परीक्षा पे चर्चाच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी हे सहभागी झालेले विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांशी थेट संवाद साधतात. परीक्षेच्या तणावावर मात करण्यासाठी विद्यार्थ्यांना टिप्स शेअर करतात. या कार्यक्रमाद्वारे पंतप्रधान शिक्षण आणि करिअरशी संबंधित विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे देतात.
कोण करू शकतो नोंदणी ?
नववी ते बारावीपर्यंतचे विद्यार्थी परिक्षा पे चर्चा कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात. यासाठी विद्यार्थ्यांनी शेवटच्या तारखेची वाट न पाहता लवकरात लवकर नोंदणी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. ३० डिसेंबरनंतर प्राप्त झालेला कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही. अधिकृत वेबसाइटवर याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.
२०१८ पासून परीक्षा पे चर्चा कार्यक्रम
दरवर्षी परिक्षा पे चर्चा कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. त्याची सुरुवात २०१८ साली झाली. विशेष बाब म्हणजे परिक्षा पे चर्चा २०२३ स्पर्धेतील विजेत्यांना पंतप्रधानांसोबत कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. याशिवाय विद्यार्थ्याला प्रमाणपत्र आणि परीक्षेचे किटही देण्यात येणार आहे.
१.५ दशलक्षाहून अधिक लोक सहभागी
परीक्षा पे चर्चा २०२२ मध्ये १५ लाखांहून अधिक लोकांनी हजेरी लावली. यामध्ये विद्यार्थ्यांची संख्या १२ लाखांहून अधिक होती. तर १ लाख पालक आणि २.७१ लाखांहून अधिक शिक्षक सहभागी झाले होते. २०२२ मध्ये १ एप्रिल रोजी परिक्षा पे चर्चा आयोजित करण्यात आली होती.