माझी कहाणी : लग्नाच्या पहिल्याच दिवशी सर्व उद्धवस्त झालं

लग्नानंतर प्रत्येक मुलीचं आयुष्य बदलून जाते. लहानपणापासून प्रत्येक मुलगी लग्नाची स्वप्न पाहाते. पण लग्नानंतर सर्व गोष्टी बदलतात. तुम्हाला हवी असणारी प्रत्येक गोष्ट तुम्हाला मिळेलच असं नाही. आयुष्यात सर्व असूनही आपण आनंदी नाहीत याहून दुसरी वाईट गोष्ट कोणतीच नाही. जेव्हा तुमचा परिवार तुमच्या विरुद्ध असेल आणि तुमचा पती देखील त्यांच्या सोबत असेल तेव्हा फार वाईट वाटतं. माझ्या सोबतही असेच झाले. अशा वेळी तुम्ही मानसिकदृष्ट्या तुटून जाता. . माझ्या आई-वडिलांनीही मला शिकवले की लग्नानंतर माझे सासरचे घर हेच माझे घर आहे. पण ते लोक मला त्यांच्या कुटुंबाचा भाग मानत नाहीत. मात्र, आम्ही सर्वांच्या संमतीनेच लग्न केले. मात्र त्यानंतरही माझ्या सासरच्यांनी मला स्वीकारले नाही. (सर्व प्रतिमा सूचक आहेत, आम्ही वापरकर्त्यांनी शेअर केलेल्या कथांमधील त्यांच्या ओळखीचे संरक्षण करतो) (फोटो सौजन्य : iStock)

नवरा ही मला साथ देत नाही

आपल्या आयुष्यात नवरा खूप महत्त्वाची भूमिका बजावत असतो. एक जोडीदार म्हणून आपल्या काही अपेक्षा असतात. लग्नापूर्वी माझ्या पतीने माझी स्वप्ने पूर्ण करण्यासाठी मला खूप प्रोत्साहन दिले. पण लग्नानंतर त्यांच्या घरच्यांचा दृष्टिकोन पाहून तो माझ्याशी वेगळे वागू लागले आहेत. तो नेहमी माझ्यावर प्रेम करेल असा मला विश्वास होता, पण त्याचे हे वागणे पाहून माझा विश्वास डळमळू लागला. कारण तो आता मला पूर्वीसारखा सपोर्ट करत नाही. सासरच्यांनी माझ्या विरोधात तिचे ब्रेनवॉश केले आहे.

हेही वाचा :  मला मुलांना शिस्त लावायचीय, पण घरातले... आईला पेचात पाडणारी ही व्यथा, अशावेळी काय कराल?

​आमचा प्रेमविवाह झाला होता

आमचा प्रेमविवाह झाला होता. लग्नापूर्वी आमच्या आयुष्यात कोणत्याही प्रकारची समस्या नव्हती. आमचे दोघांचे एकमेकांवर खूप प्रेम होते. मला वाटलं लग्नानंतरही सर्व असेच राहिल. पण तसे झाले नाही. लग्नाच्या पहिल्याच दिवशी माझी स्वप्ने तुटून गेली. आमच्या दोघांच्या दोन्ही संस्कृती एकमेकांपासून खूप वेगळ्या आहेत. आम्हा दोघांची कौटुंबिक पार्श्वभूमी आणि संस्कृतीही सारखी नाही. पण आम्ही एकमेकांना समजून घेण्याचा फार प्रयत्न केला. (वाचा :- या एका कारणामुळे IAS टीना दाबीने आपल्यापेक्षा १३ वर्षांनी मोठ्या असलेल्या प्रदीप गावंडेशी केले लग्न )

​लग्नाआधीचे सुखाचे दिवस

लग्नाआधी मला या गोष्टींचा त्रास नव्हता. पण लग्नानंतर ती माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी समस्या बनली. कारण दिवसभर माझे सासरे मला माझ्या कामाबद्दल टोमणे मारत असतात. मी कोणतेही काम नीट करू शकत नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. मला माझ्या सासूबाईंसोबत चांगले नाते सांगायचे आहे, पण त्यांचे बोलणे मला नेहमीच दुखावते. त्यांनी मी केलेली कोणतीच गोष्टी अजिबात आवडत नाही. मी त्यांच्याशी बोलण्याचा सुद्धा प्रयत्न केला पण त्याचा काहीच फायदा झाला नाही.

