शालेय पोषण आहाराचा पुरवठा महिनाभरापासून बंद

म. टा. वृत्तसेवा, यवतमाळ

जिल्हा परिषद, तसेच अनुदानित शाळांमधील शालेय पोषण आहाराचा पुरवठा मागील महिनाभरापासून बंद असल्याने शाळांमध्ये खिचडी शिजली नाही. खिचडी कधी मिळणार, असा प्रश्न विद्यार्थी शिक्षकांना विचारत आहेत.

महिला व बाल विकास विभागाकडून कंत्राटदाराच्या मार्फत शाळांना पोषण आहाराचा पुरवठा करण्यात येतो. वर्ग पहिला ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी पोषण आहार योजना आहे. एक ते पाच वर्गांतील विद्यार्थ्यांना १०० ग्राम तांदूळ व २० ग्राम डाळ व इतर पोषण आहारामधील बिस्कीट, राजगिऱ्याचे लाडू, हळद, मीठ, तिखट, भाजीपाला व इंधन खर्च व वर्ग सहा ते आठपर्यंतच्या विद्यार्थ्यांना १५० ग्राम तांदूळ, ३० ग्राम कडधान्य, बिस्कीट, राजगिऱ्याचे लाडूचा खर्च शाळा व्यवस्थापनाच्या खात्यात जमा करण्यात येतो.

भारतीय अन्न महामंडळाकडून तांदूळ निःशुल्क देण्यात येतो. पण गेल्या महिन्यापासून तांदूळच आला नसल्याने अडचण निर्माण झाली आहे. शालेय पोषण आहार पुरवठ्याचे काम महिला बचत गटांना देण्यात यावे, असे न्यायालयाचे आदेश असताना, जुन्याच कंत्राटदाराकडे पुरवठा करण्याचे काम आहे. पूर्वी करोना व आता आढावा घेण्यात येत असल्याचे कारण महिला व बाल विकास विभागाचे वरिष्ठ अधिकारी देत आहे.

हेही वाचा :  NEP ची अंमलबजावणी करण्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आघाडीवर

त्यामुळे नवीन निविदा काढण्यात आल्या नसल्याचे गेल्या काही दिवसांपासून पोषण आहारवाटप विस्कळीत झाले आहे. त्यातच गेल्या महिन्यापासून पोषण आहार पुरवठा बंद झाल्याने विद्यार्थी पोषण आहारापासून वंचित आहे.

महिला बचत गटांकडून व्हावा पुरवठा

कंत्राटदार व सरकार यांच्यातील टक्केवारीच्या वादात विद्यार्थी भरडले जात आहेत. नगरपरिषदेच्या शाळांमधील पोषण आहाराचा पुरवठा बचत गटाकडून सुरू असल्याने त्या ठिकाणी अडचण नाही. त्याच धर्तीवर जिल्हा परिषद व अनुदानित शाळांमध्ये महिला बचत गटांकडून पोषण आहाराचा पुरवठा झाला पाहिजे, अशी मागणी शिक्षक भारती संघटनेने केली आहे. आठ दिवसांत शालेय पोषण आहाराचा प्रश्न मिटला नाही तर आंदोलन करण्यात येईल, असे संघटनेचे जिल्हाध्यक्ष साहेबराव पवार यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी, नव्या वर्षाच्या पहिल्या महिन्यात शाळांना ‘इतके’ दिवस सुट्ट्या

जिल्हा परिषदेकडून पत्रव्यवहार सुरू

भारतीय अन्न महामंडळाकडून तांदूळच मिळाला नसल्याने पोषण आहार वाटपात अडचण निर्माण झाली आहे. आम्ही त्यासाठी महामंडळाच्या अमरावती येथील अधिकाऱ्याकडे सतत पत्रव्यवहार सुरू आहे. पण तांदळाची टंचाई असल्याने त्यांच्याकडेही तांदूळ येत नसल्याचे कळते, असे यवतमाळ जिल्हा परिषदेचे लेखापाल पी. गोल्हर यांनी सांगितले.

हेही वाचा :  शालेय विद्यार्थ्यांसाठी महत्वाची अपडेट! आता वर्षातून 2 वेळा बोर्डाची परीक्षा

शाळा आणि विद्यार्थी संख्या

– जिल्हा परिषद शाळा

२,१०८ विद्यार्थी

१,२८,९३६ पहिली ते पाचवीचे विद्यार्थी

४१,९१८ सहावी ते आठवीचे विद्यार्थी

– अनुदानित शाळा

४४७ विद्यार्थी

२३ हजार ६४३ पहिली ते पाचवीचे विद्यार्थी

५४ हजार ४४३ सहावी ते आठवीचे विद्यार्थी

शाळकऱ्यांना नव्या वर्षाचं गिफ्ट, शहरात बनणार ‘विद्यार्थी प्राधान्य रस्ते’
महापालिकेच्या शाळांमध्ये गुणवत्ता वृद्धी उपक्रम

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत फायरमन पदांची भरती

Pimpri Chinchwad Municipal Corporation Invites Application From 150 Eligible Candidates For Fireman Posts. Eligible Candidates …

अहमदनगर जिल्हा न्यायालय अंतर्गत सफाईगार पदांची भरती

Ahmednagar District Court  Bharti 2024 – Ahmednagar District Court Invites Application From 02 Eligible Candidates …