मला माझ्या नव-याचं एक अत्यंत धक्कादायक सत्य समजलं, त्यानंतर त्याने माझ्यासोबत जे केलं ते अंगावर शहारे आणणारं

प्रश्न : मी एक विवाहित स्त्री आहे. मी माझ्या पतीसोबत अरेंज मॅरेज्ड केले होते. आमच्या लग्नाला 12 वर्षे झाली आहेत. आम्हाला एक मुलगीही आहे. आतापर्यंत आमच्या वैवाहिक जीवनात कोणतीही अडचण नव्हती, पण गेल्या दोन-तीन वर्षांपासून सर्व काही बिघडत चालले आहे. मी खोटं सांगणार नाही, या सगळ्याला माझा पतीच कारणीभूत आहे. माझ्या पतीने मला फसवले. त्याचे कोणाशी तरी संबंध होते, त्या दोघांमध्ये अनैतिक संबंध सुद्धा निर्माण झाले होते.

जेव्हा मला हे समजले तेव्हा आमच्यात खूप भांडण झाले. माझ्यासाठी हा एक मोठा धक्का होता. कारण तो असं कधी करेल असे मला स्वप्नातही वाटले नव्हते. माझ्याकडून नक्की काय कमतरता राहिली हेच मला कळेना. मी काही काळ स्वत:लाच दोष देऊ लागली. पण नंतर मी एक निर्णय घेतला… (गोपनीयतेच्या कारणामुळे आम्ही व्यक्तीची ओळख उघड करत नाही.)

त्याने माफी मागितली

माझा राग बघूनन आणि मला होणारा त्रास पाहून, त्याने आपली चूक मान्य करून माझी माफी मागितली. यापुढे असे काहीही होणार नाही, अशी ग्वाही सुद्धा दिली. म्हणून मी त्यालाही माफ केले. मात्र या घटनेनंतर पुन्हा एकदा आमचा संसार होता तसा सुरु राहिला नाही. मी त्याच्या सोबत राहट होते, पण आमच्यात नवरा बायकोचं नातं आता नव्हतं. लग्नाच्या 12 वर्षानंतर आम्ही दोघे एकाच घरात असूनही वेगळे झालो.

हेही वाचा :  माझी कहाणी : मला बाळ हवंय, पण नवऱ्याची ती विचित्र सवय मला छळतेय, मी काय करु

(वाचा :- सौंदर्याचा अस्सल कोल्हापूरी ठेचा व मराठमोळ्या शाही घराची लेक झाली खान फॅमिलीची सूनबाई, लव्हस्टोरी भुरळ घालणारी)

माझा त्याच्यावर विश्वास नव्हता

आमच्यात आताही कोणताच संबंध नाही. कारण आम्ही दोघे वेगवेगळ्या खोलीत झोपतो. खरं तर, माझ्या पतीने मला सांगितले की त्याच्या ऑफिसमध्ये काही समस्या आहे, ज्यामुळे त्याला रात्री झोप येत नाही. सुरुवातीला मी त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला, पण एक वर्ष उलटून गेल्यावर मला काही ठीक वाटले नाही. याचे एक कारण म्हणजे माझा नवरा माझ्यावर प्रेम करत नाही किंवा तो माझ्याशी कोणत्याही प्रकारे बोलत नाही. जेव्हा मी त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते तेव्हा तो माझ्याशी भांडू लागतो. तो मला वारंवार सांगतो माझ्यापासून दूर राहा. मला शंका आहे की त्याची अजूनही बाहेर अफेअर्स सुरु आहेत. या सगळ्याचा परिणाम आमच्या मुलीवरही होत आहे. मला समजत नाही मी काय करावे?

(वाचा :- सिरियल्स बघून माझ्या सासूचं फिरलंय डोकं, ती जे करते ते नव-यालाही समजलंय, पण आता एक मोठी समस्या अशी आहे की..!)

जाणकारांचे उत्तर

रिलेशनशिप कोच आणि प्रेडिक्शन्स फॉर सक्सेसचे संस्थापक विशाल भारद्वाज म्हणतात की, “जेव्हा जेव्हा विवाहित नातेसंबंध कठीण प्रसंगातून जातात तेव्हा ते खूप जास्त वेदना देतात. माणसं एकमेकांना ताबडतोब माफ करत असली तरी त्यांच्यातील कटुता आणि दुरावा भरून निघायला खूप वेळ लागतो. तुम्ही सांगितले की म्हणालीस की तुमचा नवरा कोणासोबत तरी रिलेशनशिप मध्ये होता. अशा परिस्थितीत मी म्हणेन की त्यांच्यात फक्त शारीरिक संबंध असतील तर त्या स्त्रीला विसरणे आहे. पण जेव्हा व्यक्ती तिसऱ्या व्यक्तीशी मानसिकरित्या गुंतली जाते तेव्हा त्या व्यक्तीला विसरणे कठीण होते. कदाचित तुमच्या पतीबाबत हेच झाले असावे.”

हेही वाचा :  मुंबई-पुणे एक्‍सप्रेस वेने प्रवास करताय, तुमच्यासाठी महत्त्वाची सूचना; खोपोली एक्झिटपासून...

(वाचा :- बॉस राहिल बाराही महिने खुश व देवी लक्ष्मीची होईल तुमच्यावर सदा कृपा, फक्त ऑफिसमध्ये फॉलो करा या 4 भारी ट्रिक्स)

आपल्या पतीशी बोला

ते पुढे म्हणतात की, “तुमचे सर्व म्हणणे ऐकून घेतल्यानंतर मला असे वाटते की तुम्ही तुमच्या पतीशी एकदा खुळा संवाद करावा. त्याच्या वागण्याचे कारण जाणून घ्या. त्याला विचारा की तो तुमच्याशी असं का वागतोय? फक्त लक्षात ठेवा की जेव्हा तुम्ही त्यांच्याशी बोलायला जाल तेव्हापूर्ण तयारीनिशी जा. पतीशी काय बोलावे हे तुम्हाला माहित असले पाहिजे. शिवाय यावेळी स्वत: संयम ठेवा कारण एक चुकीची गोष्ट तुमच्यात नव्याने वाद निर्माण करू शकते.”

(वाचा :- कोण म्हणतं लग्नाच्या गाठी स्वर्गात बनतात? मी तर एका अशा पुरूषाला भेटली जो स्वर्गात काय माझ्या नशिबातही नव्हता)

पतीला एक संधी द्या

शेवटचा सल्ला देताना ते म्हणतात की, “तुमचा नवरा कदाचित त्या स्त्रीला विसरला सुद्धा असेल. त्याला त्या स्त्री कडे जावे लागले कारण कुठेतरी त्याला प्रेम वा आधार देण्यात तुम्ही कमी पडला असाल. आणि त्यांना पुन्हा एकदा अशाच आधाराची गरज असेल. त्यामुळे तुम्ही पुढाकार घेऊन पूर्वी एक बायकॉ म्हणून ज्या पद्धतीने त्यांच्या सोबत राहायचात तशा राहा. यासाठी तुम्हाला मनापासून यांची चूक माफ करावी लागेल आणि त्यांना एक नवीन संधी द्यावी लागेल. तरच तुमचे नाते पुन्हा एकदा खुलेल.”

हेही वाचा :  पोटावर झोपल्याने चेहऱ्यावर येतात पिंपल्स, तुमच्या या वाईट सवयींनी चेहरा मुरुमांनी भरतो

(वाचा :- पुरूषहो, 40 वर्षांचे होण्याआधीच उरकून घ्या ही 5 कामे, नाहीतर बायकोचे गुलाम बनून राहण्यातच निघून जाईल आयुष्य..!)

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …