खासगी क्लासमध्ये बारावीची परीक्षा; पुण्यातील धक्कादायक प्रकार

म. टा. प्रतिनिधी, पुणे

बारावीच्या परीक्षेसाठीचे अधिकृत केंद्र असतानाही त्या केंद्रात परीक्षा न घेता थेट खासगी कोचिंग क्लासमध्ये परीक्षा घेण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. टिळक रस्त्यावरील राव कनिष्ठ महाविद्यालयात अधिकृत केंद्र असताना या महाविद्यालयातील बारावीचे ५१ विद्यार्थी कॅम्प परीसरातील सोलापूर बाजारातील एका खासगी क्लासमध्ये परीक्षा देताना आढळून आले.

राज्य मंडळाचे मुख्यालय असलेल्या पुणे शहरातच असे प्रकार घडत असतील, तर परीक्षेत गैरप्रकार का होणार नाहीत, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. पुण्यात टिळक रस्त्यावर एका इमारतीत राव कनिष्ठ महाविद्यालय आहे. या महाविद्यालयाला परीक्षा केंद्र म्हणून राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने मान्यता दिली आहे. असे असले तरी गेल्या काही दिवसांपासून या परीक्षा केंद्राच्या ठिकाणी स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांची अभ्यासिका चालवली जात असल्याचे उघडकीस आले. मनविसेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत कनोजिया यांनी या केंद्रावर जाऊन तपासणी केली असता हा प्रकार समोर आला. मग परीक्षेला बसणारे ५१ विद्यार्थी गेले कुठे, याचा शोध घेतल्यानंतर ते कॅम्प परीसरातील (सोलापूर बाजार) राव आयआयटी अकॅडमी येथे परीक्षा देत असल्याचे दिसून आले.

हेही वाचा :  Mumbai University: मुंबई विद्यापीठाची विद्यार्थीसंख्या घटली

परीक्षेचे केंद्र बदलण्याचा अधिकार नसताना राव कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रशासनाने हा सगळा खटाटोप कशासाठी केला, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. परीक्षेत होणारे गैरप्रकार थांबवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत, असे राज्य मंडळाकडून सांगण्यात येते. मात्र, राज्य मंडळाचे सर्व उच्चपदस्थ अधिकारी जिथे बसतात त्या मुख्यालयापासून केवळ तीन-चार किलोमीटर परिसरातील परीक्षेचे संपूर्ण केंद्रच बदलले जात असेल, तर परीक्षेवर राज्य मंडळाचे नियंत्रण राहिले आहे का, अशी विचारणा शिक्षण क्षेत्रातून होत आहे.

परीक्षा केंद्र म्हणून मान्यता असलेल्या जागी परीक्षा न होता परस्पर वेगळ्या ठिकाणी परीक्षा होत असल्याच्या प्रकाराची माहिती मिळाली आहे. आता विभागीय मंडळामार्फत या संदर्भात कारवाई करण्यात येईल.

– शरद गोसावी, अध्यक्ष, राज्य मंडळ

मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव

‘राव कनिष्ठ महाविद्यालयाने यापूर्वीही अनेक नियमांचे उल्लंघन केल्याने त्यांची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव गेल्या वर्षी शिक्षण विभागाकडे सादर करण्याता आला आहे,’ असे शिक्षण उपसंचालक औदुंबर उकीरडे यांनी सांगितले. अशा अनेक बोगस महाविद्यालयांची मान्यता रद्द करण्याचे प्रस्ताव शिक्षण विभागाकडे धूळ खात पडून असल्याने, असे प्रकार घडत असल्याची टीका शिक्षण विभागातील तज्ज्ञांकडून करण्यात आली आहे.

हेही वाचा :  HSC Exam 2022: बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात

परीक्षेचे केंद्र वेगळे आणि परीक्षा भलतीकडेच ही अत्यंत गंभीर बाब आहे. पुण्यासारख्या शहरात हा प्रकार घडतो ही लाजीरवाणी गोष्ट आहे. राज्य मंडळ, शिक्षण विभाग यांच्याकडून होत असलेल्या ढिसाळ कारभाराचे हे मूर्तीमंत उदाहरण आहे.

– प्रशांत कनोजिया, जिल्हाध्यक्ष, मनविसे

JEE Main आणि CBSE परीक्षा क्लॅश, वेगळ्या शहरांमध्ये परीक्षा केंद्र घेतल्यास अडचण

विद्यार्थ्यांना भयमुक्त वातावरणात परीक्षा देता यावी यासाठी प्रयत्न करा, शिक्षणमंत्र्यांचे आवाहन
ICAI कडून CA फाउंडेशन परीक्षेच्या तारखांमध्ये बदल

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत फायरमन पदांची भरती

Pimpri Chinchwad Municipal Corporation Invites Application From 150 Eligible Candidates For Fireman Posts. Eligible Candidates …

अहमदनगर जिल्हा न्यायालय अंतर्गत सफाईगार पदांची भरती

Ahmednagar District Court  Bharti 2024 – Ahmednagar District Court Invites Application From 02 Eligible Candidates …