Tag Archives: maharashtra news

“…तर एका मिनिटात नितेश राणेंचं संचालकपद रद्द होईल”, दीपक केसरकरांनी साधला निशाणा, ‘त्या’ नियमाचा दिला दाखला!

नितेश राणे यांची सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँकेच्या स्वीकृत संचालकपदी निवड करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच झालेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत नारायण राणेंच्या पॅनलनं विजय मिळवला असला तरी नितेश राणेंना मात्र मतदानापासून दूर ठेवण्यात आलं होतं. उच्च न्यायालयाने यासंदर्भात निर्णय दिला होता. मात्र, आता नारायण राणेंच्या आदेशानुसार नितेश राणेंची सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या स्वीकृत संचालकपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. …

Read More »

१९ बंगले गेले कुठे? याची चौकशी करा – किरीट सोमय्या

सोमय्या यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कोर्लई आणि रेवदंडा परीसरात प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता मुरुड तालुक्यातील कोर्लई गावात रश्मी ठाकरे आणि मनिषा वायकर यांच्या जागेवर असलेले १९ बंगले गेले कुठे याची चौकशी करा अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली, कोर्लई ग्रामपंचायतीला भेट दिल्यानंतर त्यांनी रेवदंडा पोलीस ठाण्यात जाऊन यासंदर्भात तक्रार अर्ज दाखल केली.   ग्रामपंचायतीने दिलेल्या माहिती …

Read More »

धावत्या रेल्वेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या विकृताला अटक

धावत्या रेल्वेत एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या विकृताला कल्याण रेल्वे पोलिसांनी अटक केली. काशी एक्सप्रेसमध्ये मुलीच्या आईने आरडाओरड केल्यावर प्रवाशांनी विकृताला चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. मध्यप्रदेश प्रदेश मधूनआलेल्या या एक्सप्रेसमध्ये घडलेल्या या घटनेत रेल्वे पोलिसांनी आरोपींला ताब्यात घेऊन तेथील इटारसी रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोनू प्रजापती (रा. उत्तरप्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव …

Read More »

जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना अवसायनात ; शालिनीताई पाटील यांना मोठा धक्का!

अवसायक पदी कोरेगाव तालुक्याच्या दुय्यम सहकारी उपनिबंधक प्रिती काळे यांची शासनाने नियुक्ती केली आहे. कोरेगाव तालुक्यातील जरंडेश्र्वर सहकारी साखर कारखाना अवसायनात निघाला असून, साखर कारखान्याच्या अवसायक पदी कोरेगाव तालुक्याच्या दुय्यम सहकारी उपनिबंधक प्रिती काळे यांची शासनाने नियुक्ती केली आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने इतर अनेक बँकांच्या कोट्यवधी रुपयांच्या थकीत कर्जाच्या वसुलीसाठी लिलावात काढला. गुरु कमोडिटी प्रा. लि. या खासगी कंपनीने …

Read More »

“राज्यात अजित पवारांचं नव्हे तर उद्धव ठाकरेंचं सरकार” ; नाना पटोलेंचं विधान!

राज्याचे सरकार हे अजित पवार यांचं नसून उद्धव ठाकरे यांचे आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. अर्थमंत्री राष्ट्रवादीचा असल्याने तुमच्यावर अन्याय होतोय का, असा प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी हे सरकार उद्धव ठाकरेंचं असल्याचं म्हटलं. ते राज्याचे प्रमुख आहेत, त्यामुळे आमच्या ज्या मागण्या असतील त्या त्यांच्यासमोर मांडणं आमचं काम आहे, असंही नाना पटोले म्हणाले. रत्नागिरी येथे आयोजित …

Read More »

“राऊतांना मातोश्री डळमळीत करायची आहे का? ते कुणाच्यातरी इशाऱ्यावर…”, चंद्रकांत पाटलांनी साधला निशाणा!

चंद्रकांत पाटील यांनी कोर्लाईमधील कथित १९ बंगल्यांच्या मुद्द्यावरून संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. “संजय राऊतांचा उद्धव ठाकरेंच्या खुर्चीवर डोळा असून त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुपारी मिळाली आहे”, असा खळबळजनक आरोप केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी लावला होता. त्यापाठोपाठ आज भाजपा आमदार आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यासंदर्भात गंभीर आरोप करत पुन्हा खळबळ उडवून दिली आहे. संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांवर कोर्लाईमधील …

Read More »

मुख्यमंत्री खरे की रश्मी ठाकरे खऱ्या आहेत याची स्पष्टता व्हायला पाहीजे – किरीट सोमय्या

किरीट सोमय्या कोर्लई गावात पोहचताच शिवसेना-भाजप कार्यकर्ते आले आमनेसामने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरेंच्या नावे कोर्लई गावात १९ बंगले नावावर असून या व्यवहारासंबंधी आरोप केल्यानंतर किरीट सोमय्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आरोप सिद्ध करण्याचं आवाहन दिल्यानंतर किरीट सोमय्या यांनी आज कोर्लई गाव गाठले. तर सोमय्या हे ग्रामपंचायत कार्यालयाजवळ पोहचताच शिवसेना कार्यकर्ते आक्रमक झाले आणि …

Read More »

“उगाच अंहकारामुळे हातचं घालवू नका,” आव्हाडांच्या सल्ल्यावर एकनाथ शिंदेंनी दिलं उत्तर, म्हणाले “शिवसेनेने कधीच…”

ठाणे महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने जितेंद्र आव्हाड आणि एकनाथ शिंदे यांच्यात शाब्दिक युद्ध ठाणे महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यात सध्या शाब्दिक युद्ध सुरु झालं आहे. ठाणे महापालिकेत राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्षाची सूत्रं दोन्ही नेत्यांची हाती असून त्यांच्यातील वादाचे परिणाम राज्यातील इतर जिल्हयांमध्ये उमटण्याची भीती आहे. ठाणे महापालिका निवडणुकीत आघाडी नकोच अशी ताठर …

Read More »

चंद्रपूर : वन्यप्राण्याने १६ वर्षीय मुलाला उचलून नेल्याने वन खात्यात खळबळ

चंद्रपूरात वाघाच्या हल्ल्यात एका कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच चंद्रपूर महाऔषणीक केंद्राच्या समोर असलेल्या दुर्गापूर नेरी येथे अल्पवयीन मुलाला वन्यप्राण्याने उचलून नेले. रात्री ११ वाजण्याच्या सुमारास भाडके या अल्पवयीन मुलाला वन्य प्राण्याने उचलून नेल्याने खळबळ उडाली आहे. हा मुलगा दुर्गापूर वॉर्ड नंबर १ मध्ये आदिवासी आश्रम शाळेच्या मागील परिसरात राहत होता. याच परिसरात ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. …

Read More »

उर्दू घरास मुस्कान खानचे नाव; मालेगाव महापालिकेत ठराव मंजूर

हिजाबप्रकरणी धैर्य दाखविणाऱ्या कर्नाटकातील मुस्कान खान या विद्यार्थिनीचे नाव एका उर्दू घरास देण्याचा सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने आणलेला ठराव गुरुवारी झालेल्या मालेगाव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला. महापौर ताहेरा शेख यांच्या अध्यक्षतेखाली आभासी पद्धतीने ही सभा पार पडली. परस्परविरोधी मतप्रवाहांमुळे आठवडाभरापासून नामकरणाचा विषय येथे चर्चेत होता. कर्नाटकातील शैक्षणिक संकुलांमध्ये हिजाब परिधान करण्यास विरोध करण्यावरून उद्भवलेल्या वादामुळे येथील मुस्लीम समाजात तीव्र …

Read More »

“…नाहीतर जिल्ह्यातून हद्दपार करू” म्हणत रायगडमध्ये शिवसेनेचा राष्ट्रवादी काँग्रेसला इशारा

