मेंटल बनवू शकतात ऑफिसच्या या 4 गोष्टी, हे 7 उपाय करा, काम जबरदस्त व टेन्शन होईल कायमचं गुल

मनुष्य मग तो कोणताही का असेना तो काम करतो आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि जगण्यासाठी! आजच्या जगात तर साहजिकच कामाशिवाय आयुष्य जगणे कठीण आहे. कामाचा अर्थ असा नाही की तुम्ही जे 9 ते 5 पर्यंत काम करता तेच काम, तुम्ही दिवसभर जे काही करता ते सगळंच तुमच्या कामात येतं. काम ही अशी गोष्ट आहे जी तुमच्या आयुष्याला दिशा देते. काम हे अनेकांसाठी जगण्याचे साधन आहे तर अनेकांना प्रतिष्ठा टिकवून ठेवण्याचे माध्यम आहे.

मात्र काही लोकं अशी असतात ज्यांच्यासाठी कामच त्यांचे खरे पॅशन असते. त्यातून जे काही मिळते त्यातून त्यांना स्वत:बद्दल गर्व वाटतो. तर अशा या कामाचे सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही परिणाम असतात. लाईफ कोच शीतल शापरिया सांगत आहेत की, कामाचा मानसिक आरोग्यावर कसा परिणाम होतो आणि तुम्ही त्याचा कसा सामना करू शकता? (फोटो सौजन्य :- iStock)

एम्प्लॉयी बर्नआउट

एम्प्लॉयी बर्नआउट

कामाच्या ताणाचा मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होतो, ज्यामुळे अनेक आजार होऊ शकतात. यामुळे एम्प्लोयी बर्नआउट होऊ शकतात, ही एक प्रकारची स्थिती आहे की नोकरीच्या तणावामुळे होणारी मानसिक आरोग्य समस्या म्हणून ओळखली जाते. याचा तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनावर वाईट परिणाम होऊ शकतो.
(वाचा :- Omega3 Foods: मेंदूच्या नसा पार सुकवते ओमेगा 3 ची कमतरता, ब्रेन डेड होण्याआधी 5 लक्षणं दिसतात, खा हे 15 पदार्थ)​

हेही वाचा :  कोरोनाचं थैमान, चीन परेशान, वाढत्या रूग्णसंख्येचा हाहाकार

चिंता आणि नैराश्य

चिंता आणि नैराश्य

यामुळे तुमच्यावर प्रोफेशनली परिणाम होऊ शकतो कारण तुम्हाला काम करावेसे वाटत नाही. याचा थेट परिणाम तुमच्या कमाईवर होतो आणि एकंदर तुमचे आर्थिक गणित कोलमडू शकते. मग याचा परिणाम आयुष्यावर होऊ लागतो याव्यतिरिक्त, कामाशी संबंधित तणावामुळे चिंता आणि नैराश्य यासारखे मानसिक आजार निर्माण होऊ शकतात. खराब मानसिक आरोग्य असलेला कर्मचारी कधीही आपले काम 100% मनापासून करू शकत नाही.
(वाचा :- Weight Loss: स्वत: शोधून काढली ट्रिक अन् मेणासारखी वितळून पातळ झाली पोटावरची चरबी, घरच्या घरी केले 22 किलो कमी)​

कामामुळे मानसिक आरोग्यावर होणारा परिणाम कसा ओळखावा?

कामामुळे मानसिक आरोग्यावर होणारा परिणाम कसा ओळखावा?

अशा काही गोष्टी आहेत ज्यामुळे कामाचा मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.

  1. तुमचे कामाचे तास जास्त आहेत आणि त्या दरम्यान तुम्हाला अजिबात आराम मिळत नाही.
  2. कामाच्या वेळेनंतरही तुम्हाला बोलावले जाते आणि अतिरिक्त काम करायला लावले जाते.
  3. काम संपल्यानंतर न थांबल्याने तुमची चेष्टा केली जाते
  4. तुम्हाला सांगितले जाते की तुम्हाला जास्तीचे काम नको असते.
  5. कामाच्या ठिकाणी तुम्हाला योग्य सल्ला देणारे कोणी नसते.
  6. तुम्हाला नवीन गोष्टी शिकण्यासाठी वेळ मिळत नाही.
  7. तुमच्याकडे खूप काम असते आणि तुम्हाला ते वेळेवर पूर्ण करावे लागते.
  8. नोकरी करत असतानाही वेतनवाढ किंवा पदोन्नती मिळत नाही.
  9. तुमचा उद्योग अडचणीत आहे आणि सतत नुकसान होते.
हेही वाचा :  Bathing Habit : आजच सोडा अंघोळीबाबतची ‘ही’ घाणेरडी सवय, दीर्घायुष्यासाठी हार्वर्ड एक्सपर्ट्सनी सांगितली अंघोळ करण्याची योग्य पद्धत..!

तर या सर्व गोष्टी मानसिक आरोग्यावर परिणाम करू शकतात.

(वाचा :- High Uric Acid: औषधं व डॉक्टशिवाय युरिक अ‍ॅसिडचं पार पाणी पाणी करतात हे 3 उपाय, गुडघेदुखी व मुतखडा होईल छुमंतर)​

कामाच्या ठिकाणी मानसिक आरोग्य का चांगले राखले पाहिजे?

कामाच्या ठिकाणी मानसिक आरोग्य का चांगले राखले पाहिजे?

एखादी कंपनी तेवढीच चांगली असते जेवढे त्यातील कर्मचारी चांगले असतात. जर कर्मचार्‍यांना त्रास होत असेल आणि ते काम करू शकत नसतील तर याचा अर्थ कामाचे वातावरण चांगले नाही. आनंदी असणारे कर्मचारी केवळ काम पूर्णच करत नाही तर कार्यालयीन वातावरण चांगले राखण्यात देखील योगदान देतात. कामाचे दडपण नसेल, टेन्शन नसेल, तर त्यामुळे कर्मचारी अधिक क्रियेटीव्ह आणि कार्यक्षम होतो. टेन्शनशिवाय काम करणे अधिक आनंददायी असते आणि काम देखील योग्य प्रकारे केले जाते हे लक्षात ठेवा.
(वाचा :- बापरे, मुंबईवर H3N2 Virus ची सावली, सर्दी, खोकला, तापाला घेऊ नका हलक्यात, डॉक्टरांचे हे 6 उपायच वाचवू शकतात) जीव​

अशी घ्यावी मानसिक आरोग्याची काळजी

अशी घ्यावी मानसिक आरोग्याची काळजी
  1. जर तुम्हाला कामचा जास्त ताण आला असेल वाटत असेल तर काही दिवस सुट्टी घ्या.
  2. ऑफिसच्या वेळेनंतर कामाला नाही म्हणायला शिका.
  3. इमर्जन्सी असेल तरच अशी एक्स्ट्रा कामे करा पण त्याची सवय होऊ देऊ नका.
  4. तुमच्या कामाला महत्त्व द्या.
  5. तुमच्या कामाबतात सिनियर्सकडून अभिप्राय मिळवा.
  6. ऑफिस पॉलिटिक्समध्ये पडू नका.
  7. योगासने, ध्यानधारणा करून तणावमुक्त राहा.
हेही वाचा :  योग्य वयात व झटपट बनायचं आहे आई-बाबा? मग आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितलेल्या ‘या’ सीक्रेट टिप्स एकदा ट्राय कराच..!

(वाचा :- Reduce Blood Sugar : इन्सुलिनने खचाखच भरली आहेत आंब्याची पानं, असा करा वापर, गोड खाऊनही होणारच नाही डायबिटीज)​

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha Election : काहींची नावं गायब, तर काहींचा अपंग म्हणून उल्लेख; मतदार यादीतील घोळ संपता संपेना

Loksabha Election 2024 Voting List : सध्या संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकांची धामधुम सुरु आहे. लोकसभेच्या …

गर्भपातानंतर अर्भकाचे तुकडे फेकायचे शेतात..राज्यभरातून यायच्या महिला..’; ‘असा’ चालायचा गोरखधंदा

विशाल करोळे, झी 24 तास, संभाजी नगर:  गेल्या आठवड्यात छत्रपती संभाजी नगरमध्ये उच्चभृ वसाहतीत अवैध …