मंत्री म्हणाले- ताणू नका, जरांगे म्हणाले- दबाव आणू नका! शिष्टमंडळाच्या चर्चेत नेमकं काय घडलं?

Maratha Reservation: महाराष्ट्र सरकारच्या शिष्टमंडळाने मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांची भेट घेतली. यावेळी 30 दिवसांची मुदत द्या, आंदोलन जास्त ताणू नका, अशी विनंती मंत्री गिरीश महाजन यांनी जरांगे यांना केली. एका दिवसात जीआर काढणं शक्य नसल्याचे यावेळी महाजन यांनी सांगितले. दरम्यान एका महिन्याचा अवधी कशासाठी असा प्रश्न जरांगे यांनी विचारला.

दरम्यान जीआर काढण्यावर मनोज जरांगे ठाम असल्याचे दिसून येत आहे. शिष्टमंडळ जरांगे यांचे मन वळवण्याचा प्रयत्न करत आहे. आम्ही आरक्षणाबाबत  सकारात्मक असल्याचे महाजन यांनी यावेळी सांगितले. 

मराठा समाजाला आरक्षण देण्याचा जीआर काढण्याबाबत राज्य सरकार मागणार जरांगे पाटील यांच्याकडे 30 दिवसांचा वेळ मागितलाय सरकारकडून एका दिवसांत जीआर काढणं शक्य नाही, त्यामुळे राज्य सरकारच्या  शिष्टमंडळानं 30 दिवसांचा वेळ मागितलाय सरकारच्या वतीनं अर्जुन खोतकरांनी जरांगेपाटलांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी सरकारकडून 30 दिवसांची मुदत मागितलीय. आता जरांगे पाटील यावर काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

आपण त्यांना तीन ते चार दिवसांचा वेळ दिला आहे. अध्यादेश न निघाल्यास पाणी देखील त्यागणार आहे, असे जरांगे म्हणाले. 

हेही वाचा :  Budget 2023 : अर्थसंकल्पात सुधारणा करणारे ट्रस्ट आणि धर्मादाय संस्था यांच्यावर वाईट परिणाम होतील, तज्ञांचा दावा

दरम्यान गिरीश महाजन यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. जरांगेंच्या मागणीवर सरकार सकारात्मक आहे. आम्हाला जरांगेंच्या तब्येतीची काळजी आहे. संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या पाठीशी आहे. आता आपण अंतिम टप्प्यापर्यंत आलो आहोत. आपल्याला शेवट गोड करायचा आहे. शिंदे-फडणवीस- पवार यांच्याशी मी बोलतो. आपण हे उपोषण सोडून मुंबईला यावे, असे आवाहन महाजन यांनी केले.

हे सरकार धाडसी आहे.जे निर्णय होत नव्हते.ते निर्णय या सरकारने घेऊन दाखवले आहे त्यामुळे जीआरची याच सरकारकडून अपेक्षा आहे असंही जरांगे पाटलांनी म्हटलं आहे.पण जीआर घेतल्याशिवाय माघार नाही असंही ते म्हणाले.

मनोज जरांगे आपल्या उपोषणावर ठाम आहेत. आणखी जास्तीत जास्त 4 दिवसांची मुदत देतो, असे ते म्हणाले.

दुसरीकडे सरकारकडून दोन समाजात भांडणं लावायचं काम सुरु आहे, मराठा-ओबीसीत भांडणं लावायचं काम करु नये असा घणाघात विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी केलाय.. ओबीसी आरक्षण वाढवून द्या आणि त्यात मराठा समाजाचा समावेश करा अशी आपली भूमिका आहे. याबाबत भुजबळांशीही बोलणं झालंय, असंही विजय वडेट्टीवारांनी म्हटलंय.

सरकारने  गुडघे टेकलेत- राऊत 
सरकारने आंदोलकांसमोर गुडघे टेकलेत अशी टीका संजय राऊत यांनी केली. सरकारच्या पन्नास खोक्यांनी जरांगे पाटील किंवा मराठा आंदोलक विकले जाणार नाहीत असं राऊत म्हणाले. 

हेही वाचा :  ...म्हणून केंद्र सरकारने राष्ट्रीय कुस्ती महासंघ बरखास्त केला; ठाकरे गटाने सांगितलं 'खरं' कारण



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘मुंबईत गिरगावमध्ये नोकरीची संधी पण मराठी उमेदवार नको’; महिला HR ची संतापजनक पोस्ट

HR LinkedIn Post Related to Marathi People : सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत …

देवीच्या जागरणात अघटित घडलं! काली मातेच्या भूमिकेतील मुलाकडून चुकून 11 वर्षांच्या मुलाची हत्या

Crime News Today: उत्तर प्रदेशच्या देवी जागरणचा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात …