according to chanakya niti these mistakes can ruin your married life

प्रत्येकाला चांगले आयुष्यात हवे असते. या गोष्टींसाठी माणसे अनेक प्रयत्न करतात. मग ते नाते कौटुंबिक असो किंवा व्यवसायिक नाते टिकवण्यासाठी प्रयत्न करत. जर आयुष्यातील नाती पक्की असतील तर याच्या आधारे एखादी व्यक्ती सर्वात मोठी अडचणही सहज पार करु शकते. पण आज कालची नाती फारच नाजूक झाली आहेत. छोट्या छोट्या गोष्टीवरुन नाती तुटतात. पण नात्यात कधी कमकुवतपणा येऊ नये म्हणून तुम्ही काही गोष्टी करु शकता. यासाठी चाणक्य नीतीमध्ये काही नियम सांगण्यात आले आहेत. चाणक्य नीतीनुसार, नात्यात तुम्ही काही गोष्टी करुन तुमचे नाते फुलवू शकता. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या गोष्टी. (फोटो सौजन्य : टाइम्स ऑफ इंडिया)

​बरोबरी करणे

आजच्या काळात स्त्री-पुरुष समान मानले जातात. पण कधी कधी अजाणतेपणे आपण आपल्या जोडीदाराची बरोबरी करतो. माणसांची मानसिकता बदलल्याने माणसाच्या वागणुकीत फार बदल होतो. पण या विचारांच्या लोकांच्या वैवाहिक आयुष्यातला ग्रहण लागते. त्यामुळे नात्यात स्वत:ला दुसऱ्यापेक्षा वरचढ समजणे मूर्खपणाचे लक्षण आहे. त्यामुळे तुमची बरोबरी तुमच्या जोडीदारासोबत करु नका.

हेही वाचा :  माझी कहाणी: मला नवऱ्याचे दुसऱ्या महिलेसोबत प्रेमसंबंध असावेत असं वाटायला लागलं,मी चुकतेय का?

(वाचा :- माझी कहाणी : हनिमूनवरुन आल्यानंतर माझी पत्नी पूर्णपणे बदलली आहे, आता तर मला तिची भीतीच वाटते मी काय करु ?)

​खर्च

आयुष्य व्यवस्थित जगण्यासाठी पैशाची खूप गरज आहे. पती-पत्नीचे नाते तेव्हाच आनंदी होऊ शकते जेव्हा दोघांमध्ये पैशाच्या वापराबाबत योग्य माहिती असेल. त्यात जोडीदाराची हेराफेरी सुरू झाली तर गोष्टी बिघडायला वेळ लागत नाही. तुमच्या नात्यात गोष्टी एकमेकांच्या नसाव्यात तर त्या दोघांच्या असाव्यात. यावेळी दोघांनी एक टिम म्हणून काम करणे गरजेचं आहे.

(वाचा :- माझी कहाणी : हनिमूनवरुन आल्यानंतर माझी पत्नी पूर्णपणे बदलली आहे, आता तर मला तिची भीतीच वाटते मी काय करु ?)

मर्यादा

आपण सर्वांनी सन्मानाने जगले पाहिजे, कारण त्याचे उल्लंघन केल्याने नातेसंबंध बिघडत नाहीत तर ते संपवण्याचे काम करतात. जी स्त्री किंवा पुरुष आपली प्रतिष्ठा आणि मान विसरते, त्यांच्या नात्याला ग्रहण लागायला वेळ लागत नाही. चाणक्य नीतीनुसार प्रत्येकाने या चुकीपासून दूर राहिले पाहिजे. त्यामुळे तुमच्या नात्यात मर्यांदा आखून घ्या त्यामुळे तुम्हाला त्रास होणार नाही.

(वाचा :- Genelia D’Souza ने सासूबाईंना दिल्या मराठीमधून वाढदिवसाच्या शुभेच्छा, प्रत्येक सूनेने या गोष्टी शिकायला हव्याच)

हेही वाचा :  भारतीयांना युक्रेनमधून मायदेशी आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न; या मार्गाने बाहेर पडण्याचं आवाहन

​राग

पती-पत्नीमधील प्रत्येक नातेसंबंध संपण्याच्या मार्गावर नेणारी भावना. जी व्यक्ती आपल्या रागावर नियंत्रण ठेवू शकत नाही, त्याला प्रत्येक वळणावर निराशेचा सामना करावा लागतो. चाणक्य नीतीनुसार, पुरुष असो किंवा स्त्री राग येणं ही गोष्ट खूपच पण रागामध्ये आपण कसे वागतो ही गोष्टी महत्त्वाची आहे.

(वाचा :- ग्राऊंडवर केलं प्रपोज, चित्रपटाच्या स्टोरीपेक्षा कमी नाही ‘या’ 6 भारतीय क्रिकेटपटूंची लव्हस्टोरी)

​खोटे बोलणे

पती-पत्नीने एकमेकांशी कधीही खोटे बोलू नये. नेहमी एकमेकांशी प्रामाणिक रहा.अन्यथा एक खोटे पती-पत्नीमध्ये संशय निर्माण करते आणि त्यामुळे त्यांचे नाते नष्ट होऊ शकते.

(वाचा :- माझी कहाणी: लग्नाला 3 वर्ष झाली पण बायकोला मूल नको, कारण ऐकून तुमच्या अंगावर सर्रकन काटा येईल)

​संवादाचा अभाव

पती-पत्नीमध्ये संवादाचा अभाव कधीही नसावा, म्हणजे संभाषण थांबवावे. संभाषण बंद केल्याने सलोख्याचा मार्ग बंद होतो. अशा परिस्थितीत गैरसमज वाढतात, ज्यामुळे काही काळानंतर नात्यात मोठी दरी निर्माण होते.

(वाचा :- 74 वर्षी जया बच्चनचा ग्लॅमरस लूक, रेखालाही विसरुन जाल पांढऱ्या शुभ्र खादीच्या ड्रेसमध्ये वेधले सर्वांचे लक्ष)

​नात्यात तिसऱ्या व्यक्तीची जागा

नात्यात तिसऱ्या व्यक्तीला जागा देऊ नका. यामुळे तुमच्या नात्यात कलह निर्माण होतील. त्यामुळे तिसऱ्या व्यक्तीसाठी तुमच्या नात्यात बंधने आखून ठेवा. काही मर्यादा निश्चित करा.

हेही वाचा :  Curd आणि Yogurt मधील फरक तुम्हालाही कळत नाही? जाणून घ्या

(वाचा :- नातं तुटण्याच्या मार्गावर आहे? वाचवायचं असल्यास या 3 गोष्टी कराच, नात्यात पुन्हा गोडवा येईल…)

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …