शालेय विद्यार्थ्यांसाठी टिप्स
शाळेत शिकणारे विद्यार्थी भविष्यात यूपीएससीची परीक्षा देण्याची इच्छा ठेवत असतील तर चांगली गोष्ट आहे. असे असले तरीही शालेय वयापासून खूप काळजी घेण्याची गरज नाही. यूपीएससीसाठी किमान वय २१ वर्षे आणि पदवीधर असणे आवश्यक आहे. त्यामुळे शाळकरी मुलांकडे पुरेसा वेळ असतो. यूपीएससी परीक्षेची तयारी आत्तापासून सुरू करू नका, फक्त तुमचा शालेय अभ्यास नीट करा, तुम्ही शाळेत एनसीईआरटीची पुस्तके नीट वाचलीत तर नंतर तयारी करण्यात कोणतीही अडचण येणार नाही.
अशा अनेक गोष्टी शाळेतच शिकवल्या जातात, ज्याचा यूपीएससी परीक्षेत खूप उपयोग होतो. मराठीसह इतिहास, भूगोल, समाजशास्त्र याचा अभ्यास आवडीने करा. हे भविष्यात तुम्हाला खूप उपयोगी येईल.
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी टिप्स
आपल्याला पुढे जाऊन यूपीएससी द्यायची आहे, हे कॉलेज वयात असतानाच अनेकजण मनाशी पक्क करतात. पदवीपासूनच त्याची तयारी सुरू होते. ग्रॅज्युएशनमध्ये तुम्ही असे विषय घेऊ शकता जे दोघांसाठी फायदेशीर आहेत. उमेदवाराला यूपीएससी परीक्षेची तयारी गांभीर्याने करायची असेल, तर पदवीच्या शेवटच्या वर्षाकडे दुर्लक्ष करु नका. कॉलेज वयात मिळालेल्या वेळेचा फायदा करुन घ्या. विविध स्पर्धांमध्ये सहभागी व्हा.