जारी झालेल्या नोटिफिकेशननुसार, इयत्ता दहावीची परीक्षा २४ जून रोजी संपणार आहे आणि इयत्ता बारावीची परीक्षा १५ जून रोजी संपणार आहे. इयत्ता दहावी आणि बारावीच्या टर्म २ परीक्षा २६ एप्रिल २०२२ पासून सुरू होणार आहेत. परीक्षा यंदा सकाळी १०.३० वाजल्यापासून सुरू होतील. परीक्षा दोन सत्रात होणार नाहीत. परीक्षेशी संबंधित अधिक माहिती बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे. बोर्डाने म्हटले आहे की, सीबीएसई २६ अन्य देशांमध्ये टर्म २ बोर्ड परीक्षा आयोजित करत आहे. त्यामुळे परीक्षा दोन सत्रात होणार नाहीत. त्यामुळे बोर्ड परीक्षा सकाळी साडे दहा वाजता सुरू होणार आहेत.
सीबीएसईने शेड्युलसोबत विद्यार्थ्यांना फेक न्यूज संदर्भातही अलर्ट केले आहे. बोर्डाने म्हटले आहे की बारावीच्या टर्म १ परीक्षा २०२२ चा निकाल शुक्रवारी ११ मार्च रोजी जाहीर केला जाणार नाही. हा निकाल ११ मार्च रोजी दुपारी २ वाजता जाहीर होईल अशा बातम्या व्हायरल होत होत्या. विद्यार्थी या निकालाची गेले अनेक दिवस आतुरतेने वाट पाहत आहेत.
सीबीएसई इयत्ता दहावीच्या टर्म-१ परीक्षा ३० नोव्हेंबर ते ११ डिसेंबर २०२१ या कालावधीत देशभरातील परीक्षा केंद्रांवर आयोजित करण्यात आल्या होत्या. इयत्ता बारावीच्या टर्म १ परीक्षा १ डिसेंबर ते २२ डिसेंबर २०२२ या कालाधीत आयोजित करण्यात आल्या होत्या.