फ्रिजमध्ये ठेवलेली कणीक वापरताय? वेळीच व्हा सावध, आरोग्यासाठी नुकसानदायी

सकाळचा नाश्ता असो अथवा डब्यात असो गरमागरम पोळी अर्थात चपाती खाताना जी मनात भावना येते त्याचे वर्णनही करता येत नाही. मऊ आणि चांगल्या चपाती करण्यसाठी महिलांना बरेचदा वेगवेगळ्या ट्रिक्स वापराव्या लागतात. चपाती हा दैनंदिन जीवनातील अविभाज्य भाग आहे. पण बरेचदा सकाळच्या घाईगडबडीत कणीक भिजविण्यापासून तयारी करणे त्रासदायक ठरते. अशावेळी अनेक जणी रात्री कणीक मळून फ्रिजमध्ये ठेवतात आणि सकाळी डब्यासाठी चपाती बनवतात. पण ही सवय अत्यंत चुकीची आहे. कारण या फ्रिजमध्ये ठेवलेल्या कणकेमुळे तुमच्या आरोग्याला त्रास होतो. यामुळे नक्की काय त्रास होतो हे जाणून घ्या.

आयुर्वेदात काय सांगण्यात येते

आयुर्वेदातील अनेक उपाय आणि गोष्टी आजही वापरण्यात येतात. आयुर्वेदात सांगण्यात आल्याप्रमाणे एकदा मळून ठेवलेली कणीक तेव्हाच वापरावी. कणकेचा पुनर्वापर करणे योग्य नाही. आरोग्यासाठी हे अपायकारक असून तुम्ही एखाद्या वेळी शिळ्या पोळ्या खाव्यात. मात्र फ्रिजमध्ये ठेवलेली कणीक वापरून चपाती करून खाऊ नये. हे तुमच्या आरोग्यासाठी अजिबातच चांगले ठरत नाही. त्यातील पोषक तत्व हे संपूर्णतः निघून गेल्यामुळे शरीराला कोणतेही पोषण मिळत नाही.

हेही वाचा :  आता WhatsApp चॅट iPhone मधून Android मध्ये लगचेचच करता येणार ट्रान्सफर, फॉलो करा या सोप्या स्टेप्स

फ्रिजमधील कणीक का ठरते अपायकारक?

आरोग्य विशेषतज्ज्ञांच्या मतानुसार, चपाती करताना कणीक नेहमी त्याच क्षणी मळून घ्यावी. ताज्या कणकेच्या चपाती खाणे हे शरीरासाठी योग्य ठरते. मळलेली कणीक फ्रिजमध्ये ठेऊन नंतर त्याचा चपातीसाठी केलेला उपयोग योग्य नाही. फ्रिजमधील हानिकारक किरणांमुळे चपातीमधील पोषक तत्व निघून जातात. तसंच बराच काळ कणीक भिजवली असल्यामुळे ती काळसरदेखील दिसते आणि त्याला म्हणावी तशी चव लागत नाही. त्यातील सर्व आवश्यक ती पोषक तत्वे नाहीशी झाल्यामुळे या कणकेच्या चपात्या या खाण्यायोग्यही नसतात. तसंच यामुळे पोटात दुखणे, पोट ताणले जाणे अशा गोष्टीही उद्भवतात.

(वाचा – Weight Loss करण्यासाठी चपाती योग्य की भाकरी, रिसर्चमध्ये काय आहे)

वेदशास्त्रानुसार शिळी कणीक का वापरू नये?

फ्रिजमध्ये ठेवलेली कणीक ही आदल्या दिवशीची असते. त्यामुळे ती शिळी होते. वेदशास्त्रानुसार शिळ्या कणकेपासून बनविण्यात आलेल्या चपत्यांना ‘भूत भोजन’ असे नाव दिले आहे. वेदशास्त्रात सांगितल्याप्रमाणे असे शिळे जेवण जेवणारी व्यक्ती ही नेहमीच वेगवेगळ्या रोगाने बाधित राहाते आणि वेगवेगळ्या आजारानेही ग्रस्त राहाते. त्यामुळे शिळ्या कणकेच्या अथवा फ्रिजमध्ये ठेवलेल्या कणकेच्या चपाती खाल्ल्याने अशा व्यक्तींमध्ये आळस आणि राग अधिक प्रमाणात भरल्याचे दिसून येते. कोणताही ताजा पदार्थ हा तुमच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरतो. तसंच शरीराला योग्य पोषण मिळवून देण्यासाठी फायदेशीर ठरतो. फ्रिजमध्ये हे ठेवल्यास, त्यातील पोषणांचा नाश होतो आणि आरोग्यासाठी हे घातक ठरते हे लक्षात घ्या.

हेही वाचा :  सौंदर्याची खाण पाहिली रूपाली भोसलेचे नऊवारीतील रूप, काळजाची होतेया काहिली

(वाचा -Weight Loss Tips: काय आहे ८०/२० नियम, कसे होते वजन कमी)

आरोग्यासाठी कसे ठरते नुकसानदायी

सर्वात महत्त्वाचे म्हणजे फ्रिजमध्ये ठेवलेल्या कणकेची चपाती बनवून खाल्ल्यास, पोटात गॅस आणि अॅसिडिटी होते. याशिवाय तुम्हाला बद्धकोष्ठतेसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. अशा आजारांनी तुमचे शरीर ग्रस्त होऊ लागते. त्यामुळे तुमच्या घरातील आणि कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी नेहमी ताजी कणीकच भिजवावी आणि मग चपाती कराव्यात. फ्रिजमध्ये ठेवलेल्या कणकेचा वापर करणे शक्यतो टाळा.

जेवणाचे पदार्थ जितके ताजे तितकी तुमची प्रकृती अधिक चांगली राहते हे नेहमी लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्ही जर ही चूक करत असाल तर वेळीच सावध व्हा आणि आरोग्याचे नुकसान होण्यापासून स्वतःला आणि कुटुंबालाही वाचवा!

(फोटो क्रेडिटः Pexels)

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘बाळासाहेब असते तर उबाठाला धू धू धुतलं असतं’ सीएम शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना असं का म्हटलं?

Shinde vs Thackeray : ‘काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार यांनी मुंबई 26/11 हल्ल्यातील (Mumbai 26/11) शहिद …

‘आनंद दिघेंच्या निधनानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांच्या संपत्तीची…’, CM एकनाथ शिंदेंचा गौप्यस्फोट

Eknath Shinde on Uddhav Thackeray: धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या निधनानंतर मी उद्धव ठाकरेंना …