या विवाहसोहळ्यानंतर सुनील शेट्टी यांनी त्यांच्या लाडक्या जावयासाठी खास कमेंट्स केली आहे. यावेळी त्याने ”मेरे घर लडका आया हैं!” असे म्हणतं त्याने KL राहुल प्रती असणारे प्रेम व्यक्त केले. (फोटो सौजन्य :- योगेन शाह, @suniel.shetty, )
काय म्हणाला सुनील शेट्टी
लग्नाच्या विधी संपल्यावर सुनील शेट्टीने मीडियासमोर येऊन त्याच्या भावना व्यक्त केल्या. यावेळी ते म्हणाले की सर्व विधी सुंदर पार पडल्या. खूप जवळच्या लोकांच्या सानिध्यात हा सोहळा पार पडला. आता तर मी ऑफिशिअली सासरासुद्धा झालो आहे. आता हे नातं जावई आणि सासऱ्यांचे न राहता बाप आणि मुलाचे असावे हीच अशा आहे. माझ्या घरात मुलाचे आगमन झाले आहे अशा शब्दात त्याने आनंद व्यक्त केला.
(वाचा :- या 4 भयंकर सवयी असणाऱ्या पुरुषांपासून चार हात लांबच राहा, लग्न काय प्रेम करणं पण टाळा )
आता नवीन जबाबदारी आली
मनमोकळे पणाने गप्पा मारा
नात्यात कोणतेही बंधने नसावीत त्यामुळे नातं फुलतं. त्यामुळे तुमच्या सासऱ्यांसोबत खूपच मनमोकळ्या गप्पा मारा यामुळे तुमचे नाते अजून चांगले होईल.
(वाचा:- आम्ही एकत्रच जीव सोडणार.. हर्षसाठी हे काय बोलून गेली भारती सिंह, त्यांच्या नात्यातून या ५ गोष्टी शिकण्यासारख्या )
एकमेकांना समजून घ्या
कोणतेही नातं समजंस्यावर अवलंबून असते. त्यामुळे एकमेकांना समजून घ्या. यामुळे नाते अधिक काळासाठी टिकून राहिल. तुमच्या सासऱ्यांच्या भावना समजून घ्या.
(वाचा :- माझी कहाणी : नोकरी सोडली नाही तर सोडून जाईन पत्नीच्या या गजब मागणीवर मी हतबल झालोय का करु ? )
जावयाबद्दल अभिमान
संवाद महत्त्वाचा
कोणत्याही नात्यात संवाद महत्त्वाचा आहे. संवाद तुमचे नातं खुपच भक्कम करतो. संवादामुळे तुमच्या मनातील भावना तुम्ही व्यक्त करु शकता. त्यामुळे कितीही भांडणे झाली तरी नात्यातील संवाद नष्ट देऊ नका.
(वाचा:- अक्षय कुमारसोबत लग्नाआधी ट्विंकलने काढली होती त्याची मेडिकल हिस्ट्री, डिंपल कपाडियाने ठेवली होती ही भयानक अट)
आदर करा
प्रेम कधी ना कधी तरी संपते किंवा भावना बदलतात. अशात कोणत्याही नात्यात आदर फार महत्त्वाचा असतो. तुमच्या नात्यात आदर खूप महत्त्वाचा आहे.
(वाचा :- प्रेमविवाहासाठी कुटुंब तयार होत नाही ? मग या टिप्सद्वारे पटवून द्या त्यांना तुमचं प्रेम )