‘स्थलांतर प्रमाणपत्राअभावी शाळाप्रवेश थांबणार नाहीत’

School admissions : ‘शाळा स्थलांतर प्रमाणपत्राअभावी शालेय विद्यार्थ्यांचे प्रवेश थांबणार नाहीत’, अशी ग्वाही शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी मंगळवारी दिली. पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांचे प्रवेश सुलभ होण्यासाठी याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

‘राज्यातील कोणत्याही अभ्यासक्रमाच्या प्राथमिक वा माध्यमिक शाळेत पहिली ते दहावीच्या वर्गात प्रवेशासाठी अन्य शाळेतून आलेला विद्यार्थी मागणी करीत असेल, अशा विद्यार्थ्याला आता सुलभ प्रवेश घेता येणार आहे. शाळा स्थलांतर प्रमाणपत्राअभावी (टीसी) अशा विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात येऊ नये’, असे आवाहन केसरकर यांनी केले. ‘शिक्षण हक्क कायद्यात शाळाप्रवेश न झालेल्या विद्यार्थ्यास वयानुरूप वर्गामध्ये प्रवेश देण्यात येईल, असे नमूद आहे. अशा प्रवेशासाठी वयाचा पुरावा ग्राह्य धरण्याची तरतूद आहे. त्यामुळे जन्मतारखेचा दाखला पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येऊन विद्यार्थ्यांना वयानुरूप वर्गामध्ये प्रवेश देण्यासाठी शिक्षण विभागाने शासन निर्णय जारी केला आहे’, असे त्यांनी नमूद केले.

या शासन निर्णयानुसार राज्यातील कोणत्याही शासकीय/ महानगरपालिका/ नगरपालिका/ खाजगी अनुदानित/ कोणत्याही व्यवस्थापनाकडून स्वयंअर्थसहाय्यित तत्त्वावर चालविण्यात येणाऱ्या तसेच कोणत्याही भारतीय वा परदेशी अभ्यासक्रम अथवा मंडळास संलग्न असलेल्या प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गात तसेच माध्यमिक शाळेत इयत्ता नववी आणि दहावीच्या वर्गात अन्य शाळेतून आलेला विद्यार्थी प्रवेशासाठी मागणी करीत असेल अशा विद्यार्थ्यास शाळा स्थलांतर प्रमाणपत्राअभावी (टीसी) (Transfer Certificate) प्रवेश नाकारण्यात येऊ नये असे स्पष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचा :  TET Scam: शिक्षकांच्या कागदपत्रांची तपासणी सुरू

विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही, तसेच शिक्षण खंडीत होऊन विद्यार्थी शाळाबाह्य होऊ नये याची दक्षता संबंधित शाळा प्रमुखांनी/ मुख्याध्यापकांनी घ्यावयाची आहे. असे विद्यार्थी वंचित ठेवल्यास संबंधित शाळेविरूद्ध/ मुख्याध्यापकाविरूद्ध नियमानुसार/ कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येणार आहे. या शासन निर्णयाप्रमाणे एखाद्या विद्यार्थ्याने नवीन शाळेत प्रवेश घेतल्यास अशी नवीन शाळा विद्यार्थ्याची सरल पोर्टलवरील माहिती मिळविण्याची विनंती जुन्या शाळेकडे करेल आणि जुनी शाळा सात दिवसाच्या आत विनंती मान्य करेल. शाळेने अशी विनंती मान्य न केल्यास संबंधित केंद्र प्रमुख अशी विनंती त्यांच्या स्तरावरून मान्य करतील, असेही या शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे.

राज्यातील १९ लाख विद्यार्थ्यांकडे आधारकार्ड नाही, शिक्षण विभागाच्या मोहिमेतून माहिती समोर

‘आधार’ नसेल तर विद्यार्थ्यांना प्रवेश द्यायचा नाही का?
करोना प्रादूर्भावानंतर काही कारणांमुळे एखाद्या विद्यार्थ्यास त्याच्या खाजगी शाळेतून शाळा स्थलांतर प्रमाणपत्र (टीसी) (Transfer Certificate) किंवा शाळा सोडल्याचा दाखला (Leaving Certificate) देण्यात आला नसेल तर अशा विद्यार्थ्यांना शासकीय किंवा अनुदानित शाळेत या दाखल्याअभावी प्रवेश देण्यात येत नाही. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये आणि त्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये या उद्देशाने अशा विद्यार्थ्यांना सुलभरितीने प्रवेश मिळवून देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे मंत्री केसरकर यांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा :  गुणवत्ता यादीत स्थान मिळवलेले उमेदवार गेल्या पाच वर्षांपासून नोकरीच्या प्रतीक्षेत

शालेय शिक्षण विभागाच्या या निर्णयामुळे पालकांच्या समस्या दूर होत असतील तरी शाळांना प्रशासकीय अडचणीत वाढ होणार आहेत असे काही शिक्षकांचे मत आहे. अनेक शााळांमध्ये विद्यार्थी फी न भरताच दुसर्‍या शाळेत प्रवेश घेऊ शकतात. आर्थिक सबळ कारणाने जर विद्यार्थी फी भरण्यासाठी सक्षम नसेल तर शाळा अशा विद्यार्थ्यांसाठी सकारात्मक विचार करून अशा विद्यार्थ्यांना सवलत देऊ शकते. परंतु या नव्या निर्णयामुळे अनेक पालक फी न भरताच आपल्या पाल्याला दुसर्‍या शाळेत प्रवेश घेऊ शकतो. यामुळे अनेक तांत्रिक व प्रशासकीय अडचणी उद्भभवू शकतात अशी शंका व्यक्त केली जाते असे मतही व्यक्त होत आहे.

RTE अंतर्गत अर्ज करुनही विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेना, शाळांवर कडक कारवाईची मागणी

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत फायरमन पदांची भरती

Pimpri Chinchwad Municipal Corporation Invites Application From 150 Eligible Candidates For Fireman Posts. Eligible Candidates …

अहमदनगर जिल्हा न्यायालय अंतर्गत सफाईगार पदांची भरती

Ahmednagar District Court  Bharti 2024 – Ahmednagar District Court Invites Application From 02 Eligible Candidates …