शिवसेनेच्या रायगड जिल्हा कार्यकारणीची बैठक आज अलिबाग येथे पार पडली. “अडीच वर्षे खूप सहन केले आहे. आता मात्र पाणी डोक्यावरून जायला लागले आहे. शिवसेना आमदारांच्या कामांचे श्रेयही पालकमंत्री घेण्याचा प्रयत्न करत आहेत. आता मात्र हे सहन केले जाणार नाही.” असं सांगत, “कोणी पण द्या पण रायगड जिल्ह्याला शिवसेनेचा पालकमंत्री द्या.”, अशी मागणी शिवसेनेच्या रायगड जिल्हा कार्यकारणीने एकमुखाने केली आणि सत्तेत …

Read More »

आदित्य ठाकरेंची सोमय्या-राऊत आरोप-प्रत्यारोपांवर सूचक प्रतिक्रिया; म्हणाले, “राऊतांनी काल मॅच सुरू केली, आता…”!

संजय राऊतांनी किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांच्यावर शिवसेना भवनातील पत्रकार परिषदेत गंभीर आरोप केले आहेत. किरीट सोमय्या आणि संजय राऊत असा उभा राजकीय सामना सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात रंगताना पाहायला मिळत आहे. एकीकडे भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी संजय राऊत, राज्यातील महाविकास आघाडी सरकार आणि उद्धव ठाकरे कुटुंबीय यांच्यावर गंभीर आरोप केले असताना दुसरीकडे शिवसेना खासदार संजय …

Read More »

“संजय राऊतांना भीती वाटणं साहजिक आहे कारण…”; किरीट सोमय्या-संजय राऊत आरोप-प्रत्यारोप सुरूच!

आता उद्धव ठाकरेंचे १९ बंगले पायाखाली आले म्हणून आत्ता नोटीस पाठवली आहे, असंही सोमय्या म्हणाले. शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यात गेल्या काही दिवसांपासून आरोप प्रत्यारोपांचं सत्र सुरुच आहे. अशातच आता किरीट सोमय्या यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरीट सोमय्या यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्या सांताक्रुझमधील मालमत्तेची पाहणी केली होती. त्यामुळे …

Read More »

चंद्रपूर वीज केंद्र परिसरातून वाघाने कामगाराला उचलून नेले; रात्री उशिराच घटना

वीज केंद्राने याची माहिती वन खात्याला दिली होती. दरम्यान वन खात्याने बंदोबस्त करण्यापूर्वीच वाघाने कामगाराचा बळी घेतला. February 16, 2022 11:20:07 pm रात्री उशिराच घटना चंद्रपूर:चंद्रपूर वीज केंद्र परिसरातून रात्री 10.45 वाजताच्या सुमारास भोजराज मेश्राम या कामगाराला वाघाने उचलून नेले. त्यामुळे या परिसरात भीती व दहशतीचे वातावरण आहे. दोन दिवसापासून या भागात वाघ फिरत आहे. काल मंगळवारी रात्री या भागात …

Read More »

ही दोस्ती तुटायची नाय! सोलापुरात एकाचवेळी निघाली तीन मित्रांची अंत्ययात्रा; निरोप देण्यासाठी जमली हजारोंची गर्दी

मुंबई-पुणे हायवेवरील अपघातात मित्रांचा दुर्दैवी मृत्यू झाला सोलापुरातील तीन मित्रांचा अपघातात मृत्यू झाल्यानंतर त्यांना शेवटचा निरोप देण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली होती. मुंबई-पुणे हायवेवरील खोपोलीजवळ झालेल्या अपघातात या तरुणांनी आपला जीव गमावला. त्यांच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर शहरात शोककळा पसरली होती. दरम्यान त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली होती. मुंबई-पुणे महामार्गावर झालेल्या अपघातात गौरव खरात, सौरव तुळसे आणि सिद्धार्थ …

Read More »

ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचा ५७० कोटींचा ड्रीम प्रोजेक्ट चंद्रपुरात; राज्यातला पहिलाच फ्लोटिंग सोलर

चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रालगत इरई धरणाच्या पाणलोट क्षेत्रात १०५ मेगावॅट क्षमतेचा फ्लोटिंग सौर प्रकल्प व भद्रावती तालुक्यातील कचराळा व गुंजाळा येथे ५६९.६८ कोटी खर्च करून १४५ मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. येत्या एक ते दिड वर्षात हे दोन्ही प्रकल्प उभे राहणार आहेत. राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट असल्याचे सांगण्यात येत आहे. चंद्रपूर वीज केंद्रालगत इरई …

Read More »

मतिमंद मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला १२ वर्षे सक्तमजुरी; एक लाखाचा दंड

सार्वजनिक शौचालयात एका मतिमंद मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याबद्दल नरेश जनार्दन कोंडा (२१) याला जिल्हा व सत्र न्यायाधीश यू. एल. जोशी यांनी दोषी धरून १२ वर्षे सक्तमजुरी आणि एक लाख रूपये दंडाची शिक्षा सुनावली. आरोपी नरेश कोंडा याच्या घराजवळ राहणारी आणि त्याच्या ओळखीची असलेली पीडित मतिमंद मुलगी २० जानेवारी २०२१ रोजी घराजवळील सार्वजनिक शौचालयात शौचासाठी गेली होती. ती मंतिमंद असल्याचे माहीत …

Read More »

संजय राऊतांच्या पत्रकार परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया ; प्रवक्ते नवाब मलिक म्हणाले…

“…पण आता महाराष्ट्रात कोणी घाबरणार नाही ; पाच वर्षच काय २५ वर्ष हे सरकार चालणार” असंही मलिक यांनी सांगितलं आहे. राज्यभर चर्चेचा विषय ठरलेली खासदार संजय राऊत यांची पत्रकार परिषद अखेर आज दुपारी झाली. या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी अपेक्षेप्रमाणे भाजपा, केंद्रीय तपास यंत्रणांवर निशाणा साधला. शिवाय, शिवसेना कोणत्याही दबावाला झुकणार नाही, ठाकरे सरकार राज्यात कायम राहणार असल्याचे सांगितले. …

Read More »

भाजपाचे ‘ते’ साडेतीन लोक कोण? संजय राऊत म्हणतात, “कुणी अर्धा आहे, कुणी पाव आहे, कुणी चाराणेवाला…”!

“भाजपाचे साडेतीन लोक लवकरच अनिल देशमुखांच्याच कोठडीत असतील”, असं संजय राऊत म्हणाले होते. शिवसेना खासदार संजय राऊत हे जाहीर पत्रकार परिषदेतून भाजपाच्या साडेतीन लोकांचा भांडाफोड करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली होती. सोमवारी संजय राऊत यांनी “भाजपाचे साडेतीन लोक काही दिवसांत अनिल देशमुखांच्याच कोठडीत असतील”, असं देखील विधान केलं होतं. त्यामुळे आजच्या पत्रकार परिषदेमध्ये संजय राऊत या साडेतीन लोकांविषयी खुलासा …

Read More »

शिवजयंती निर्बंध: “शिवरायांच्या मावळ्याला माहितीय करोनासोबत कसं जगायचं, जीवाची काळजी कशी घ्यायची; या तीन पक्षांनी…”

“हिंदूचे सण किंवा उत्सव आले की महाराष्ट्रातील ठाकरे सरकार खडबडून जागं होतं, जाचक अटी घालतं करोनाच्या नावाखाली.” येत्या शनिवारी म्हणजेच १९ फेब्रुवारी रोजी शिवजंयीच्या निमित्ताने आयोजित करण्यात येणाऱ्या शिवज्योत दौडीत २०० जण आणि जन्मोत्सव सोहळ्याकरिता ५०० जणांना उपस्थित राहता येणार असल्याचं राज्य शासनाने सोमवारी जारी केलेल्या नियमांमध्ये म्हटलंय. यासंबंधीच्या गृह विभागाच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली आहे. मात्र …

Read More »