लग्नानंतर तब्बल 23 वर्षांनी अजय देवगणने पत्नी काजोलबद्दल काढले ‘हे’ उच्चार, जे सिंगल लोकांनी न वाचणंच ठरेल उत्तम!


Edited By Pratiksha More |
महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated:

अजय देवगण (ajay devgan) आणि काजोल (kajol) म्हणजे बॉलीवूड मधील आदर्श कपल होय. गेले दोन दशकांपासून हे दोघे सुखाचा संसार करत आहेत. दोघे कधीच कोणत्या विवाहबाह्य वादांमध्ये अडकले नाहीत आणि यातूनच दोघांचे एकमेकांवर किती प्रेम आहे हे दिसून येते. ही एव्हरग्रीन जोडी आजही अनेकांसाठी आदर्श यासाठी आहे की त्यांच्याकडून अनेक रिलेशनशिप टिप्स घेण्यासारख्या आहेत. दोघांच्या लग्नाची नुकतीच अॅनिव्हर्सरी झाली. यावेळी अजयने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून एक खास व्हिडीओ शेअर केला. हा व्हिडीओ त्याच्याच एका मुलाखती मधील होता. यात त्याने आपली पत्नी काजोल बद्दलची एक गोष्ट शेअर केली होती आणि आज पुन्हा एकदा तोच व्हिडीओ बाईट शेअर करून त्याने काजोलला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. (सभी तस्वीरें: इंडियाटाइम्स)

काय म्हणाला अजय?

हा व्हिडीओ जेव्हा काजोल आणि अजय दोघांनी स्पॉटबॉयला इंटरव्ह्यू दिला तेव्हाचा होता. या मुलाखती मध्ये रॅपीड फायर राउंड मध्ये विचारण्यात आले होते की काजोलने आजवर त्याला सर्वात मोठे कोणते असे सरप्राईज दिले आहे? काजोलने या प्रश्नाचे उत्तर देताना अजयने मुलांचं दिलेले सुख हे सर्वात मोठं गिफ्ट असल्याचं सांगितलं तर अजय ने यावर उत्तर देताना सांगितले की, “ही आजही माझ्या सोबत आहे हेच माझ्यासाठी सर्वात मोठं सरप्राईज आहे.” अजयचे उत्तर ऐकून काजोलला सुद्धा यावेळेस हसू आवरले नाही.

हेही वाचा :  नवीन वर्षात जोडीदारासोबत Honeymoon ला घेऊन जाताय, मग या चुका अजिबात करू नका

(वाचा :- प्रियांका चोप्राच्या सास-यांनी सूनेसाठी लिहिलेली ‘ही’ पोस्ट होतीये प्रचंड व्हायरल, विचार वाचून म्हणाल सासरा असावा तर असा..!)

दोघांचे स्वभाव आहेत विरुद्ध

अजय आणि काजोल दोघांचे स्वभाव विरुद्ध आहेत पण तरी त्यांचं लग्न गेली 23 वर्षे टिकून आहे. काजोल खूप बिनधास्त आणि बडबडी आहे तर अजय हा खूप शांत आणि प्रसंगी रागीट देखील आहे. तरी दोघांनी एकमेकांना सांभाळून घेतलं आहे आणि याचं खास श्रेय अजय काजोलला देतो. माझ्यासारख्या माणसासोबत एवढी वर्ष ती आहे हीच मोठी गोष्ट आहे हे त्याने आजवर अनेकदा बोलून दाखवलं आहे. कपिल शर्मा शो मध्ये आपल्या हॅप्पी मॅरीड लाईफचं रहस्य संग्नातन काजोल म्हणाली की, “मी बोलते आणि अजय फक्त ऐकतो.” तिचं हे उत्तर ऐकून एकच हशा पिकला.

(वाचा :- माझी कहाणी : हनीमूनच्या रात्री ईमेलमध्ये लपवून ठेवलेली एक चिठ्ठी सापडल्याने माझ्या नव-याचं एक खोल रहस्य उघड झालं आणि मग..!)

