राज्य मंडळाने बारावीच्या परीक्षेसंबंधीचे माहिती देणारे परिपत्रक जाहीर केले आहे. यानुसार, राज्यात २,९९६ मुख्य केंद्र आणि ६,६३९ उपकेंद्रे अशा एकूण ९,६३५ केंद्रांवर परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी मंडळामार्फत प्रसिद्ध केलेले वेळापत्रकच ग्राह्य धरावे, असे आवाहन राज्य मंडळाने केले आहे.
शाखानिहाय परीक्षेला बसणारे विद्यार्थी –
विज्ञान – ६,३२,९९४
कला – ४,३७, ३३६
वाणिज्य – ३,६४,३६२
व्होकेशनल – ५०,२०२
आयटीआय – ९३२
एकूण – १४,८५,८२६
काही पेपरच्या वेळा बदलल्या
राज्य मंडळाने काही विषयांच्या पेपरच्या वेळापत्रकात बदल केला आहे. त्यासंबंधी यापूर्वीच सर्व विद्यार्थ्यांना कळवण्यात आले आहे. ५ आणि ७ मार्च २०२२ या दिवश होणाऱ्या परीक्षा ५ आणि ७ एप्रिल २०२२ रोजी होणार आहेत.
विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाइन नंबर
परीक्षेच्या कालावधीत दडपणाखाली असलेल्या विद्यार्थ्यांना नैराश्येतून बाहेर काढण्यास मदत करण्यासाठी १० समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी विभागीय स्तरावर मंडळामध्ये एक किंवा दोन समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
हेल्पलाइन क्रमांकांची यादी पुढीलप्रमाणे –
कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर यंदाच्या परीक्षेसाठी पुढील महत्त्वाचे बदल-
– नेहमीपेक्षा सुमारे १५ दिवस उशिराने परीक्षेचे आयोजन
– शाळा-ज्यु. कॉलेज स्तरावर परीक्षेचे केंद्र-उपकेंद्र
– ७५ टक्के अभ्यासक्रमावर आधारित लेखी परीक्षा
– ४० टक्के प्रात्यक्षिकांवर आधारित परीक्षेचे नियोजन
– लेखी परीक्षेच्या ७० ते १०० गुणांच्या पेपरसाठी ३० मिनिटे अधिक वेळ, ४० ते ६० गुणांच्या पेपरसाठी १५ मिनिटे जादा वेळ