तुम्ही आहाराबाबतचे काही नियम पाळले तर अनेक आजारांपासून आणि शारीरिक समस्यांपासून सहज दूर राहू शकाल. योग शिक्षक आशिष चौधरी यांनी अन्न खाण्याचे 8 नियम सांगितले आहेत. आशिष चौधरी म्हणतात की हे नियम अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि ते महर्षी चरक यांनी आहारविषयक शास्त्राच्या रुपात ते लिहिले आहेत. त्यामुळे पुढच्या वेळी तुम्ही जेवण कराल तेव्हा या नियमांचे अवश्य पालन करा. (फोटो सौजन्य :- iStock)
उष्णम
तुम्ही खात असलेले अन्न ताजे असावे आणि चांगले शिजवलेले असावे. लक्षात ठेवा अन्न गरम असतानाच सेवन करावे. ते थंड करण्याची चूक करू नका.
(वाचा :- Cholesterol Medicine शास्त्रज्ञांचा खुलासा, रक्तातील 60% कोलेस्ट्रॉल साईड इफेक्टविना गाळून बाहेर फेकतो हा उपाय)
स्निग्धा
मानवी शरीर 7 उतींपासून बनलेले आहे, त्यापैकी 6 मध्ये स्निग्ध गुणधर्म आहेत. असा सल्ला दिला जातो की तुम्ही तुमच्या जेवणात थोडे तेल, तुपाचे सेवन करा, पण तुमची पचनशक्ती मजबूत आहे याचीही काळजी घ्या, अन्यथा कफाचे विकार उद्भवू शकतात. त्याच वेळी, अन्नासोबत थोडे कोमट द्रव/पाणी घेण्याचाही सल्ला दिला जातो. अन्नाचे 3 घास खाल्ल्यानंतर 1 घोट कोमट पाणी पिण्याची शिफारस केली जाते, जेणेकरून अन्न लवकर पचते.
(वाचा :- फुफ्फुसे आणि घशात धूळ साचल्याने होतो कॅन्सर आणि अस्थमा, या 2 उपायांनी सर्व घाण कचरा फेकला जातो मुळापासून बाहेर)
मात्रा
तुम्ही योग्य प्रमाणातच अन्न खावे. भूक लागण्यापेक्षा जास्त खाल्ल्यास पोटात अस्वस्थता, इंद्रियांचा असंतोष, बसण्यात अडचण आणि इतर समस्या उदभवू शकतात. तुम्ही तुमच्या भुकेच्या 50% घन पदार्थ + 25% द्रवपदार्थात वापरावे. उर्वरित पचनासाठी, 25% पोट रिकामे ठेवावे.
(वाचा :- बापरे, मेंदूपासून हाडांपर्यंत अनेक मोठ्या अवयवांचा भुगा करते सेरोटोनिनची कमी,पोट साफ होण्यासाठी खा हे 5 पदार्थ)
जिरणे
म्हणजे आधीचे जेवण पचल्यानंतरच खावे. पूर्वीचे अन्न पचण्याआधी कोणत्याही व्यक्तीने पुन्हा अन्न खाल्ले तर न पचलेल्या अन्नाचा पाचक रस अनेक रोगांचे मूळ बनू शकतो.
(वाचा :- Satish Kaushik यांनी काल केला होळीचा आनंद साजरा व आज हार्ट अटॅकने मृत्यू, वाढलेलं वजन ठरलं हार्ट अटॅकचं कारण?)
जेवणाच्या ठिकाणाची घ्या काळजी
योगशिक्षक आशिष यांच्या म्हणण्यानुसार, तुम्ही ज्या ठिकाणी बसून जेवण खात आहात त्या ठिकाणाची सुद्धा काळजी घ्यायला हवी. जर तुम्ही आनंददायी आणि आरामदायी वातावरणात आहार घेत असाल तर ते शरीरासाठी खूप चांगले आहे.
(वाचा :- किडनी 90% पेक्षा जास्त सडल्यास दिसतात ही घातक लक्षणं, रक्तातील घाण बाहेर फेकण्यासाठी करावीच लागते ही प्रक्रिया)
आहारात सर्व रसांचा समावेश असावा
आयुर्वेदात सांगितले आहे की आहारात सहा रस आहेत आणि आपण आपल्या आहारात या सर्व रसांचा समावेश केला पाहिजे. याशिवाय अन्नामध्ये पोषक तत्वांचा समतोल असायला हवा.
(वाचा :- World Kidney Day: किडनी खराब झाल्यास दिसतात ही 8 लक्षणं, लघवीत जळजळ, फेसाळपणा, फिकट रंग दिसल्यास करा हे 4 उपाय)
घाईघाईत भोजन करू नये
घाई करून कधीही काहीच खाऊ नये. कारण, असे केल्याने ते शरीरात चुकीच्या पद्धतीने प्रवेश करते आणि नीट पोहोचू शकत नाही. घाईत खाल्ल्याने वात वाढून पचनावर परिणाम होतो.
(वाचा :- H3N2 Virus Cough Fever Home Remedies : नव्या व्हायरसचं जगावर सावट, ताप व खोकला सुरू होताच करा हे 8 घरगुती उपाय)
खाताना ह्या दोन गोष्टी करू नका
योगशिक्षक आशिष सांगतात की तुम्ही जे अन्न खात आहात ते पुढील 20 मिनिटांत तुमच्या शरीराचा एक भाग बनेल. म्हणूनच अन्न मनापासून आणि कृतज्ञतेने खा आणि जेवताना बोलू नका, हसू नका आणि अन्न नीट चावूनच नका.
(वाचा :- International Women’s Day वयाच्या 30 आधीच खायला घ्या हे Vitamins व Mineral, नाहीतर येईल अंथरूणात खिळण्याची वेळ)
डिस्क्लेमर: हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा