ऊन वाढले मात्र नगरमधील शाळांच्या वेळेचा पेच कायम!

अहमदनगर :
दरवर्षी उन्हाळ्यात जिल्हा परिषदेच्या शाळांची वेळ बदलून शाळा केवळ सकाळच्या सत्रात भरविल्या जातात. यावर्षी करोनाकाळात झालेले नुकसान भरून काढण्यासाठी शाळा पूर्णवेळ आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत भरविण्याची कसरत सुरू आहे. अशातच वाढत्या उन्हामुळे शाळांची वेळ बदलण्याची मागणी शिक्षक संघटनांमधून होऊ लागल्याने प्रशासनापुढे पेच निर्माण झाला आहे. निर्णय होत नसल्याने पाऱ्याने चाळीशी ओलांडलेली असल्याच्या काळात अनेक विद्यार्थ्यांना पत्र्याचे छत असलेल्या शाळांत दुपार काढावी लागत आहे.

नगर जिल्ह्याशेजारी असणार्‍या बीड, सोलापूर आणि नाशिक जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या शाळांच्या वेळा बदलण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे नगर जिल्ह्यातील शाळांच्या वेळा कधी बदलणार, याची शिक्षक व विद्यार्थ्यांना प्रतीक्षा आहे. ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या शाळा दिवसभर भरविण्यात येत आहे. राज्यात गेल्या आठ दिवसांपासून उष्णतेचा पारा चढत आहे. नगर जिल्ह्यात देखील तपमानाने ४० अंशाचा टप्पा ओलांडला आहे. जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या बहुतांश शाळांवर पत्र्याचे छत आहे. वाढत्या तापमानामुळे शाळांवरचे पत्र तापून वर्गामध्ये उकाडा वाढण्याची शक्यता आहे. तसेच अनेक शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची पुरेशी व्यवस्था नाही. अशा स्थितीत दिवसभर शाळा सुरू राहिल्यास त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होण्याची शक्यता शिक्षकांमधून व्यक्त होत आहे.
त्यामुळे जिल्ह्यातील शिक्षक संघटनांकडून जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील शाळांची वेळ बदलण्याची मागणी होत आहे.

हेही वाचा :  अहमदनगर महा करंडक एकांकिका स्पर्धेला झी युवा वाहिनीची साथ! पहा कुठे रंगणार स्पर्धा

लवकरच याबाबत जिल्हा परिषद प्रशासनाला निवेदन देण्यात येणार असल्याचे शिक्षक समन्वय समितीकडून सांगण्यात आले. सकाळची शाळा झाल्यास विद्यार्थी दुपारी एक वाजेपर्यंत त्यांच्या घरी पोहचू शकतात आणि सुरक्षित राहू शकतात, असे शिक्षकांचे म्हणणे आहे. तर प्रशासनाच्या मतानुसार सकाळी शाळा ठेवली तरी ती सुटल्यावर विद्यार्थ्यांना भर उन्हात घरी जावे लागणार आहे. करोनाच्या काळात बुडालेले अभ्यास भरून काढण्यासाठी जास्तजास्त वेळ शाळा भरणे आवश्यक आहे. अशी मतमतांरे सुरू असल्याने वेळेसंबंधी निर्णय होत नाही.

उन्हाचा चटका वाढला! जिल्हा परिषदांच्या शाळांचे टाईमटेबल बदलले

उन्हाळ्याच्या सुट्टीत विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम भरून काढण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे शाळा आणखी काही काळ सुरू राहणार आहेत व त्यानंतर परीक्षा होणार आहेत. यासाठी सर्व शिक्षक संघटनांची समन्वय समिती लवकरच जिल्हा परिषद प्रशासनाला भेटणार आहे व जिल्ह्यातील ३ हजार ५६९ झेडपीच्या शाळांची वेळ बदलण्याची मागणी करणार असल्याचे सांगण्यात आले.

शिक्षण समिती अथवा जिल्हा प्रशासनाने शिक्षक डोळयासमोर न ठेवता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची अवस्था जाणून घ्यावी. मुळात संघटनांना सकाळच्या शाळेची मागणी करावी लागते हेच दुर्दैव आहे. प्रशासन स्वत:च असा निर्णय घेऊ शकत नाही का?
– डॉ. संजय कळमकर, शिक्षक नेते

हेही वाचा :  Kopardi Rape Case: कोपर्डी प्रकरणातील मुख्य आरोपीने कारागृहातच संपवले जीवन

पोषण आहाराचा पहिल्याच दिवशीच फज्जा
hijab controversy : हिजाब वादावर येणार आज निकाल, कर्नाटकच्या अनेक जिल्ह्यांत जमावबंदी, शाळा-कॉलेज बंद

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत फायरमन पदांची भरती

Pimpri Chinchwad Municipal Corporation Invites Application From 150 Eligible Candidates For Fireman Posts. Eligible Candidates …

अहमदनगर जिल्हा न्यायालय अंतर्गत सफाईगार पदांची भरती

Ahmednagar District Court  Bharti 2024 – Ahmednagar District Court Invites Application From 02 Eligible Candidates …