IND vs SL Test : श्रेयस अय्यरची दमदार कामगिरी, अर्धशतक ठोकत नवा रेकॉर्ड केला नावावर

IND vs SL Test : भारत आणि श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्या बंगळुरुच्या (Bengaluru) एम चिन्नास्वामी स्डेडियमवर (M.Chinnaswamy Stadium) सुरु असलेल्या  डे-नाइट टेस्ट सामन्यात भारताने आघाडी घेतली आहे. सध्या सामन्यात श्रीलंकेला विजयासाठी 419 धावा तर भारताला विजयासाठी नऊ विकेट्सची गरज आहे. दरम्यान भारताच्या दुसऱ्या डावात युवा खेळाडू श्रेयस अय्यरने 67 धावा करत अप्रतिम अर्धशतक झळकावलं. त्यामुळे अय्यर डे-नाइट टेस्ट मॅचच्या दोन्ही डावात अर्धशतक झळकाणारा चौथा फलंदाज ठरला आहे.

सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी घेतली.  यावेळी श्रेयस अय्यरच्या 92 धावांनी भारतीय संघाचा डाव 252 पर्यंत पोहोचवला. ज्यानंतर भारतीय संघाला 252 धावांत बाद केल्यानंतर प्रत्युत्तरदाखल मैदानात उतरलेल्या श्रीलंका संघाची फलंदाजीही ढासळली. भारतीय गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्यापुढे लंकेच्या फलंदाजांनी नांग्या टाकल्या. एँजलो मॅथ्युजने 43 धावा केल्या. पण 109 धावांमध्ये श्रीलंकेचा डाव आटोपला. ज्यानंतर भारताने 303 धावांवर डाव घोषित केला. यातही श्रेयसने 67 धावा केल्या. ज्यामुळे डे-नाइट टेस्ट मॅचच्या दोन्ही डावात अर्धशतक झळकाणारा चौथा फलंदाज ठरला आहे. या यादीत डॅरेन ब्रावो, स्टीवन स्मिथ, मार्नस लाबुशेन हे खेळाडूही आहेत. यात श्रेयस एकमेव भारतीय आहे.  

हेही वाचा :  T20 World Cup 2022: यंदाच्या टी-20 विश्वचषकाच्या सुपर 12 फेरीतील अनपेक्षित निकाल

आतापर्यंत कसोटी

बंगळुरुच्या (Bengaluru) एम चिन्नास्वामी स्डेडियमवर (M.Chinnaswamy Stadium) सुरु असलेल्या या सामन्यात विजय मिळवून भारतीय संघ श्रीलंकेला क्लीन स्वीप देऊ शकतो. टी20 मालिकेप्रमाणे भारताकडे व्हाईट वॉश देण्याची ही नामी संधी आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ पहिलीच कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिला सामना भारतीय संघानं एक डाव आणि 222 धावांनी जिंकला होता. आता दुसऱ्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी घेतली. ज्यानंतर भारतीय फलंदाज खास कामगिरी करु शकले नाहीत. पण श्रेयस अय्यरच्या 92 धावांनी भारतीय संघाचा डाव 252 पर्यंत पोहोचवला. ज्यानंतर भारतीय संघाला 252 धावांत बाद केल्यानंतर प्रत्युत्तरदाखल मैदानात उतरलेल्या श्रीलंका संघाची फलंदाजीही ढासळली. भारतीय गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्यापुढे लंकेच्या फलंदाजांनी नांग्या टाकल्या. एँजलो मॅथ्युजचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला आपल्या लौकिकास साजेशी फलंदाजी करता आली नाही. मॅथ्युजने 43 धावांची खेळी केली.

भारताकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. तर मोहम्मद शामीला दोन तर अक्षर पटेलला एक विकेट मिळाली. दुसऱ्या दिवशी भारताने आणखी उत्तम गोलंदाजी करत 109 धावांत श्रीलंकेच्या संघाला गुंडाळले, ज्यानंतर पंतच्या दमदार अर्धशतकासह श्रेयसच्या 67 आणि रोहितच्या 46 धावांच्य़ा जोरावर 303 धावांवर डाव घोषित केला. दिवस संपताना बुमराहने एक विकेट घेतल्याने आता श्रीलंकेला विजयासाठी 419 धावांची गरज असून भारताला 9 विकेट्स मिळवण्याची गरज आहे,.

हेही वाचा :  पहिल्या दिवसाअखेर भारताची 357 धावांपर्यंत मजल; विराट 45 धावांवर बाद

हे देखील वाचा-

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

विराटचा फोन हरवल्यावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया, झोमॅटोवाले म्हणतात ‘अनुष्काचा फोन वापर’

Virat Kohli Lost Phone tweet : भारतीय संघाचा (Team India) माजी भारतीय कर्णधार विराट कोहली …

IND vs AUS : केएस भरत की ईशान किशन? कोणाला मिळणार प्लेईंग 11 मध्ये जागा?

IND vs AUS, Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना …