सोया सॉस

सोया सॉस अनेक पदार्थांमध्ये वापरला जातो. पण तुम्हाला माहीत आहे का की ते अनेक दशके वापरले जाऊ शकते? परंतु हे तेव्हाच होऊ शकते जेव्हा हा सॉस बनवताना कोणतेही ऍडिटीव्ह आणि प्रिझर्व्हेटिव्ह वापरले गेले नसतील. इतकेच नाही तर सोया सॉसची बाटली एकदा उघडलेली असली तरीही ती खूप दिवस टिकू शकते. याशिवाय मिठाच्या माध्यमातून त्याची शेल्फ लाइफही वाढवता येते.
(वाचा :- Blood thinner food : रक्त घट्ट झाल्यामुळे वाढतो ब्लड क्लॉट व हार्ट अटॅक सारख्या भयंकर आजारांचा धोका, रक्त पातळ करण्यासाठी खा ‘हे’ 5 स्वस्तातले पदार्थ..!)
कॉफी

एक्स्पायरी डेटनंतरही तुम्ही कॉफी वापरू शकता. कारण प्री ब्रूड कॉफीचे एक मिश्रण सुकवून त्यापासूनच इन्स्टंट कॉफी बनवली जाते. ही कॉफी नंतर गरम हवेद्वारे पावडरच्या स्वरूपात तयार केली जाते. याशिवाय, कधीकधी कॉफी एकतर वाळवली जाते किंवा व्हॅक्यूमद्वारे फ्रीज केली जाते. कॉफी तयार करण्याची ही प्रक्रिया दर्शवते की त्यात जरासाही ओलावा नाही. याच कारणामुळे ही कॉफी एक्सपायरी डेटनंतरी सेवन करता येते.
(वाचा :- Pregnancy Weight Loss : लिंबू पाण्यात ‘हा’ पदार्थ मिक्स करून बनवलेलं पेय पिऊन या महिलेने घटवले 25 किलो वजन, करीना कपूर होती इंस्पिरेशन!)
मध

मध ही केवळ आजच नव्हे तर शतकानुशतके वापरल्या जाणार्या अन्न घटकांपैकी एक आहे. त्याच्या गुणधर्मांमुळे आणि पोषक तत्वांमुळे ती जगभरात वापरले जाते. यासोबतच, याचा समावेश अशा खाद्यपदार्थांमध्ये केला जातो ज्यांचा वापर तुम्ही एक्सपायरी डेटची चिंता न करता करू शकता. याशिवाय साखरेसाठी उत्तम पर्याय असणारी ही मध अनेक दशकांपर्यंत खाल्ली जाऊ शकतो. अट एवढीच आहे की ती डब्यात किंवा बाटलीत व्यवस्थित साठवून ठेवावी आणि त्यात कोणतीही भेसळ केलेली नाही याची खात्री करावी. आम्ही तुम्हाला सांगू की मध वर्षानुवर्षे टिकू शकते कारण त्यात पाण्याचे प्रमाण खूपच कमी असते आणि सूक्ष्मजीवांच्या वाढीसाठी पाण्याची गरज असते. याच कारणामुळे मध लवकर खराब होत नाही आणि असे पदार्थ लवकर खराब होतात ज्यात लिक्विड पेय पदार्थ किंवा असे घटक ज्यामध्ये पाणी वापरले जाते.
(वाचा :- Diabetes diet tips : खाणं तर दूरच, ‘हे’ 6 पदार्थ चाटूनही बघू नका, नाहीतर होऊ शकतो मृत्यूला निमंत्रण देणारा डायबिटीज!)
मीठ

मीठ हा एक असा अन्नघटक आहे जो कधीही खराब होत नाही. हेच कारण आहे ज्यामुळे मिठाचा वापर लोणची, चटण्या आणि ड्राय स्नॅक्स संरक्षित ठेवण्यासाठी केला जातो. पण हे केवळ तेव्हाच शक्य आहे जेव्हा मीठ आयोडीन किंवा इतर पदार्थांमध्ये मिसळलेले नसेल. कारण असे झाल्यावर मिठाचे नैसर्गिक गुणधर्म बदलू शकतात. समुद्राच्या पाण्यातून मीठ तयार होते हे तुम्हाला माहीत असेलच. त्यामुळे त्याची खरी चव कधीच मिळत नाही. परंतु मीठ जमा होण्यापासून रोखण्यासाठी ते एडिटिव्स आणि फोर्टिफाइड पदार्थांनी मजबूत केले जाते, ज्यामुळे मिठाची शेल्फ लाइफ 5 ते 6 वर्षांनी कमी होते.
(वाचा :- Bappi Lahiri Death : घोरण्याशी संबंधित ‘या’ विचित्र आजारामुळे झाला बप्पी लहरींचा मृत्यू, या लोकांना असतो याचा सर्वाधिक धोका!)
साखर

कितीही दिवस अशीच साठवून ठेवली तरीही साखरेचा स्वाद व ती कधीच खराब होत नाही. तुम्ही ती वर्षानुवर्षे साठवून ठेवू शकता, त्यात असलेले पोषक तत्व कधीही नष्ट होत नाहीत.
(वाचा :- Quick weight loss tips : संपूर्ण शरीरावरची चरबी जाईल झटक्यात जळून, करा ‘ही’ 6 अतिमहत्त्वाची कामे!)