India Skills Report: २२ ते २५ वयातील तरुणांना रोजगारसंधी

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

‘इंडिया स्किल्स रिपोर्ट २०२३’नुसार, देशातील २२ ते २५ या वयोगटातील ५६ टक्के तरुण नोकरी मिळविण्यासाठी पात्र असल्याचे समोर आले आहे. देशातील ३.७५ लाख तरुण उमेदवारांच्या ‘व्हीबॉक्स नॅशनल एम्प्लॉयबिलिटी टेस्ट’ आणि १५हून अधिक उद्योगांतील १५० कंपन्यांमध्ये केलेल्या सर्वेक्षणातून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. सर्वेक्षणानुसार, देशातील ५०.३ टक्के जनता नोकरी मिळविण्यासाठी लायक असून, हे गेल्या सात वर्षांतील सर्वाधिक प्रमाण आहे. २०२२मध्ये देशातील ४६.२ टक्के जनता नोकरी मिळविण्यासाठी पात्र होती.

‘यूपी अव्वल’; महाराष्ट्र दुसरे

देशातील सर्वाधिक लोकसंख्या असणाऱ्या उत्तर प्रदेशातील सर्वाधिक तरुण (७२.७ टक्के) पात्र ठरले आहेत. त्यापाठोपाठ ६९.८ टक्के लायक तरुणांसह महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी आहे. मागील वर्षीच्या ‘इंडिया स्किल्स रिपोर्ट’मध्येही उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र ही राज्ये अव्वल स्थानी होती. ताज्या अहवालानुसार, दिल्ली, आंध्र प्रदेश, राजस्थान आणि कर्नाटकने अनुक्रमे तिसरे, चौथे, पाचवे आणि सहावे स्थान पटकावले आहे. त्यापाठोपाठ तेलंगण (सातवे), पंजाब (आठवे), ओडिशा (नववे) आणि हरियाणा (दहावे) या राज्यांचा क्रमांक लागतो. वार्षिक २.६ लाख रुपयांच्या पॅकेजची अपेक्षा धरणाऱ्या तरुणांच्या संख्येत तमिळनाडूने अव्वल स्थान पटकावले आहे. त्यापाठोपाठ महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशचा अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक लागतो. वार्षिक २.६ लाख रुपयांपेक्षा अधिक पॅकेजची अपेक्षा धरणाऱ्या राज्यांमध्ये आंध्र प्रदेश अव्वलस्थानी असून, कर्नाटक दुसऱ्या आणि महाराष्ट्र तिसऱ्या स्थानी आहे.

हेही वाचा :  धक्कादायक! दिव्यांग शाळांना परवाना देण्यात दिरंगाई, वेतनाचे अनुदानही रखडले

‘बीकॉम’ उमेदवारांची आघाडी

‘इंडिया स्किल्स’च्या मागील अहवालात ‘बीटेक’ पदवीप्राप्त तरुण नोकरीसाठी अधिक लायक असल्याचे नमूद करण्यात आले होते. मात्र, ताज्या अहवालात ‘बीकॉम’ झालेल्या तरुणांनी त्यांना धोबीपछाड दिला आहे. ‘बीकॉम’ झालेले ६१ टक्के आणि ‘बीटेक’ झालेले ५७ टक्के तरुण नोकऱ्या मिळाल्याचे पात्र असल्याचे दिसून आले आहे. गेल्या सात वर्षांमध्ये यंदा प्रथमच ‘बीकॉम’ झालेल्या तरुणांनी ‘बीटेक’वाल्यांना मागे टाकले आहे. ‘एमबीए’ झालेल्या तरुणांनी यंदाही नोकरीच्या पात्रतेत दुसरे स्थान कायम राखले आहे. २०२२मध्ये ‘एमबीए’ झालेले ५५ टक्के तरुण नोकरीसाठी योग्य होते. त्या तुलनेत यंदाचा आकडा ६० टक्क्यांवर पोहोचला आहे. ‘एमबीए’पाठोपाठ ‘बीफार्म’धारक (५७.५१ टक्के) नोकरीच्या रांगेत तिसऱ्या स्थानी आहेत. त्यापाठोपाठ ‘बीटेक’ (५७.४४ टक्के), ‘बीए’ (४९.२० टक्के), ‘बीएसस्सी’ (३७.६९ टक्के) आणि ‘आयटीआय’ (३४ टक्के) यांचा अनुक्रमे चौथा ते सातवा क्रमांक लागतो.

Government Job: बारावीनंतर सरकारी नोकरी करायचीय? या विभागांमध्ये करा अर्ज

कोणत्या क्षेत्रांना अधिक मागणी

– सन २०२३मध्ये ऑटोमोबाइल, इंजिनीअरिंग आणि इंटरनेट क्षेत्रांत सर्वाधिक नोकऱ्यांची संधी.

– ऑटोमोबाइलमध्ये सर्वाधिक ३९ टक्के नोकऱ्यांची संधी. एक ते पाच वर्षांचा अनुभव असणाऱ्यांना अधिक मागणी.

हेही वाचा :  SBI मध्ये परीक्षा न देता मिळेल नोकरी, ७८ हजारपर्यंत पगार

– सरकारी कौशल्य विकास केंद्रांतून भरती करण्यास ५५ टक्के कंपन्यांचे प्राधान्य.

– देशातील १०,८४८ केंद्रांतून १.५ कोटी युवक प्रशिक्षित.

NCDC: राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळात नोकरीची संधी, ५० हजारपर्यंत मिळेल पगार

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत फायरमन पदांची भरती

Pimpri Chinchwad Municipal Corporation Invites Application From 150 Eligible Candidates For Fireman Posts. Eligible Candidates …

अहमदनगर जिल्हा न्यायालय अंतर्गत सफाईगार पदांची भरती

Ahmednagar District Court  Bharti 2024 – Ahmednagar District Court Invites Application From 02 Eligible Candidates …