Writing Skill: लेखनकौशल्य वाढण्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक?

वाचनाने ज्ञान वाढते, सभेत बोलल्याने माणूस हजरजबाबी होतो, मात्र लिहिण्याने माणसाचा विचार नेटका व काटेकोर होतो- बेकन (तत्त्ववेत्ता).

भाषिक कौशल्यांच्या पायऱ्या

लेखन कौशल्य

वाचनकौशल्य

भाषण-संभाषण कौशल्य

श्रवणकौशल्य

हा बेकन या तत्त्ववेत्याचा विचार आणि बाजूला दाखविलेल्या पायऱ्या पाहिल्या की लक्षात येईल, की लेखनकौशल्य प्राप्त करण्यापूर्वी आधीच्या तीनही पायरऱ्या यशस्वीपणे चढाव्या लागतील. आधीची तीनही कौशल्ये व्यवस्थितपणे आत्मसात करावी लागतील. कारण लेखनात आत्माविष्कार प्रभावीपणे इतरांपर्यंत पोहोचवण्याचे सामर्थ्य असते. ‘लेखन’ हे साधनही आहे, आणि लेखनकौशल्य प्राप्त करणे ही ‘साधना’ ही आहे. ती साधना योग्य मार्गाने व दिशेने होणे आवश्यक आहे, त्यासाठी काही किमान तांत्र‌िक बाबींचा स्वीका‍र, आंगीकार विद्यार्थ्यांनी आवश्य करावा-

> आपले अक्षर फार मोठे अथवा फार बारीकही नसावे.

> अक्षरांवर शिरोरेषा द्याव्यातच. त्याने अक्षरांचे आणि शब्दांचे सौंदर्य वाढते.

> आपली अक्षरे सुवाच्य, सुंदर योग्य वळणाने लिहिलेली असावीत.

> दोन अक्षरे, दोन शब्द, दोन ओळीत योग्य अंतर असावे.

> लेखनात आवश्यक असणारी योग्य गती तर हवीच, त्यात सातत्यही हवे.

या तांत्र‌िक (टेक्निकल) गोष्टी आपण स्वत:मध्ये आणि विद्यार्थी-पाल्यांमध्येही सवय म्हणून मुरवल्या पाहिजेत. नव्हे, त्या पाचही उत्तम भाषिक सवयी आहेत, हे स्वत:च्या मनात रूजवावे.

हेही वाचा :  Children's Day Speech 2022: बालदिनी शाळेत अशा प्रकारे द्या भाषण, होईल टाळ्यांचा कडकडाट

लेखनकौशल्याची सुरूवात लिपिज्ञानाने होते. ज्यात सर्वप्रथम स्ट्रोक्स (ज्यात उभ्या आडव्या तिरप्या रेषा काढण्याची दिशा महत्त्वाची असते) वळणे- (वर्तुळ, अर्धवर्तुळ, वेलांट्या आणि सर्व वळणे काढण्याचा क्रम, वळण रेखाटण्याची दिशा महत्त्वाची असते) या सर्व गोष्टींच्या मदतीने लिपिज्ञान होते. ही लेखन कौशल्याची सुरूवात आहे, खरेतर चारही भाषिक कौशल्यांमध्ये ‘लेखन’ हे शिखरीभूत कौशल्य आहे असे म्हणतात. म्हणजेच लेखन कौशल्य ही सर्वात वरची पायरी किंवा सर्व कौशल्यांचा कळस आहे. लेखन कौशल्य उत्तमरितीने प्राप्त झाले, म्हणजे सर्व भाषिक कौशल्ये प्राप्त झाली असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती ठरू नये. कारण थोर विचारवंत श्री.शिवाजीराव भोसले यांच्या मते- ‘‘लेखन ही अक्षरक्रीडा आहे, ती आनंदाने करता यावी.’’

लेखनाचे टप्पे

लेखन कौशल्य काही सगळ्यांना हातात लेखणी घेतल्याबरोबर प्राप्त होत नाही. ते टप्प्याटप्प्या विकसित होणारे कौशल्य आहे. त्याचे महत्वाचे तीन टप्पे आहेत.

> हस्ताक्षर (सुवाच्य ते वळणदार)

> शुद्धलेखन(ऱ्हस्व,दीर्घ, ऋकार, रफार, विसर्ग, विरामचिन्हे)

> लेखन प्रकारांनुसार स्वत:चे स्वतंत्र लेखन.

