या एका कृतीमुळे सिद्धार्थ आणि त्याच्या कुटुंबियांच खास करून वडिलांच नातं किती घट्ट आहे, हे कळलं. मुलांना पालकांनीच काही गोष्टींची जाणीव करून देणे गरजेचे असते. मुलांच्या संगोपना दरम्यानच काही गोष्टी आवर्जून शिकवायला पाहिजे. त्या गोष्टी कोणत्या हे समजून घ्या. (फोटो सौजन्य- Yogen Shah / iStock)
कुणीही बाहेरून आल्यावर
पालकांनी सुशिक्षित आणि सुसंस्कारीत या दोन शब्दांमधील फरक समजून घेणे गरजेचे आहे. मुलांना काही ठराविक गोष्टी शिकविल्या पाहिजेत. ज्यामध्ये बाहेरून कुणीही घरी आल्यावर त्यांना पहिलं पाणी विचारणं. अनेकदा पालक घरी नसतात तेव्हा पाहुणे येतात. अशावेळी मुलांनी त्यांच्याशी कसं वागावं हे पालकांनी शिकवणं गरजेचं आहे.
(वाचा – गणपतीच्या नावावारून मुलांची १० नावे, बाप्पाचा राहील विशेष आशिर्वाद)
पालक बाहेरून आल्यावर
पालक बाहेरून आल्यावर अनेकदा मुलं दंगा करतात. भावंडच घरात असतील तर मुलं त्यांना आल्या आल्या वादांबद्दल सांगतात. असं अजिबातच मुलांनी करू नये हे पालकांनी शिकवावं. पालक बाहेरून आल्यावर त्यांच्या हातात पिशव्या असतील तर त्या पहिल्या घ्याव्यात. पालक प्रवासातून येतात. त्यामुळे त्यांना थोडा आराम द्यावा. त्यानंतर काही गोष्टी बोलाव्यात.
(वाचा – कावीळीसाठी दिलेल्या फोटोथेरेपीमुळे नवजात शिशुचा रंग काळवंडतो का?)
सिद्धार्थने वडिलांबद्दल दाखविले प्रसंगावधान
पालकांच्या कामाप्रती कृतज्ञ
पालक आणि मुलांचं नातं घट्ट होण्यासाठी छोट्या छोट्या कृती फायदेशीर ठरतात. सिद्धार्थ आणि त्याच्या वडिलांच्या नात्यातून हे अधिकच अधोरेखित होतं. मुलांनी पालकांचा विचार करावा. सिद्धार्थचे वडिल मर्चंट नेव्हीमध्ये कॅप्टन या पदावर कार्यरत होते. आपले वडील देशसेवेत कार्यरत होते. त्यांनी आपल्यासाठी आणि देशासाठी मोठं कार्य केलंय, याची जाणीव सिद्धार्थ आहे. आणि हेच त्याच्या कृतीतून दिसलं आहे.
(वाचा – Cryptic Pregnancy : गुप्त गर्भधारणा म्हणजे काय? याचा बाळावर काय परिणाम होतो?)
कुणासमोरही घरच्यांच्या चुका काढू नयेत
अनेकदा एखाद्या कार्यक्रमात मुलांना कसं वागावं हे कळत नाही. मुलं पालकांना रिप्रेझेंट करत असतात. अशावेळी मुलांनी कुणाच्याही समोर भांडू नयेत किंवा एकमेकांच्या चुका काढू नयेत. घरातल्यांची एखादी गोष्ट पटली नाही तर भर समारंभात न बोलता घरी येऊन त्यावर चर्चा करावी. मुलांना लहानपणापासून या सवयी लावल्यास त्याचा फायदाच होईल.
(वाचा – R Madhavan च्या मुलाची पदक मिळवत दमदार कामगिरी, पालकांनी मुलांच्या करिअरमध्ये कशी साथ द्यावी)
कुणासमोर काय बोलावं
अनेकदा मुलं भावनेच्या भरात घरातील असंख्य गोष्टी बोलून जातात. अशावेळी पालकांनी मुलांना कुणासमोर काय बोलावं हे मुलांना आवर्जून शिकवावं. अनेकदा कुटुंबाच्या काही खासगी गोष्टी असतील. किंवा काही महत्वाचे निर्णय असतील याबाबत मुलांनी सगळ्यांना सांगू नयेत. या गोष्टी पालकांनी मुलांना आवर्जून शिकवावं.
(वाचा – ‘तो’ आईपण अनुभवणार, भारतातील पहिल्या ट्रान्स पुरूषाचे बाळंतपण, केरळमध्ये ट्रान्सजेंडर कपलने दिली Good News)