दिखावा करत नाही

अजय आणि काजोल जेव्हा एकमेकांच्या प्रेमात पडले तेव्हा त्यांनी योग्य वेळ साधून थेट लग्न केले. ना त्यांनी एकमेकांना फॅन्सी प्रपोज केलं. न कधी पब्लिसिटी साठी आपल्या प्रेमाचा आणि नात्याचा वापर केला. आपल्या नात्याबाबत ते लाईमलाईट पासून शक्य तितके दूर राहिले. लग्न सुद्धा त्यांनी एकदम धमाकेदार वा शाही पद्धतीने केलं नाही. हेच कारण आहे की दोघांचे विचार साधी राहणीशी निगडीत आहेत आणि म्हणून ते एकमेकांना खास सांभाळून घेतात.

हेही वाचा :  नांदेडमध्ये उद्धव ठाकरेंच्या स्वागतासाठी आलेले 21 जेसीबी गेले परत, कार्यकर्ते म्हणतात, 'मुख्यमंत्रीच...'

(वाचा :- ‘या’ एका भीतीमुळे सलमान खानने आजपर्यंत केलं नाही लग्न, इतक्या मोठ्या अभिनेत्याला नेमकी अशी काय असावी अडचण?)

लोकांच्या बोलण्याकडे लक्ष न देणे

तिसरा व्यक्ती आपल्या नात्याबाबत काय म्हणतो किंवा दुसऱ्यांना त्याबद्दल काय वाटतं याचा विचार काजोल आणि अजय दोघे सुद्धा करत नाही. दोघांचे हेच म्हणणे आहे की नातं हे आपल्यावर अवलंबून असतं, दुसऱ्यांवर नाही. जेव्हा त्यांनी लग्न केलं तेव्हा सुद्धा अनेकजण म्हणत होते की दोघांचे स्वभाव वेगवेगळे आहेत. दोघांचं अजिबात पटणार नाही. पण अजय आणि काजोल दोघांनी सुद्धा याकडे लक्ष न देता आपला संसार सुरु ठेवला आणि आज 23 वर्षे सुखाने त्यांचा संसार सुरु आहे.

(वाचा :- माझी कहाणी : मित्राला हॉटेलच्या एका रूममध्ये एकांतात भेटणं मला पडलं महागात कारण…!)

एकमेकांवर विश्वास

अजय आणि काजोलच्या नात्यातील सर्वात मोठी गोष्ट आहे त्यांचा एकमेकांवर असणारा विश्वास! म्हणजे कोणत्याही बाबतीत एकमेकांवर संशय न घेणे, एकमेकांना आपआपली स्पेस देणे या दोन गोष्टी अजय आणि काजोल यांनी कटाक्षाने पाळल्या आहेत. त्यामुळे त्यांच्यात मभेद झाले तरी मनभेद मात्र कधीच झाले नाहीत. हीच गोष्ट आजच्या कपल्सने त्यांच्याकडून शिकण्यासारखी आहे. लग्नापूर्वीच नातं आणि लग्नानंतरच नातं खूप वेगळ असतं आणि अशावेळेस त्या नात्याला विश्वासाची जोड देणे गरजेचे असते. ती ज्या कपल्सना देता आणि त्यांचा संसार नक्कीच अजय आणि काजोल सारखा वर्षानुवर्षे सुखाने सुरु राहतो.

हेही वाचा :  ... तर 2 ते 3 मंत्र्यांवर सभागृहात बोलणं म्हणजे फुसका बार ठरेल - अजित पवार

(वाचा :- बापरे, दोन्ही मुलांचा मृत्यु झाला नंतर नव-याची साथही सुटली, जगजीत सिंगच्या पत्नीची संपूर्ण कहाणी ऐकली तर तुम्हालाही रडू आवरणार नाही..!)

Web Title on the occasion of the wedding anniversary, ajay devgn shared a video on social media expressing his special feelings for kajol and wishing her.

(मराठी बातम्या from Maharashtra Times , TIL Network)



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Maharashtra Weather: राज्यातील ‘या’ भागांमध्ये पावसाचा इशारा; पाहा मुंबईत कसं असेल हवामान?

Maharashtra Weather : सध्या देशभरात नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागतोय. याशिवाय राज्यात उन्हाचा चटका …

पंकजा मुंडे बीडमध्ये भाजपचा बालेकिल्ला राखणार का? जनतेचा कौल कोणाला?

Beed Loksabha Constituency Special Report : राज्यात लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील दोन …