या तीनही टप्प्यांना सारखेच महत्त्व आहे. कारण लेखनाची सुरूवातच अक्षरलेखनापासून होते. ते त्या वेळीच ‘सुवाच्य’ म्हणजे सहज वाचता येईल ह्या पातळीपासून, ‘वळणदार’ म्हणजे अक्षर लेखनासाठीचे स्ट्रोक्स आणि वळणे योग्य दिशेने देऊन काढलेले सुंदर अक्षर याा पातळीपर्यंत विकसित करण्याचा कसोशीने प्रयत्न करावा. ही एक आयुष्यभरासाठी केलेली फार मोठी गुंतवणुक असते. पुढे संपूर्ण आयुष्यभर तुमचे हे सुंदर हस्ताक्षर तुमच्या उत्तम व्यक्तिमत्वाचा महत्वाचा गुण म्हणून अनेक फायदे मिळवून देणारा असतो.

हेही वाचा :  Anna University Recruitment 2023

दुसरा टप्पा आहे शुद्धलेखन. हस्ताक्षर छान वळणदार झाले ; की मग आपल्या शुद्धलेखनाकडे बारकाईने लक्ष द्यायला सुरूवात करावी. काना, मात्रा, वेलांटी, उकार, ऋकार, रफार, विसर्ग आणि विरामचिन्हे यांच्याकडे लक्ष असावे म्हणजे तुमच्या व्यक्तिमत्व विकासात आणखी एक मानाचा तुरा खोवला जातो. कारण ऱ्हस्व-दीर्घांच्या चुका नसलेले, विरामचिन्हांचा योग्य वापर करून लिहिलेले लिखाण वाचणाऱ्याच्या मनात तुमच्याबद्दल आदर निर्माण करणारे असते. मग तो साधा रजेचा अर्ज असो , वा कुणाला पाठवलेले पत्र असो !

तिसरा टप्पा हा भाषाविकसनाच्या दृष्टीने थोडा अधिक महत्त्वाचा ठरतो. कारण. इथे आपण खऱ्या अर्थानी लेखनकौशल्याचा वापर करणार असतो. इतरांचे लेखन, साहित्यीकांचे साहित्य, विविध वाङ्मयप्रकारांची आपण ओळख करून घेतघेत भाषाशिक्षणात पुढे जात असतो. त्या बरोबरच आपणही असेकाही लिहावे हे अपेक्षित असते, किंबहुना आपल्यालाही असे काही आपल्या मित्रमै‌‌त्र‌िणींना, नातेवाईकांना, शिक्षकांना, वर्गमित्रांना सांगावे वाटते. काही मुले तसे लिहिण्याचा चांगला प्रयत्नही करतात. असा प्रयत्न करणे, हेच भाषाशिक्षणात अपेक्षित असते. आपले विचार, मत ,भावना आपल्या भाषेत योग्यरितीनी लिहिता अथवा सांगात येणे ; म्हणजेच भाषेचा वापर करता येणे ! हा तिसरा टप्पा म्हणजे भाषेचा प्रभावी वापर करण्याचा टप्पा आहे. ज्यामध्ये पत्रलेखन (कौटुंबिक पत्र आणि कार्यालयीन पत्रे)अर्ज लिहिणे, परिच्छेद लेखन, जाहिरात लेखन, निबंधलेखन, वैचारिक लेखन, वर्णनात्मक लेखन, कल्पनाविस्तार, संवादलेखन, वृत्तान्त लेखन, सारांश लेखन, स्वानुभव ‌किंवा आत्मकथनात्मक लेखन आणि रसग्रहणात्मक लेखन. अशा चढत्याक्रमाने ‘अनुभवग्रहण’ ते ‘अनुभव कथन’ असा हा लेखनप्रवास असतो, आणि तो तसा, त्या क्रमानेच व्हावा हे भाषाशिक्षणात अपेक्षितही असते. ‘मराठी’ ही माझी ‘मातृभाषा’ आहे, तर मला हे जमलेच पाहिजे, हा निग्रह आपल्या मनात असावा. आणि त्या दृष्टीने आपण सतत प्रयत्नशील राहाणे आवश्यक आहे.

हेही वाचा :  PhD Rules: 'पीएच. डी'च्या नियमांत बदल

डॉ. निवेदिता सराफ, भाषा-समुपदेक

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत फायरमन पदांची भरती

Pimpri Chinchwad Municipal Corporation Invites Application From 150 Eligible Candidates For Fireman Posts. Eligible Candidates …

अहमदनगर जिल्हा न्यायालय अंतर्गत सफाईगार पदांची भरती

Ahmednagar District Court  Bharti 2024 – Ahmednagar District Court Invites Application From 02 Eligible Candidates …