कमी निकाल लागणाऱ्या ७९ शाळांवर ‘वॉच’

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे जिल्ह्यातील दहावी, बारावीच्या शाळांचा यंदा निकाल ९६ टक्क्यांपर्यंत लागला असला, तरी जिल्ह्यांमध्ये ८० टक्क्यांपेक्षा कमी टक्क्यांचा निकाल लागलेल्या ७९ शाळांवर आता ‘वॉच’ ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी आता माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांचा निकाल वाढविण्यासाठी कृती कार्यक्रम आराखडा तयार करण्याच्या सूचना मुख्याध्यापकांना दिल्या आहेत. त्या संदर्भात जिल्हा परिषदेने ७५ दिवसांचा समग्र गुणवत्ता विकास कार्यक्रम हाती घेतला आहे.

या संदर्भात माध्यमिक, उच्च माध्यमिकच्या मुख्याध्यापकांनी २० नोव्हेंबरपूर्वी कृती कार्यक्रम तयार करून तो ‘माध्यमिक’च्या शिक्षणाधिकाऱ्यांना पाठविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी परिपत्रक जारी केले आहे. निकाल वाढविण्यासाठी काही उपाययोजना हाती घेण्यात येणार आहे.

कृती कार्यक्रम काय?

– परीक्षेचा अर्ज भरलेले सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण होण्यासाठी नियोजन व कार्यवाही करणे.

– प्रथम श्रेणीतील विद्यार्थ्यांमध्ये पाच टक्क्यांहून अधिक वाढ करणे.

– अत्युच्च एकूण गुणांची टक्केवारी मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांच्या टक्केवारीत पाच टक्के वाढ करणे.

– अत्युच्च गुण मिळविणाऱ्या विद्यार्थी संख्येत पाच टक्क्यांहून वाढ करणे.

– तज्ज्ञ शिक्षकांची समिती स्थापन करणे.

हेही वाचा :  इंडिया एक्जिम बँकेत मॅनेजमेंट ट्रैनी पदांची भरती

TMC Recruitment: ठाणे पालिकेत नोकरीची संधी, थेट मुलाखतीतून होणार निवड

Scholarship: पाचवी, आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा १२ फेब्रुवारीला
जिल्ह्यातील ८० टक्क्यांपेक्षा कमी गुण मिळविलेल्या ७९ शाळांची गुणवत्ता वाढविण्यासाठी जिल्हा शिक्षण संस्थेच्या प्राचर्यांनी एक समिती स्थापन करण्याची सूचना केली आहे. त्यात दोन वरिष्ठ अधिव्याख्याता, ‘प्राथमिक’, ‘माध्यमिक’चे शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकाऱ्यांसह १०० टक्के निकाल लागलेल्या शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षकांचा समावेश आहे.

– सुनंदा वाखारे,

शिक्षणाधिकारी माध्यमिक, जिल्हा परिषद

‘गुणवत्तावाढीसाठी कृती कार्यक्रम’

‘पुणे जिल्ह्यात अनुदानित आणि अंशतः अनुदानित अशी एकूण एक हजार ६५८ विद्यालये आहेत. यंदाच्या दहावीच्या परीक्षेत एकूण एक लाख ३६ हजार २७४ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी एक लाख ३० हजार ३८६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले, तर बारावीत एकूण एक लाख २४ हजार ७२१ विद्यार्थ्यांपैकी एक लाख १३ हजार ९७४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. जिल्ह्याचा हा निकाल ९६ टक्के इतका होता. मात्र, ६० माध्यमिक विद्यालयांचा आणि १९ उच्च माध्यमिक विद्यालयांसह एकूण ७९ शाळांचा निकाल ८० टक्क्यांहून कमी लागला आहे. वर्गात उत्तीर्ण होणाऱ्यांचे प्रमाणही कमी आहे, तर केवळ उत्तीर्णांचे प्रमाण अधिक आहे. ही दरी कमी करण्यासाठी कृती कार्यक्रम हाती घेण्यात येत आहे,’ असे जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी सुनंदा वाखारे यांनी सांगितले.

हेही वाचा :  विद्यापीठांनी गुणवत्ता आणि शैक्षणिक शिस्तीचे नियोजन करा-राज्यपाल

पालिकेच्या शाळांमध्ये माध्यमिकचे शिक्षण, हजारो गरीब विद्यार्थ्यांना होणार फायदा

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत फायरमन पदांची भरती

Pimpri Chinchwad Municipal Corporation Invites Application From 150 Eligible Candidates For Fireman Posts. Eligible Candidates …

अहमदनगर जिल्हा न्यायालय अंतर्गत सफाईगार पदांची भरती

Ahmednagar District Court  Bharti 2024 – Ahmednagar District Court Invites Application From 02 Eligible Candidates …