हेही वाचा :  घटस्फोटीत महिलांनी सांगितले त्यांच्या आयुष्यातील थरारक अनुभव, या शुल्लक गोष्टीमुळे मोडले लग्न

​नवरा ही मला साथ देत नाही

आपल्या आयुष्यात नवरा खूप महत्त्वाची भूमिका बजावत असतो. एक जोडीदार म्हणून आपल्या काही अपेक्षा असतात. लग्नापूर्वी माझ्या पतीने माझी स्वप्ने पूर्ण करण्यासाठी मला खूप प्रोत्साहन दिले. पण लग्नानंतर त्यांच्या घरच्यांचा दृष्टिकोन पाहून तो माझ्याशी वेगळे वागू लागले आहेत. तो नेहमी माझ्यावर प्रेम करेल असा मला विश्वास होता, पण त्याचे हे वागणे पाहून माझा विश्वास डळमळू लागला. कारण तो आता मला पूर्वीसारखा सपोर्ट करत नाही. सासरच्यांनी माझ्या विरोधात तिचे ब्रेनवॉश केले आहे.

जेवण करताना माझ्याकडून चुक झाली

एके दिवशी जेवण करताना माझ्याकडून चुक झाली त्यावेळी माझ्या सासऱ्यांनी मला टोमणे मारला. ते मला म्हणाले की मी कोणतेही काम नीट करु शकत नाही. त्यावेळी मला फार रडू आले.यादरम्यान माझ्या पतीने माझ्याकडे पश्चातापाच्या नजरेने पाहिले, पण कोणाला काही बोलण्याचे धाडस झाले नाही. थोड्या वेळाने त्याने मला सांगितले की कुटुंबाचा एक भाग होण्यासाठी मला त्याचा आदर मिळवावा लागेल. तो माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट दिवस होता. हा दिवस मी कधीच विसरू शकणार नाही. (वाचा:- 10 वर्षे नात्यात राहिल्यानंतर एक दिवशी माझा संयम सुटला.. अन् त्या दिवशी जे झाले त्याने आयुष्य बदलून गेलं )

हेही वाचा :  अंडरआर्म पिगमेंटेशनच्या समस्येने हैराण आहात? ‘या’ टिप्सचा वापर करून व्हा निश्चिंत

​एक मार्ग काढला

माझा नवरा माझ्यापासून दूर जाताना पाहून तेव्हाच माझ्या मनात एक गोष्ट आली. मला वाटले की जर आम्हाला एखादे मुल असते तर माझे कुटुंब आनंदाने भरुन जाईल. त्यामुळे आता मी गरोदर राहण्याचा प्रयत्न करत आहे. कदाचित याच मार्गाने माझ्या सासरच्या लोकांचा मला आदर तर होईलच पण नवऱ्याचे प्रेमही परत मिळेल. माझे लग्न वाचवण्यासाठी मी हे सर्व करत आहे. मला कळत नाही आहे मी काय करु ? (वाचा :- महेश बाबूशी लग्न केल्यानंतर नम्रता शिरोडकरने या कारणासाठी सोडला अभिनय, 17 वर्षांनंतर रहस्यावरुन उघडला पडदा)

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Maharastra Politics : ‘रिपोर्टला वेळ का लागला? इमान विकलं पण…’, सुनील टिंगरे यांच्यावर जितेंद्र आव्हाडांची घणाघाती टीका

Jitendra Awhad On Sunil Tingare : ससून रुग्णालयाचा डॅाक्टर अजय तावरे याने पुण्यातील पोर्श प्रकरणातील …

‘इतकी प्रगती सुद्धा चांगली नाही’ या देशात लावण्यात आली अशी व्हेंडिंग मशीन… लोकं संतप्त

China Vending Machine : जगाने गेल्या काही वर्षात खूप प्रगती केली आहे. तंत्रज्ञान, वैद्यकीय, अॅग्रो …