राज्यातील शिक्षकेतरांना आश्वासित प्रगती योजना; अनुकंपा तत्त्वावर नोकरीचा लाभ

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्यातील सुमारे ३० हजार शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळणार असून, लवकरच याबाबतचा निर्णय शालेय शिक्षण विभागाकडून होणार आहे. चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना अनुकंपा तत्त्वावर नोकरीचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. राज्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत नुकतीच मंत्रालयात बैठक पार पडली. या बैठकीत महत्त्वाच्या मुद्द्यांवर सकारात्मक निर्णय घेण्यात आले आहेत.

मंत्रालयात शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या अध्यक्षतेखाली माध्यमिक शाळांतील साधारण ३५ हजार शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला माध्यमिक विभागाचे शिक्षण संचालक महेश पालकर, कक्ष अधिकारी रोहिणी किरवे, उपसचिव, अधिकारी आणि महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनांचे महामंडळातील पदाधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत प्रामुख्याने शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ (दहा, वीस, तीस वर्षांच्या सेवेनंतर पदोन्नती आणि वेतनाचे लाभ) तत्काळ लागू करण्यात येईल, असा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतची सर्व माहिती शिक्षण संचालक पालकर यांच्यामार्फत मंत्रालयाकडे देण्यात आली आहे. चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना अनुकंपा तत्त्वावर नोकरीचा लाभ देण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली आहे. याबाबतचा निर्णय येत्या काही दिवसांत प्रसिद्ध करण्यात येईल. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीवर गेल्या अनेक वर्षांपासून बंदी आहे. त्यातच चार मे २०२०च्या पदभरती बंदच्या आदेशामुळे पदभरती खोळंबली आहे. त्यामुळे या निर्णयातून ही शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे वगळण्यासाठी प्रयत्न केले जाणार असून, लवकरच पदभरती करण्यात येईल. याबाबतचे निर्णय येत्या महिन्यात प्रसिद्ध होतील, असे आश्वासन मंत्री आणि अधिकाऱ्यांनी दिल्याचे महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनांचे महामंडळाचे सरचिटणीस शिवाजी खांडेकर यांनी सांगितले.

हेही वाचा :  बोगस क्रीडा प्रमाणपत्रासंबंधी कारवाई टाळता येऊ शकते, करावे लागेल 'हे' काम

‘आरटीई’त २०० पेक्षा अधिक शाळांची नोंदणीच नाही

पूर्ण वेळ ग्रंथपाल होणार

राज्यात साधारण १५०० अर्ध वेळ ग्रंथपाल कार्यरत आहेत. मात्र, अर्ध वेळ तत्त्वावर काम करीत असल्याने, त्यांना सेवेचे लाभ मिळत नाहीत. त्यामुळे या ग्रंथपालांना पूर्ण वेळ करण्यासाठी पाचवीची विद्यार्थी संख्या धरून; तसेच दोन किंवा तीन शाळांची विद्यार्थीसंख्या ग्राह्य धरून पूर्ण वेळ करण्यासाठीचा निर्णय लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यामुळे शाळांमध्ये ग्रंथपाल उपलब्ध होतील, असेही खांडेकर यांनी सांगितले. चतुर्थ श्रेणी कर्मचारी भरतीबाबत ११ डिसेंबर २०२०चा निर्णय रद्द करून पूर्ववत चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची पदभरती करण्यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक लावून निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन बच्चू कडू यांनी दिल्याचे खांडेकरांनी सांगितले.

MPSC देणार पदभरतीतून बाहेर पडण्याचा पर्याय
Bank Job 2022: महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेत भरती
SSC HSC Exam 2022: दिव्यांग विद्यार्थ्यांची ‘परीक्षा’; पाच तास परीक्षा केंद्रावर!

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

महाराष्ट्र शासन पशुसंवर्धन विभाग अंतर्गत विविध पदांची भरती

Department of Animal Husbandry Government of Maharashtra Invites Application From 446 Eligible Candidates For Livestock …

भारतीय हवाई दलात कमीशंड ऑफिसर पदांची भरती

All Jobs, B.Com, B.E/B.Tech, B.Sc, BBA, BMS, CA, CS, Engineering, Graduate, Post Graudate Indian Air …