पैसे संपले, खायला अन्न नाही, विमान पकडण्यासाठी १० किमीची पायपीट, डोंबिवलीतील विद्यार्थी अडकला युक्रेनमध्ये


डोंबिवलीतील संकेत पाटील हा विद्यार्थी मुंबईतून एमबीबीएसचे वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी युक्रेनमध्ये गेला. मात्र, तेथे पोहोचताच युक्रेन शहरावर बॉम्ब हल्ले सुरू झाले.

भगवान मंडलिक, लोकसत्ता

डोंबिवलीतील संकेत पाटील हा विद्यार्थी मुंबईतून एमबीबीएसचे वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी युक्रेनमध्ये गेला. मात्र, तेथे पोहोचताच रशियाने युक्रेन शहरावर बॉम्ब हल्ले सुरू केले आणि विद्यापीठात पाऊल न ठेवताच संकेतवर भारतात परतण्याची वेळ आली आहे. युक्रेनमधील भुको विनियान विद्यापीठात संकेत एमबीबीएसचा सहा वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण करणार होता. भारतात नीटची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर येथील वैद्यकीय शिक्षणाचा खर्च खूप असल्याने संकेतच्या वडिलांनी त्याला वैद्यकीय शिक्षणासाठी युक्रेनला पाठवण्याचा निर्णय घेतला. याठिकाणी भारतापेक्षा कमी खर्चात वैद्यकीय शिक्षण पूर्ण करता येते, असे संकेतच्या वडिलांनी सांगितलं.

२० वर्षाचा संकेत २३ फेब्रुवारीला मुंबईतून आई-वडिलांचा निरोप घेऊन युक्रेनला रवाना झाला. तो २४ फेब्रुवारीला संध्याकाळी युक्रेनला उतरला. निवासाच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर काही वेळातच रशियाचे युक्रेनवर बॉम्ब हल्ले सुरू झाले. युद्धजन्य परिस्थितीचा अनुभव नसल्याने संकेतसह जोडीदार घाबरले. युक्रेनमध्ये शिक्षणासाठी गेलेली भारतीय मुले मिळेल त्या विमानाने भारत सरकारने केलेल्या विमान वाहतूक सेवेतून परतली. परंतु परतीच्या यादीत क्रमांक न लागल्याने संकेत तिथेच अडकून पडला. सध्या त्याच्या जवळील पैसे संपले आहेत. खायला कुठे अन्न मिळत नाही. एटीएम बंद आहेत. फक्त एके ठिकाणी तो सुरक्षित आहे, अशी माहिती संकेतचे वडील प्राध्यापक गोकुळ पाटील यांनी दिली.

हेही वाचा :  वन नेशन वन इलेक्शन नेमकं कशासाठी आहे? जगात कुठे कुठे अशा प्रकारे एकत्र निवडणुका घेतल्या जातात?

“विमान पकडण्यासाठी १० किमी पायपीट करावी लागणार”

रविवारी त्याचा नंबर भारतात येणाऱ्या विमान प्रवासासाठी लागला आहे. मात्र, भुको शहरात वाहतुकीची कोणतीही सोय नसल्याने विमान पकडण्यासाठी त्याला १० किलोमीटर युक्रेन सीमेवर येऊन मग तेथून पुढचा प्रवास करावा लागणार आहे. युक्रेनच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. २० हजार विद्यार्थी या सीमांवर अडकून पडले आहेत. त्यामुळे युक्रेनमध्ये अतिशय नाजूक आणि खडतर परिस्थिती आहे, असे प्राध्यापक पाटील यांनी सांगितले.

“…तर मुलाला तिकडे पाठवले नसते”

भारत सरकारने कोणत्याही परिस्थितीत आवश्यक ते उपाय करून भारतीय मुलांना मायदेशात घेऊन यावे, अशी मागणी पाटील यांनी केली. युक्रेनमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण होणार आहे असे अगोदरच भारत सरकारने जाहीर केले असते, तर मुलाला तिकडे पाठवले नसते असेही पाटील यांनी सांगितले. सतत बॉम्बस्फोट, गोळीबार आणि आगीमुळे विद्यार्थी घाबरून गेले आहेत. तिथे धीर द्यायला कोणी नाही. आपण भारतात राहून काही करू शकत नाही, अशी खंतही संकेतच्या वडिलांनी व्यक्त केली.

हेही वाचा : धक्कादायक! युक्रेन-पोलंड सीमेवर भारतीय विद्यार्थ्यांना बेदम मारहाण

संकेतने डोंबिवलीतील साउथ इंडियन शाळेमध्ये बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले आहे. त्याचे वडील दादर येथील ताराबाई अध्यापक महाविद्यालयात प्राध्यापक आहेत. त्याची पत्नी गृहिणी आणि मुलगा इयत्ता पाचवीत शिकत आहे.

हेही वाचा :  Happy Independence Day : Whatsapp, Instagram मेसेज शोधताय? Best देशभक्तीपर मेसेज एका क्लिकवर



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सॅम पित्रोदा यांचा अखेर राजीनामा, जयराम रमेश यांनी दिली माहिती, नेमकं प्रकरण काय?

Sam Pitroda Resigns : अखेर इंडियन ओवरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी आपल्या पदाचा राजीनामा …

Maharastra Politics : मुख्यमंत्र्यांचा मुक्काम, विरोधकांना फुटणार घाम? 15 जागांवर कोण ठरणार सामनावीर?

Maharastra Loksabha Election 2024 : महायुतीच्या जागावाटपात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) लोकसभेच्या तब्बल 15 …