गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! Wipro च्या इक्विटी शेअर बायबॅकवर सर्वांच्या नजरा, काय असतील निकाल?

Wipro Q4 Results on 27th April: आयटी क्षेत्रात सध्या मोठ्या प्रमाणात उलाढाल होते आहे. मागील वर्ष हे शेअर मार्केटमध्ये बॅंकिंग आणि आयटी क्षेत्रातील होतं असं म्हणायला हरकत नाही. या दोन क्षेत्रात शेअर्स (Wipro News) चांगल्या प्रकारे कामगिरी करत होते. त्यामुळे गुंतवणूकदारांसाठी चांगली संधी निर्माण झाली होती. आता याच क्षेत्रातील एका मोठ्या आयटी कंपनीनं लवकरच शेअर बायबॅकची घोषणा करू शकते. काल कंपनीची बॉर्ड मिटिंग संपन्न झाली. त्या बोर्ड मिटिंगमध्ये विस्तृत काही मुद्द्यावर चर्चा झाली ज्यात पुढील आठवड्यात शेअर बायबॅकचा (Wipro Share Price) जो प्रस्ताव मांडण्यात आला त्यावर लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याचे या बॉर्ड मिटिंगमध्ये सांगितले गेले. 

काही दिवसांपुर्वी टीसीएस म्हणजे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) आणि इन्फोसिस (Infosys) या कंपन्यांनीही त्यांच्या तिमाहीतील निकाल जारी केले होते. त्यांच्या शेअर्समध्येही मोठी चढउतार पाहायला मिळाली आहे. त्यामुळे आता विप्रो ही तिसरी आयटी कंपनीनं असेल जी या महिन्यात आपल्या तिमाहीतील काही निकाल प्रदर्शित करणार आहे. सध्याचे हे निकाल फारतर समाधानकारक आहेत. त्यातून या कंपनीनं आता शेअर बायबॅकची घोषणा केली आहे जी प्रस्तावही लवकरच मंजूर होईल हेही पाहायला मिळणार आहे. ही कंपनी येत्या 27 एप्रिल रोजी पुन्हा आपल्या निकालांचे प्रदर्शन करेल आणि तेव्हा या प्रस्तावरही निर्णय देईल. 

हेही वाचा :  सूर्याकडे यशस्वी वाटचाल! कुठपर्यंत पोहोचले आदित्य एल-1; इस्रोने दिली माहिती

शेअर बायबॅक म्हणजे काय? 

शेअर बायबॅक (What is Buyback) हा संज्ञा तुम्ही ऐकली असेल. परंतु त्याचा अर्थ आणि वापर नक्की काय असतो आणि त्याचा फायदा आपल्याला कसा होतो? मुळात शेअर बायबॅकचा अर्थ असा की, समजा अमुक एखादी कंपनी ही आपल्याकडे असलेल्या शेअरची संख्या कमी करत असले आणि आपल्या कंपनीतले थकबाकीतले शेअर्स जर का खरेदी करत असेल तर याचा अर्थ ती कंपनी बायबॅकचा विचार करते आहे. या सोप्पा अर्थ असा की ही कंपनी स्वत:तच गुंतवणूक करणार असते परंतु बायबॅकद्वारे.

कंपनी आपलेच थकबाकीतले शेअर हे बाजारभावापेक्षा (Market Price) जास्त किंमतीला खरेदी करते. म्हणजे समजा एका शेअरची कंपनी ही 25 रूपये असेल तर तो शेअर हीच कंपनी 30 किंवा 27 रूपयांनाही खरेदी करू शकते. तो हक्क कंपनीकडे असतो. यातून कंपनी आपल्या भागधारकांना पैसे करत करते. 

हे बायबॅक गुंतवणूकदारांसाठी किती फायदेशीर असते? 

जर एखाद्या कंपनीनं बायबॅक करण्याचा निर्णय घेतला तर त्या कंपनीच्या शेअरच्या किमती या खुल्या बाजारात वाढू शकतील. मुळात या बायबॅकचा हाच उद्देश असतो की शेअरच्या मुल्यांमधील घसरण ही थांबवणे. त्यामुळे याचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या गुंतवणूकदारांना चांगला फायदा होतो. यामुळे गुंतवणूकदारांचाही (Investors) विश्वास वाढतो. 

हेही वाचा :  Maharashtra Politics : फडतूस बोलण्यामागचा माझा उद्देश काय होता? भर सभेत उद्धव ठाकरे यांचा जाहीर खुलासा

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

राज ठाकरे खरंच दुपारी झोपेतून उठतात का? स्वत: खुलासा करत म्हणाले, ‘माझ्याबद्दल…’

Raj Thackeray Morning Wake Up Time: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या त्यांनी लोकसभा …

लोकांना हसवून करा ‘इतकी’ कमाई! स्टॅंडअप कॉमेडीमध्ये करिअरची सर्व माहिती

Career in Standup Comedy: तुम्हाला लोकांना हसवायला आवडतं? तुम्ही लोकांना हसवू शकता? तुम्हाला लाफ्टर शो …