ठाण्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांची गळती

ठाणे : ग्रामीण भागातील शाळांमध्ये पटसंख्या वाढविण्यासाठी तसेच कमी पटसंख्यांच्या शाळा टिकविण्यासाठी लढा सुरू असतानाच २०२१-२२ मध्ये पाचवीमधील विद्यार्थ्यांची अडीच टक्क्यांनी तर आठवी इयत्तेमधील विद्यार्थ्यांची संख्या तब्बल साडेतीन टक्क्यांनी गळती झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामध्ये सर्वाधिक गळतीचे प्रमाण अंबरनाथ, उल्हासनगर, ठाणे, भिवंडी परिसरातील असून शहापूरमध्ये विद्यार्थ्यांच्या संख्येत भर पडलेली आहे. तर मुलांच्या तुलनेत मुलींच्या गळतीचे प्रमाण अधिक असल्याचेही दिसून येते.

ठाणे जिल्हा परिषदेच्या पहिली ते आठवीपर्यंतच्या एकूण १,३२८ शाळा असून यामध्ये ८० हजार ९९१ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत तर यामध्ये ४० हजार ३६९ मुले आणि ४० हजार ६२२ मुली शिक्षण घेत असल्याची नोंद शिक्षण विभागाकडे आहे. तर गेल्या चार वर्षांत प्रथम २०२१-२२ मध्ये पाचवी आणि आठवीमधील विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण वाढलेले शासकीय विभागाकडील अहवालावरून समोर आले आहे. करोनानंतर अनेक विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर फेकले गेले.

त्यानंतर शिक्षण विभागाकडून जुलैमध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणामध्ये ग्रामीण परिसरातील केवळ २४६ विद्यार्थी शाळाबाह्य असल्याचे आढळले होते, मात्र सरकारी विभागाकडे शिक्षण विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार पाचवीमध्ये २.५१ टक्के विद्यार्थी तर आठवीमधील ३.४५ टक्के विद्यार्थ्यांची गळती झाल्याचे सांगण्यात आले. गेल्या चार वर्षांतील ही सर्वाधिक गळती आहे. इतर इयत्तांमधील विद्यार्थ्यांची गळतीही अधिक असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

हेही वाचा :  'स्थलांतर प्रमाणपत्राअभावी शाळाप्रवेश थांबणार नाहीत'

दहावी, बारावी परीक्षा देणाऱ्यांसाठी महत्वाची अपडेट

नववीनंतर मुलींच्या शिक्षणातील गळतीमागे नापास होण्याच्या कारणाबरोबरच स्थलांतर, मुलींना दुय्यम वागणूक, सामाजिक रूढी परंपरा, लवकर विवाह, वयात आलेल्या मुलींची असुरक्षितता, शाळा असूनही घरातील आर्थिक व सामाजिक परिस्थिती ही कारणंही मुलींच्या गळतीमागे असल्याचे पुढे येत आहे. मात्र आता मुलींबरोबरच मुलांचेही गळतीचे प्रमाण अधिक असल्याचे अधोरेखित होत आहे.

एखादा विद्यार्थी सलग तीस दिवस गैरहजर राहिल्यास त्याची गणना गळतीमध्ये होते. ग्रामीण भागामध्ये दिवाळीनंतर रोजगारासाठी होणारे स्थलांतर हे त्या मागचे मोठे कारण आहे. करोना काळानंतर रोजगाराअभावी अनेक कुटुंबांचे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर झाल्याने गळतीचे प्रमाण वाढलेले दिसत असले, तरी गावात वीटभट्टी किंवा इतर कारणांनी स्थलांतरित होऊन आलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
विनोद लुटे, शिक्षक, शहापूर

गळतीचे प्रमाण टक्केवारीमध्ये

वर्ष ५ वी मुले ५ वी मुली एकूण ८ वी मुले ८ वी मुली एकूण

२०१८-१९ ० ० ० ०.०२ ०.०२ ०. ०२

२०१९-२० ० ० ० ०.०२ ०.०२ ०.०२

२०२०-२१ ०.०३ ०.०२ ०.०२ ०.०४ ०.०४ ०.०४

२०२१-२२ २.३४ २.६९ २.५१ ३.८२ ३.०३ ३.४५

हेही वाचा :  HSC Board Exam: बारावी परीक्षेचा पहिला पेपर सुरळीतपणे सुरु

धक्कादायक! मराठी शाळांची पटसंख्या आली निम्म्यावर

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत फायरमन पदांची भरती

Pimpri Chinchwad Municipal Corporation Invites Application From 150 Eligible Candidates For Fireman Posts. Eligible Candidates …

अहमदनगर जिल्हा न्यायालय अंतर्गत सफाईगार पदांची भरती

Ahmednagar District Court  Bharti 2024 – Ahmednagar District Court Invites Application From 02 Eligible Candidates …