Tag Archives: maharashtra news

सोलापूर जिल्हा दुध संघावर सत्ताधारी गटाचे पुन्हा वर्चस्व

सोलापूर : आर्थिक रसातळाला गेलेल्या सोलापूर जिल्हा दूध उत्पादक प्रक्रिया संघाची यंदाची निवडणूक अतिशय चुरशीची झाली. अखेर यात प्रस्थापित शेतकरी विकास पॅनलने बाजी मारून एकहाती वर्चस्व मिळविले. प्रतिस्पर्धी दूध संघ बचाव पॕनेलला दारूण निराशा पत्करावी लागली. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांच्या सुनेचाही पराभव झाला. वर्षानुवर्षे प्रस्थापित नेत्यांच्या ताब्यात असलेला जिल्हा सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघ अलिकडे आर्थिकदृष्ट्या डबघाईला …

Read More »

ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना शेतकऱ्याने पाठवले रक्ताने लिहिलेले पत्र

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या आंदोलनाचा देखील केला आहे पत्रात उल्लेख शेतकऱ्यांना दिवसा दहा तास वीज मिळावी यासह अन्य मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी येथे आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनास पाठिंबा दर्शवत आणि शेतकऱ्यांना दिवसा दहा तास वीज दिली जावी, या मागणीसाठी एका शेतकरी पुत्राने ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी चक्क स्वत:च्या रक्ताने पत्र लिहिले …

Read More »

खासदार संजय मंडलिक यांना मोठा दिलासा, उच्च न्यायालयाने फेटाळली लोकसभा निवडणुकीला आव्हान देणारी याचिका

कोल्हापूरमधील शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांच्या निवडणूक निकालाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. कोल्हापूरमधील शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांच्या निवडणूक निकालाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या या निकालामुळे खासदार संजय मंडलिक यांना दिलासा मिळाला आहे. २०१९ मध्ये झालेल्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांनी त्यांचे राष्ट्रवादीचे प्रतिस्पर्धी धनंजय …

Read More »

कोल्हापूर : पंचगंगा नदीत जल प्रदूषणामुळे मृत माशांचा खच ; पर्यावरणप्रेमी आणि ग्रामस्थांमध्ये संताप

मंडळाचे अधिकारी नीलेश नरवडे यांनी दूषित पाण्याचे, मृत माशांचे नमूने घेवून पंचानामा केला आहे. पंचगंगा नदी प्रदूषण प्रकरणी संबंधित घटकांवर कारवाई करण्याचे आश्वासन पर्यावरण मंत्र्यांनी देऊन आठवडा उलटण्याच्या आतच नदी मध्ये जल प्रदूषणामुळे मृत माशांचा खच पडल्याचे आढळून आले. याप्रकरणी पर्यावरणप्रेमी आणि ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. नेहमीप्रमाणे प्रदूषण नियंत्रण मंडळाने पंचनामा केला आहे. कोल्हापूरच्या पंचगंगा नदीच्या प्रदूषणाचा प्रश्‍न …

Read More »

बीडमध्ये विषबाधेतून दोन बहिणींसह ८ महिन्याच्या चिमुरड्याचा मृत्यू; आईची मृत्यूशी झुंज सुरू

बीड जिल्ह्यामध्ये विषबाधेतून दोन बहिणींसह ८ महिन्याच्या चिमुरड्याचा मृत्यू झालाय, तर आईची मृत्यूशी झुंज सुरू आहे. बीडमध्ये रात्रीच्या जेवणानंतर अचानक उलटी, मळमळ होऊ लागल्याने चौघांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यापैकी दोन बहिणींसह ८ महिन्याच्या भावाचाही मृत्यू झाल्याची घटना बागझरी (ता. अंबाजोगाई) येथे शनिवारी (२६ फेब्रुवारी) सकाळी घडली. आईची प्रकृती चिंताजनक असून तिच्यावर अंबाजोगाईतील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विषबाधा नेमकी …

Read More »

“राज्याच्या जनतेने आतापर्यंत इतका बेशर्म, नालायक मुख्यमंत्री पाहिला नाही की जो…”; भाजपा आमदाराचा तोल सुटला

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना बुधवारी (२३ फेब्रुवारी २०२२) सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आर्थिक गैरव्यवहार (मनी लॉन्डिरग) प्रकरणी अटक केली. न्यायालयाने त्यांना ३ मार्चपर्यंत ‘ईडी’ कोठडी सुनावली आहे. या कारवाईनंतर कालपासूनच राज्यभरामध्ये भाजपा नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी तर महाविकास आघाडीतील पक्ष या कारवाईला विरोध करण्यासाठी आंदोलन करत आहेत. राजीनाम्याबरोबरच नवाब मलिक यांच्याविरोधात दाऊदशी व्यवहार केल्याप्रकरणी देशद्रोहाचा गुन्हा …

Read More »

विमानतळाच्या आसपास बांधकाम परवाने पूर्ववत मिळण्याचा मार्ग मोकळा

पृथ्वीराज चव्हाण यांचे प्रयत्न फळास कराड :  कराड विमानतळापासून  २० किलोमीटरच्या परिघामध्ये बांधकाम परवान्यावर आलेल्या निर्बंधांमुळे हवालदिल झालेले बांधकाम व्यावसायिक व मिळकतदारांना दिलासा मिळाला आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी केंद्रीय हवाई उड्डाणमंत्री ज्योतिरादित्य शिंदे व संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेवून नेमकी वस्तुस्थिती त्यांच्या समोर मांडून यातील संदिग्धता संपवली आहे. दिल्लीमधील या गाठीभेटी व चर्चांवेळी कराडचे नगरसेवक, बांधकाम व्यावसायिक प्रतिनिधीही उपस्थित होते. …

Read More »

ईडीच्या धाडींवर मुख्यमंत्र्यांची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाले, “जणूकाही महाराष्ट्र देशातला सगळ्यात सडका…”!

“प्रत्येकाचे दिवस असतात, दिवस बदलतात”, असा सूचक इशारा देखील उद्धव ठाकरे यांनी यावेळी भाजपाला दिला आहे. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना नुकतीच ईडीनं आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अटक केली. या प्रकरणावरून राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असताना त्यावरून महाविकास आघाडीचं सरकार अस्थिर झाल्याचा देखील अंदाज बांधण्यात आला. भाजपाकडून तर पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांनंतर राज्यात सत्तापालट होण्याचे देखील संकेत दिले जात …

Read More »

शिवसेनेचा स्वभाव खरंच बदललाय का? उद्धव ठाकरेंनी दिलं स्पष्टीकरण; म्हणाले, “बाळासाहेबांचा काळ हा…”!

उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या बदललेल्या स्वरूपावर लोकसत्ताच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात भाष्य केलं आहे. राज्यात सत्तेत आल्यापासून शिवसेनेचा आक्रमकपणा कमी होऊन राजकारणात काहीसं सौम्य धोरण उतरल्याची चर्चा अनेकदा घडताना पाहायला मिळते. विशेषत: उद्धव ठाकरेंच्या पक्ष सांभाळण्याच्या आणि चालवण्याच्या शैलीवर नेहमीच राजकीय विश्लेषक निरनिराळे तर्क लढवत असतात. त्यासंदर्भात आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ‘लोकसत्ता’च्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री …

Read More »

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त भिलार येथे ‘स्वातंत्र्याच्या इतिहासाचे स्मरण’ कार्यक्रमाचे आयोजन

मुंबईतील मुख्य कार्यक्रमासह संपूर्ण महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अनुरुप कार्यक्रमांचे आयोजन मराठी भाषा गौरव दिनानिमित्त पुस्तकांच्या गावी भिलार (ता.महाबळेश्वर) येथे ‘स्वातंत्र्याच्या इतिहासाचे स्मरण’ यासह इतर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आहे. पुस्तकांचं गाव, भिलार या प्रकल्पात मराठी भाषाविषयक आणि साहित्यविषयक जाणिवा समृद्ध करणारे आणि वाचनसंस्कृती जोपासणारे कार्यक्रम वारंवार योजले जातात. तसेच मराठी भाषा गौरव दिनही उत्साहात साजरा केला जातो. कुसुमाग्रजांच्या जन्मदिनाचे (२७ फेब्रुवारी) …

Read More »

बीडमध्ये शासकीय कार्यालयाच्या आवारात भरदिवसा गोळीबार ; दोन जण जखमी

जमिनीच्या वादातून दोन गट आपसात भिडले ; कार्यालय परिसरात एकच खळबळ जमिनीच्या वादातून दोन गट आपसात भिडले आणि यावेळी एका गटाकडून झालेल्या गोळीबारात दोन जण जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी बीड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील मुद्रांक व नोंदणी शुल्क कार्यालयासमोर घडली. एकाच वेळी चार गोळ्या झाडल्या गेल्याने परिसरात खळबळ उडाली होती. गोळीबारात जखमी झालेल्या दोघांना प्राथमिक उपचारानंतर औरंगाबाद येथील रुग्णालयात पाठवण्यात …

Read More »

मंत्रालयात कधीपासून काम सुरू करणार? अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिलं उत्तर; म्हणाले, “मी पुन्हा…”!

लोकसत्ताच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विरोधकांना खोचक टोला लगावला आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजपाकडून शिवसेनेवर आणि मुख्यत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर घराबाहेर पडत नसल्याची टीका केली जात आहे. मध्यंतरी मुख्यमंत्र्यांच्या मानेवर शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांचा सामाजिक जीवनातला वावर वैद्यकीय सक्तीमुळे काहीसा कमी झाला होता. या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून मुख्यमंत्री घराबाहेर पडून काम करत नाहीत, मंत्रालयात जात नाहीत अशी टीका …

Read More »

Loksatta 74th Anniversary Live : ‘लोकसत्ता’चा ७४वा वर्धापन दिन सोहळा!

‘लोकसत्ता’च्या वर्धापन दिनासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विशेष उपस्थिती Loksatta 74th Anniversary Live, CM Uddhav Thackery : ‘लोकसत्ता’च्या ७४व्या वर्धापन दिनानिमित्ताने आज आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावली. ‘लोकसत्ता’ नरीमन पॉइंट येथे आयोजित या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांसोबत चंद्रकांत कुलकर्णी, प्रतिमा कुलकर्णी, अविनाश नारकर आणि मृणाल कुलकर्णी आदी मान्यवरांनी देखील विशेष उपस्थिती लावली असून यावेळी लोकसत्ता …

Read More »

“किरीट सोमय्या नावाचा नवीन शिपाई ईडीच्या कार्यालयात लागलेला दिसतोय, त्याला…”

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तसेच माजी आमदार अनिल गोटे यांच्या नेतृत्वाखाली धुळ्यामध्ये गांधी पुतळा येथे भाजपाविरोधात आणि केंद्र सरकारविरोधात आंदोलन करण्यात आलं. यावेळी केंद्र सरकार सत्तेचा गैरवापर करत असल्याचा आरोप करतानाच अनिल गोटे यांनी भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांच्यावरही निशाणा साधालाय. सोमय्या यांनी ‘डर्टी १२’ नावाने नेत्यांच्या यादीबद्दल मागील काही दिवसांपासून अनेकदा वक्तव्य केल्याच्या पार्श्वभूमीवर गोटेंनी त्यांच्यावर निशाणा साधलाय. …

Read More »

युक्रेनमधील महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांना सुरक्षित परत आणण्यासाठी राज्य सरकारकडून हालचालींना वेग

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी माध्यमांना दिली माहिती ; अहमदनगर जिल्ह्यातील अनेक विद्यार्थ्यांचा समावेश असल्याचं देखील सांगितलं आहे. रशिया-युक्रेन युद्धाची भीती अखेर खरी ठरली असून, रशियाने गुरुवारी युक्रेनवर चौफेर हल्ले केल़े त्यात ७४ लष्करी तळ उद्ध्वस्त झाले असून, ४० सैनिकांसह १० नागरिक ठार झाल़े. या युद्धखोरीचा निषेध करत पाश्चात्य देशांनी रशियावर आणखी निर्बंध लागू करण्याची घोषणा केली़. या घडामोडींमुळे युद्धाचा झाकोळ …

Read More »

रशिया-युक्रेन युद्धासंबंधी विचारताच उदयनराजे मोदी सरकारचा उल्लेख करत म्हणाले, “काही गोष्टी सांगाव्या…”

केंद्राने संपूर्ण पणाला लावलं पाहिजे, उदयनराजेंचं आवाहन रशियाने युक्रेनविरोधात युद्ध पुकारल्यामुळे सध्या संपूर्ण जगामध्ये चिंतेचं वातावरण आहे. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही देशांमध्ये सुरु असलेला तणाव चर्चेच्या माध्यमातून कमी करण्याचा प्रयत्न सुरु असतानाच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी युद्धाची घोषणा केली आणि सर्वांनाच धक्का बसला. रशियाच्या निर्णयाविरोधात अमेरिकेसह अनेक देश एकटवले असून निर्बंध लावले आहेत. भारतातूनही यासंबंधी प्रतिक्रिया उमटत असून भाजपाचे …

Read More »

बीडमध्ये परळीत बहिण-भावाची हत्या, तर माजलगावमध्ये शिक्षकासह तिघांची आत्महत्या

बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात जिरेवाडी येथे वयोवृद्ध बहीण-भावाची हत्या करण्यात आल्याची घटना घडली. बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात गुरुवारी (२४ फेब्रुवारी) जिरेवाडी येथे वयोवृद्ध बहीण-भावाची हत्या करण्यात आल्याची घटना घडली. सटवा ग्यानबा मुंडे (६८), सुबाबाई ग्यानबा मुंडे (७०) अशी मृतांची नावे आहेत. दगडाने ठेचून ही हत्या करण्यात आली, अशी माहिती पोलिसांनी दिली. परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती. माजलगावमध्ये एकाच दिवशी …

Read More »

करोना र्निबंधातून लोकप्रतिनिधींना सूट?; सोलापुरात राजकीय नेत्यांकडून वारंवार उल्लंघन, पण कारवाई नाही

|| एजाज हुसेन मुजावर सोलापुरात राजकीय नेत्यांकडून वारंवार उल्लंघन, पण कारवाई नाही सोलापूर : करोनाविषयक लागू असलेले निर्बंध बडे लोकप्रतिनिधी आणि मंत्र्यांनी पाळायचे नसतात, नियम असतील तर ते पायाखाली तुडवायचे असतात, त्याची जणू मुभाच अशा प्रस्थापित लोकप्रतिनिधींसह मंत्री आणि राजकीय पुढाऱ्यांना मिळाली की काय, असे सोलापुरात करोनाकाळात वाटू लागले आहे. कायदा, नियम सर्वाना सारखाच असतो, असे म्हटले जात असले तरीही …

Read More »

“आता १० रुपयांच्या गोळ्या घेतानाही विचार करावा लागेल”, जितेंद्र आव्हाडांचा ईडीवर निशाणा; म्हणाले, “जेव्हा नितीन गडकरींवर…!”

नवाब मलिक यांना ईडीनं अटक केल्यानंतर जितेंद्र आव्हाडांनी नितीन गडकरींबद्दल घडलेला ‘तो’ प्रसंग सांगितला आहे. नवाब मलिक यांना ईडीनं अटक केल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाल्याचं दिसून येत आहे. महाविकास आघाडीकडून या प्रकाराचा निषेध केला जात असताना भाजपाकडून मात्र ईडीच्या कारवाईचं समर्थन केलं जात आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी नवाब मलिक यांच्या कन्या निलोफर मलिक खान …

Read More »

३०० कोटींची ‘ती’ जमीन, दाऊद, क्रिकेट सट्टा, हसिना पारकरसोबतची बैठक अन् अटक… मलिकांवर नेमका आरोप काय आहे?

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना बुधवारी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आर्थिक गैरव्यवहार (मनी लॉन्डिरग) प्रकरणी अटक केली. न्यायालयाने त्यांना ३ मार्चपर्यंत ‘ईडी’ कोठडी सुनावली आहे. मात्र नवाब मलिक यांच्याविरोधात अटकेची कारवाई झालेलं हे नेमकं काय आहे हेच अनेकांना ठाऊक नाही. त्यावरच टाकलेली नजर… आधी दाऊदच्या भावाला अटक…दाऊद इब्राहीम टोळी क्रिकेटवरील सट्टेबाजी आणि बांधकाम व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक …

Read More »