पतीच्या त्रासाला कंटाळून आल्या माहेरी
शिवांगी गोयल यांनी लग्नापूर्वी दोनदा यूपीएससीची परीक्षा दिली होती. पण दोन्ही वेळा अपयश आले. शेवटी परिस्थितीला कंटाळून शिवांगी गोयल यांनी लग्न केले. पण नियतीच्या मनात मात्र काहीतरी वेगळेच होते. लग्नाच्या काही कालावधीनंतर पती व सासरच्या लोकांनी त्यांना मारहाण व छळ करण्यास सुरुवात केली. या काळात त्यांना एक मुलगी झाली. पण मुलींच्या जन्मानंतर त्यांच्या पतीच्या वागणूकीत काहीह बदल झाला नाही. शेवटी त्यांच्या वडिल्यांनी त्यांना माहेरच्या घरी बोलावले.
(वाचा :- प्रिया बापटने घेतली उमेशच्या प्रेमाची सत्वपरीक्षा, शून्य डिग्री तापमानात केलं असं काही की तुम्हीही हैराण व्हाल)
त्या दिवसानंतर बदलले आयुष्य
शिवांगी गोयल आपल्या 7 वर्षांच्या मुलीला घेऊन माहेरी आल्या. पण त्यांनी हिम्मत हारली नाही. स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. शिवांगी यांनी पुन्हा यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली. यावेळी म्हणजे 2021 मध्ये त्या तिसर्या प्रयत्नात 177 व्या रँकसह IAS अधिकारी बनल्या.
(वाचा :- कोणी गोंदवलं हातावर नाव तर कोणी प्रेमासाठी धर्मच बदलला, बॉलिवूड स्टार्सनी जोडीदारांना भन्नाट स्टाईलमध्ये केलं propose)
कुटुंबाला दिले यशाचे श्रेय
शिवांगी गोयल यांचे लग्नानंतरचे आयुष्य चढ-उतारांनी भरलेले होते. त्या पूर्णपणे खचल्या होत्या. या सगळ्यातून बाहेर पडून आपल्या मुलीचे आयुष्य कसे चांगले करावे हे त्यांना समजत नव्हते. UPSC परीक्षेचा निकाल येईपर्यंत शिवांगी गोयल यांची घटस्फोटाचा केस कोर्टात सुरू होती. पण जिद्दीने त्यांनी त्यांचे आयुष्य बदलून टाकले.
(वाचा :- माझी कहाणी : नवऱ्याचे माझ्यावर प्रेम नाही, त्याने मला पत्र लिहिले अन् ….)
लोकं काय बोलतील?
भारतात आपल्या आयुष्यात काही झाले तरी लोक काय बोलतील असा विचार मनात येतो. आपल्याकडे लोक काय बोलतील हा एक आजारच आहे. या गोष्टीमुळे अनेक महिला नात्यात राहतात. पण असे करून तुम्ही तुमचे आयुष्य खराब करुन घेत आहात. या गोष्टीकडे लक्ष द्या. आपल्याला एकच आयुष्य मिळते त्यामुळे ते मनमोकळेपणाने जगा.
कुठे मदत मिळेल
- जर तुम्ही किंवा तुमच्या ओळखीमध्ये कोणीही अशा परिस्थितीला सामोरे जात असाल तर या पद्धतीने तुम्ही या समस्येमधून मार्ग काढू शकता.
- जवळच्या लोकांची मदत घ्या
तुमच्या आयुष्यातील गोष्टी जवळच्या तुमच्या सर्व गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करा. - तुमच्यावर कोणी हात उचलू शकत नाही ही गोष्टी डोक्यात पक्की बसवा.
1800120820050, किंवा 18001024040
महाराष्ट्रात 1091/ 1291, (011) 23317004 या क्रमांकावर कॉल करा इथं तुम्हाला मदत मिळू शकेल.