न्यू इंडिया साक्षरता शैक्षणिक उपक्रमाअंतर्गत सर्वांना मिळणार शिक्षण

New India Literacy Program: केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने बुधवारी नव भारत साक्षरता कार्यक्रम (New India Literacy Program) नावाचा नवीन शैक्षणिक कार्यक्रम(Education Program) सुरू केला आहे. पुढील पाच वर्षांत प्रौढ शिक्षणाचे सर्व आयाम साध्य करण्याचे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे. नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत (New Education Policy) ही योजना सुरू करण्यात आली आहे.

आता प्रौढ शिक्षणाऐवजी ‘सर्वांसाठी शिक्षण’ हा शब्दप्रयोग वापरण्यात येणार असल्याचा निर्णयही शिक्षण मंत्रालयाने घेतला आहे. पूर्वीच्या योजनेत १५ वर्षे आणि त्यावरील सर्व वयोगटांना योजनेत समाविष्ट करता येत नव्हते. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या योजनेचा उद्देश केवळ मूलभूत साक्षरता आणि आकडेवारी देणे हा नसून सर्व घटकांना सामावून घेणे हा आहे. याद्वारे आर्थिक साक्षरता, डिजिटल साक्षरता, व्यावसायिक कौशल्ये, आरोग्य सेवा आणि जागरूकता, महत्वपूर्ण जीवन शिक्षण आणि कुटुंब कल्याण यावर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त स्थानिक रोजगार मिळण्याच्या दृष्टीने व्यावसायिक कौशल्य विकास, प्राथमिक, मध्यम व माध्यमिक स्तरावरील मूलभूत शिक्षण इत्यादींवरही भर दिला जाणार आहे.

Army ADG Recruitment: अतिरिक्त डायरेक्टोरेट जनरल अंतर्गत विविध पदांची भरती

इस्टर्न कोलफिल्डमध्ये बारावी उत्तीर्णांना संधी, ३१ हजारपर्यंत मिळेल पगार

हेही वाचा :  शिक्षणात एचसीएल, टीआयएसएसची मदत घेणार- शिक्षणमंत्री

नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत सातत्यपूर्ण शिक्षण असेल. ज्यामध्ये कला, विज्ञान, तंत्रज्ञान, संस्कृती, क्रीडा आणि मनोरंजन आणि स्थानिक लोकांसाठी जीवनकौशल्य इत्यादी विषयातील प्रौढ शिक्षण अभ्यासक्रमांचा समावेश आहे. अधिकाऱ्यानी दिलेल्या माहितीनुसार, स्वयंसेवकांच्या मदतीने हा उपक्रम ऑनलाइन पद्धतीने चालविला जाईल. यामध्ये प्रशिक्षण सत्र, कार्यशाळांचे आयोजन करण्यात येणार आहे. टीव्ही, रेडिओ, ओपन सोर्स अॅप्स आणि पोर्टल्ससारख्या डिजिटल माध्यमातून नोंदणीकृत स्वयंसेवकांना माहिती उपलब्ध करून दिली जातील.

कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या प्रशासकीय विभागात भरती, २५ हजार ते १ लाखापर्यंत मिळेल पगार
२०२२-२७ पर्यंत ५ कोटी जणांना साक्षर करणार
नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत, सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील १५ आणि त्यावरील सर्व वयोगटातील निरक्षर लोकांना समाविष्ट केले जाणार आहे. या योजनेसाठी सरकारने सन २०२२ ते २०२७ या कालावधीत मूलभूत साक्षरता आणि संख्यात्मकतेचे लक्ष्य ५ कोटी ठेवले आहे. यासाठी नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर, NCERT आणि NIOS यांच्या सहकार्याने ऑनलाइन लर्निंग अँड असेसमेंट सिस्टम (OTLAS) वर काम करण्यात आले आहे. इच्छुक व्यक्ती यामध्ये नोंदणी करू शकतात. यासाठी त्यांना त्यांचे नाव, जन्मतारीख, लिंग, आधार आणि मोबाईल क्रमांक टाकावा लागेल.

हेही वाचा :  आता पीएचडी करणे झाले सोपे! यूजीसीकडून नवी नियमावली जाहीर

किती खर्च ?
अंदाजानुसार, न्यू इंडिया साक्षरता कार्यक्रमात १०३७.९० कोटी रुपये खर्च होणार आहेत. यामध्ये केंद्र सरकार ७०० कोटी रुपये तर राज्य सरकार ३३७.९० कोटी रुपये खर्च करणार आहे. याअंतर्गत राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना नाविन्यपूर्ण कामे करण्याची सुविधा देण्यात आली आहे. योजनेच्या अंमलबजावणीसाठी शाळांची मदत घेतली जाणार आहे. त्याचा उपयोग लाभार्थ्यांच्या सर्वेक्षणासाठी केला जाईल.

NHM Recruitment: ‘या’ ५ जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत भरती
TCS Recruitment 2022: टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये विविध पदांची भरती

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत फायरमन पदांची भरती

Pimpri Chinchwad Municipal Corporation Invites Application From 150 Eligible Candidates For Fireman Posts. Eligible Candidates …

अहमदनगर जिल्हा न्यायालय अंतर्गत सफाईगार पदांची भरती

Ahmednagar District Court  Bharti 2024 – Ahmednagar District Court Invites Application From 02 Eligible Candidates …