करोनामुळे UPSC देऊ न शकलेल्यांच्या फेरपरीक्षेबाबत महत्वाची अपडेट

UPSC Exam: करोना पॉझिटिव्ह (Corona Positive)असल्यामुळे यूपीएससी परीक्षेला (UPSC Exam) बसू न शकलेल्या उमेदवारांची फेरपरीक्षा घेण्याच्या मागणीवर केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) दाखल केलेल्या याचिकेला केंद्रीय लोकसेवा आयोगाने (Union Public Service Commission) ने उत्तर दिले. आजार, अपघात किंवा कोणत्याही कारणास्तव उमेदवार नियोजित तारखेला परीक्षेला बसला नसेल तर परीक्षा पुन्हा आयोजित करण्याची कोणतीही तरतूद नाही, अशी माहिती युपीएससीने सर्वोच्च न्यायालयात दिली.

मंगळवारी सुप्रीम कोर्टात तीन उमेदवारांच्या याचिकेवर सुनावणी झाली. या तिन्ही उमेदवारांनी यूपीएससी-२०२१ ची प्राथमिक परीक्षा उत्तीर्ण केली होती पण करोनाचीा प्रादुर्भाव वाढल्याने मुख्य परीक्षेच्या सर्व पेपरमध्ये बसू न शकलेल्या उमेदवारांना आता परीक्षेला बसण्याची अतिरिक्त संधी देण्याची मागणी होत आहे.

नागरी सेवा परीक्षेतील वय शिथिलता आणि नुकसान भरपाई/अतिरिक्त प्रयत्न यासंबंधीचा कोणताही निर्णय ही एक धोरणात्मक बाब आहे. जी कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाच्या (DoPT) अखत्यारीत येते असे यूपीएससीने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

Mumbai Metro मध्ये विविध पदांची भरती, अर्ज प्रक्रिया जाणून घ्या
केंद्र सरकारच्या नियमानुसार परीक्षा

आयोगातर्फे सर्वसाधारणपणे वर्षभरात विविध भरती परीक्षांव्यतिरिक्त १३ परीक्षा घेतल्या जातात. या परीक्षांदरम्यान उमेदवार कोणत्याही आजार/अपघात किंवा इतर कोणत्याही कारणामुळे विहित तारखेला परीक्षेत बसू शकला नाही, त्याला परीक्षा देता आली नाही, तर पुन्हा परीक्षा घेण्याची तरतूद नसते. आयोगातर्फे ही माहिती सर्वोच्च न्यायालयात देण्यात आली.

हेही वाचा :  IIT Madras Online Course: बँकिंग परीक्षांच्या तयारीसाठी IIT मद्रासचा प्रिमिअर बँकर कोर्स

SAI Recruitment 2022: भारतीय क्रीडा प्राधिकरणात नोकरी, ६० हजारपर्यंत मिळेल पगार
यापूर्वी आयोगाने अशाच परिस्थितीत कोणतीही पुनर्परीक्षा घेतली नाही. यूपीएससी ही नागरी सेवा परीक्षा भारत सरकारच्या कार्मिक मंत्रालयात दरवर्षी घेण्यात येणाऱ्या परीक्षेच्या नियमांनुसार आयोजित केली जाते.

कर्मचाऱ्यांना हवंय Work From Home, वेतनवाढ-नोकरी सोडण्यासही तयार
देशभरातील २४ केंद्रांवर परीक्षा
UPSC ने सर्वोच्च न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार नागरी सेवा मुख्य (लेखी) परीक्षा २०२१ ही ७ जानेवारी ते १६ जानेवारी या कालावधीत झाली. देशभरातील २४ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली. यावेळी करोना प्रोटोकॉलचे पूर्णपणे पालन करण्यात आले. करोना बाधित उमेदवारांसाठीकोणती वेगळी तरतूद करण्यात आली नव्हती. महत्त्वाची रिक्त पदे वेळेवर भरून सरकारला मनुष्यबळ पुरवण्याची घटनात्मक जबाबदारी आम्ही पूर्ण करत आहोत, असे आयोगाने म्हटले आहे.

RailTel Recruitment: रेलटेल कॉर्पोरेशनमध्ये विविध पदांची भरती
नोकरीच्या शोधात असाल तर ‘या’ ६ टिप्स नक्की फॉलो करा

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत फायरमन पदांची भरती

Pimpri Chinchwad Municipal Corporation Invites Application From 150 Eligible Candidates For Fireman Posts. Eligible Candidates …

अहमदनगर जिल्हा न्यायालय अंतर्गत सफाईगार पदांची भरती

Ahmednagar District Court  Bharti 2024 – Ahmednagar District Court Invites Application From 02 Eligible Candidates …