नवऱ्याचा घाणेरडा स्वभाव बदलायचाय? मग सुधा मूर्तींनी सांगितलेला हा गुरूमंत्र वाचाच

Relationship Tips : लग्न ही आपल्या आयुष्यातील खूप महत्त्वाची घटना असते. लग्नानंतर आयुष्य बदलून जाते. आपल्या आयुष्यात एखाद्या व्यक्तीला जागा देणे ही गोष्ट सोपी नसते. एखादे नाते टिकवून ठेवण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. पण आज कालच्या जगात गोष्टी फार बदल्या आहेत. आपल्या जोडीदारामध्ये हवे असणारे गुण नसल्यास चिडचिड होणं ही खूपच समान्य गोष्ट आहे. पण या गोष्टीचा थेट परिणाम वैवाहिक जीवनावर होतो. पण हे असतानाच दुसरीकडे मात्र सुधा मूर्तीसारख्या महिला आपल्याला कपल गोल्स देताना दिसतात.
जर तुम्हाला सुखी आयुष्य जगणायचे असेल तर यासाठीच लेखीका सुधा मूर्ती यांनी काही टिप्स दिल्या आहेत. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या गोष्टी. (फोटो सौजन्य :- Istock, @sudha_murthy_official)

स्वत:त बदल करा​

स्वत:त बदल करा​

सुधा मुर्तीं सांगतात की इतरांमध्ये बदल करण्याआधी स्वत:मध्ये बदल करा. आयुष्यात खूप संकटे येतात या काळात तुम्ही स्वत:ला बदला. कारण समोरच्या व्यक्तीमध्ये किंवा त्यांच्या विचारात बदल करण्यापेक्षा स्वत:मध्ये बदल केलेला केव्हाही चांगले.

हेही वाचा :  VIDEO : नारायण राणेंची खासदारकीही जाऊ शकते; 'खुपते तिथे गुप्ते' मध्ये संजय राऊतांच्या वक्तव्यानं एकच खळबळ

​सुधा मूर्तींनी सांगितलेला गुरूमंत्र

एकमेकांच्या विभिन्न गोष्टींचा आदर करा​

एकमेकांच्या विभिन्न गोष्टींचा आदर करा​

सुधा मूर्तीनी एका मुलाखती दरम्यान सुखी जीवनासाठी एकमेकांच्या विभिन्न गोष्टींचा आदर करण्याचा सल्ला दिला. दोन व्यक्ती कधीच एकमेकांसारख्या नसतात. प्रत्येक व्यक्ती वेगळा आहे. त्यामुळे प्रत्येक जीवाचा आदर करा. यामुळे तुमच्या नात्याला नवे तेज येईल. आणि नात्यातील वाद कमी होण्यास मदत होईल. त्यामुळे एकमेकांच्या विभिन्न गोष्टींचा आदर करा.

पती असं का वागत आहे या गोष्टीचा विचार

पती असं का वागत आहे या गोष्टीचा विचार

तुमचा पती असं का वागत आहे या गोष्टीचा विचार करा. तुम्हाला त्यांची कोणती गोष्ट आवडत नसल्यास तसं त्यांनी स्पष्टपणे सांगा यामुळे तुमचे नाते घट्ट होण्यास मदत होईल.

नकारात्मक गोष्टींचा विचार करू नका​

नकारात्मक गोष्टींचा विचार करू नका​

कोणतेही नाते सकारात्मक विचारांवर अवलंबून असते तुम्ही कसा विचार करताया यावर तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या असंख्य गोष्टी अवलंबून असतात. त्यामुळे तुमच्या डोक्यातील नकारात्मक विचार बदलून टाका यामुळे तुम्हाला कोणताच फायदा होणार नाही.

तुमच्याकडे जे आहे त्याबद्दल कृतज्ञ राहा

तुमच्याकडे जे आहे त्याबद्दल कृतज्ञ राहा

तुमच्याकडे ज्या गोष्टी आहेत त्याबद्दल कृतज्ञ राहा. तुमच्या आयुष्यात ज्या गोष्टी आहेत त्या कोणाकडेच नाही आहेत ही गोष्ट लक्षात घ्या. ज्यावेळी तुम्ही असा विचार करू लागाल तेव्हा तुमचे संपूर्ण आयुष्य बदलून जाईल.

हेही वाचा :  नणंद आणि भावजयीचे नाते होईल अधिक मैत्रीचे, ईशा-श्लोका अंबानीच्या नात्यातून घ्या प्रेरणा



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …