मुंबई: ‘आम्हाला भारतीय दूतावासाची काहीच मदत झाली नाही;’ युक्रेनमधून परतलेल्या प्रचीतीचा आरोप


तिथे आमचा जीवही जाऊ शकत होता, असं प्रचीतीने सांगितलं.

रशिया आणि युक्रेनदरम्यान युद्ध सुरू झाल्यानंतर युक्रेनमध्ये अडकलेल्या अडकलेल्या विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी ऑपरेशन गंगा राबवण्यात येत आहेत. आतापर्यंत अनेक भारतीयांना परत आणलं असून बचावकार्य सुरूच आहे. अशातच युक्रेनमध्ये आम्हाला भारतीय दूतावासाची काहीही मदत झाली नाही, अशी भावना युक्रेनवरून भारतात परतलेल्या प्रचीती पवार नावाच्या विद्यार्थिनीने व्यक्त केली आहे.

रशियन सैनिकांनी केलं भारतीय विद्यार्थिनींचं अपहरण; एका विद्यार्थिनीनं सांगितला भयानक अनुभव

प्रचीती सांगते की, “युक्रेन आणि रशियात युद्ध सुरू झाल्यावर आम्हाला भारतात परत येण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने योग्य वेळी काहीच मदत झाली नाही. आम्हाला युध्दाची सूचना आधीच देण्यात आली होती, मात्र ज्या ठिकाणी आम्ही राहत होतो, त्या ठिकाणापासून विमानतळं खूप अंतरावर होती. त्यामुळे आम्ही विमानतळापर्यंत पोहचणं हेच खूप जिकरीचं होतं. कारण तिथं पोहोचे पर्यंत आमचा जीवही जाऊ शकत होता. मात्र, त्यावेळी भारतीय दूतावासाने आम्ही संपर्क करूनही काहीच प्रतिसाद दिला नाही,” असं तिने म्हटलंय.

Ukraine War: मोठी बातमी! युक्रेनमध्ये आणखी एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू

हेही वाचा :  'फडणवीस म्हणजे चोरांचा सरदार, आता जेलमध्ये टाकायचंय' ठाकरे गटाची जहरी टीका

पाच मिनिटात तिकिटाचे दर वाढत होते, दर लाखांच्यावर झाले होते जे आम्हाला परवडणारे नव्हते. मात्र, अशावेळी भारतीय दूतावासाकडून जी मदत हवी होती ती मिळाली नाही. अजूनही माझ्या सोबत असलेले आणि इतर असे खूप विद्यार्थी युक्रेन मध्ये अडकले आहेत. त्यांची केंद्र सरकारने मदत करावी, त्यांना सुखरुप मायदेशी परत आणावं, अशी विनंती युक्रेन मधून परत आलेल्या प्रचीती पवार हिने केंद्र सरकारला केली आहे.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

आईने कडक उपवास करायला लावल्याने 2 भावांचा मृत्यू?, खायचे फक्त एक खजूर; गोव्यातील घटनेने खळबळ

गोव्यात पोलिसांना एकाच घरात दोन भावांचे मृतदेह आढळले होते. 29 आणि 27 वर्षीय भावांच्या निधनाची …

Loksabha Election 2024 : मतदान करा अन् बिअर, कॅब राईड मोफत मिळवा; कधीपर्यंत वॅलिड आहेत या ऑफर?

Loksabha Election 2024 : देशभरामध्ये लोकशाहीचा उत्सव अर्थात निवडणुकीच्या पर्वाला सुरुवात झाली असून देशातील सरकार …