाजप सरकारकडून केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी धरून व खोटेनाटे आरोप करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही निवडक नेत्यांना लक्ष्य केले जात आहे. विधिमंडळ अधिवेशनात अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी कितीही गोंधळ घातला तरी, राजीनामा घ्यायचा नाही, उलट विरोधकांना आक्रमक प्रत्युत्तर देण्याची तयारी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. नवाब मलिक यांचा राजीनामा घेतला जाणार नाही, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील …

Read More »

मुंबईसह १४ महापालिका, २५ जि.प. निवडणुकांची तयारी ; निवडणूक आयोगाची राजकीय पक्षांशी चर्चा

मुंबई : मुंबईसह १४ महानगरपलिका, नगरपालिका, २५ जिल्हा परिषदा व २८४ पंचायत समित्यांच्या निवडणुकांची तयारी सुरू करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त यू.पी.एस. मदान यांनी बुधवारी विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची निवडणुकीच्या पूर्वतयारीबाबत चर्चा केली. साधारणत: एप्रिल व मे महिन्यांत वेगवेगळय़ा टप्प्यांत या निवडणुका होण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यालयात आयुक्त मदान यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला भारतीय जनता पक्ष, …

Read More »

मुंबई: ‘आम्हाला भारतीय दूतावासाची काहीच मदत झाली नाही;’ युक्रेनमधून परतलेल्या प्रचीतीचा आरोप

तिथे आमचा जीवही जाऊ शकत होता, असं प्रचीतीने सांगितलं. रशिया आणि युक्रेनदरम्यान युद्ध सुरू झाल्यानंतर युक्रेनमध्ये अडकलेल्या अडकलेल्या विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी ऑपरेशन गंगा राबवण्यात येत आहेत. आतापर्यंत अनेक भारतीयांना परत आणलं असून बचावकार्य सुरूच आहे. अशातच युक्रेनमध्ये आम्हाला भारतीय दूतावासाची काहीही मदत झाली नाही, अशी भावना युक्रेनवरून भारतात परतलेल्या प्रचीती पवार नावाच्या विद्यार्थिनीने …

Read More »

माहिती लपवल्यावरून उच्च न्यायालयाने सचिन वाझेंना फटकारले

मुंबई : माजी न्यायमूर्ती के. यू. चांदिवाल आयोगाच्या दोन आदेशांना आव्हान देणारी याचिका करताना त्यात संपूर्ण माहिती न दिल्याने उच्च न्यायालयाने मंगळवारी बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना फटकारले. तसेच तुम्ही ही याचिका मागे घेणार की आम्ही ती फेटाळून लावू, असे बजावून याप्रकरणी बुधवारी भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश न्यायालयाने वाझे यांना दिले. प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या बंगल्याबाहेर …

Read More »

महाशिवरात्रीच्या जत्रेसाठी सरकारी अधिकाऱ्यांकडून जेसीबीने पीक उद्धवस्त ; उच्च न्यायालयाकडून ताशेरे

मुंबई : ‘महाशिवरात्री’निमित्त आयोजित जत्रेसाठी सरकारी अधिकाऱ्यांनी यंत्राच्या साहाय्याने पीक नष्ट केल्याची उच्च न्यायालयाने दखल घेऊन संताप व्यक्त केला. त्याचबरोबर कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना आणि कुरुंदवाडनगर परिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांना हजर राहण्याचे आदेश देऊन न्यायालयाने त्यांनाही धारेवर धरले. कृष्णा-पंचगंगा संगमावरील ‘कृष्णावेणी’ जत्रा साजरा करण्यासाठी याचिकाकर्त्यांच्या जमिनीचा कोणताही भाग वापरण्यास मज्जाव केला. कोल्हापूर येथील कुरुंदवाड शहरातील कृष्णा व पंचगंगा नदीच्या संगमावर महाशिवरात्रीनिमित्त दरवर्षी कृष्णावेणी …

Read More »