पण हे सर्व फायदे तेव्हाच मिळतात जेव्हा तुम्ही त्याचा योग्य पद्धतीने वापर करता. न्युट्रिशनिस्ट किरण कुकरेजा सांगतात की, तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी शरीरासाठी तेव्हाच फायदेशीर ठरते जेव्हा तुम्ही त्याचा योग्य पद्धतीने वापर कराल. अशा परिस्थितीत तांब्याच्या भांड्यात किंवा बाटलीतील पाणी पिताना या 3 प्रकारच्या चुका टाळणे आवश्यक आहे. अन्यथा, शरीरात वेदनांसह अनेक गंभीर आजार वाढण्याचा धोका असतो. (फोटो सौजन्य :- istock, pexels.com)
तांब्याच्या भांड्यात पाणी पिताना करू नका या चुका
दिवसभर तांब्याच्या बॉटलमधील पाणी पिणे
जर तुम्ही दिवसभर तांब्याच्या बाटलीत किंवा भांड्यात ठेवलेले पाणी पीत असाल तर तुमच्या शरीरात तांब्याचे प्रमाण जास्त होण्याची शक्यता असते. यामुळे लिव्हर आणि किडनी निकामी होण्याच्या धोक्यासोबतच गंभीर मळमळ, चक्कर येणे, पोटात दुखणे या समस्या देखील होऊ शकतात.
(वाचा :- पोट, मांड्या, कंबरेची चरबी झटक्यात जाईल जळून, फॉलो करा एक्सपर्टने सांगितलेला 7 दिवसांचा Weight Loss Diet Plan)
तांब्याच्या भांड्यात लिंबू व मध घातलेले पाणी पिणे
हे अगदी खरे आहे की सकाळी रिकाम्या पोटी लिंबू आणि मध मिसळलेले पाणी पिणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. पण तांब्याच्या भांड्यात लिंबू व मध घातलेले हे पाणी प्यायल्यावर ते विषासारखे काम करते. वास्तविक, लिंबूमध्ये आढळणारे अॅसिड तांब्यासोबत मिक्स होऊन शरीरात अॅसिड तयार होते, ज्यामुळे पोटदुखी, पोटात गॅस आणि उलट्या होण्याचा धोका असतो.
(वाचा :- व्यायाम व योग करण्याआधी चुकूनही करू नका ही 3 कामे, मजबूत होणं सोडाच शरीराचा सांगडा बनवतील या भयंकर चुका..!)
तांब्याचे भांडे किंवा बॉटल रोज धुणे
तांब्याची भांडी नियमित धुवू नयेत. ही भांडी दररोज धुतल्याने त्यातील फायदेशीर किंवा आरोग्यासाठी उपयुक्त असणारे गुणधर्म कमी होऊ लागतात. त्यामुळे प्रत्येक वापरानंतर ते फक्त स्वच्छ पाण्याने धुवून घ्या आणि महिन्यातून एकदा मीठ आणि लिंबू वापरून पूर्णपणे स्वच्छ करा.
(वाचा :- हे 5 पदार्थ करतात इम्युनिटी लोखंडाइतकी मजबूत, कोरोना ते कॅन्सर कोणताच भयंकर आजार करू शकणार नाही शरीरावर हल्ला)
तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्यानंतर
या भांड्यात साठवलेले पाणी खूप उपयुक्त असले तरीही ते प्यायल्यानंतर काही गोष्टींची खबरदारी बाळगणे अत्यंत आवश्यक असते नाहीतरी पचनाच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. जसे की तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्यानंतर शक्यतो अर्धा तास दूध किंवा चहा पिऊ नये.
(वाचा :- Sinus Remedy : सायनस इनफेक्शनमध्ये दिसतात ही भयंकर व वेदनादायी लक्षणं, नाक मोकळं करण्यासाठी घरीच करा हा 1 उपाय)
तांब्याच्या भांड्यात पाणी पिण्याचे फायदे
पोटाचे विकार दूर होतात
पोटाचे कोणतेही विकार झाल्यास तांबाच्या भांड्यातील पाणी प्यावे. अतिसार, जळजळ असे रोग निर्माण करणारे जीवाणू तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्यानं नष्ट होतात. पोटदुखी,गॅस, अॅसिडिटी आणि बद्धकोष्टताही दूर होते. यकृत आणि मूत्रपिंड निरोगी राहण्यास मदत होते.
संधिवातासाठी उपयोगी
तांब्यात अँटी-इन्फ्लेमेटरी गुण असतात. त्यामुळे शरीरातील वेदना आणि सूज कमी होते. तसंच, तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्यामुळं शरीरातील युरिक अॅसिड कमी होते. त्यामुळं संधिवाताची समस्या दूर होते.
त्वचाविकार दूर होतात!
दररोज तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्याने चेहऱ्यावर फोड्या, तारुण्यपीटिका वा सुरकुत्या पडत नाहीत. त्यामुळं सैांदर्य टिकण्यास मदत होते.
वजन नियंत्रित राहते!
तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्याने शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होऊन वजन नियंत्रित राहण्यास मदत होते. तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी अॅन्टीबॅक्टेरीयल व अॅंटीव्हायरल असल्याने जखम भरण्यास मदत होते.
(वाचा :- सडलेल्या व विष भरलेल्या लिव्हरला पुन्हा जिवंत करतात हे 5 पदार्थ, लिव्हर फुटण्याआधी करा डॉक्टरांचे हे सोपे उपाय)
टीप : हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. हे कोणत्याही प्रकारे कोणत्याही औषधाचा किंवा उपचारांचा पर्याय असू शकत नाही. अधिक माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.