ज्येष्ठ साहित्यिक सुधीर रसाळ यांचं विधान
महाराष्ट्राच राजकीय वातावरण बदलेल तेव्हाच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा प्रश्न मार्गी लागेल, असे ज्येष्ठ समीक्षक प्राध्यापक डॉ. सुधीर रसाळ यांनी आज येथे सांगितले. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात काही राजकारण आहे की काय? अशी मला शंका, असे ते म्हणाले.
तसेच, नंदी दूध पितो यासंदर्भात बोलताना ते म्हणाले, श्रद्धा ठेवण म्हणजे अंधश्रद्धेचा भाग आहे, परमेश्वरांवर विश्वास ठेवणे म्हणजे या पातळीवर श्रद्धा ठेवण असं असू शकत नाही, खरं म्हणजे आपले आधुनिकीकरण कधी होणार हा प्रश्न आहे, असे ते म्हणाले.
महाराष्ट्र साहित्य परिषद डोंबिवली शाखेच्यावतीने माऊली सभागृहात एक दिवसीय समीक्षा संमेलन आयोजित केले आहे. यावेळी संमेलन अध्यक्ष पदावरून ज्येष्ठ समीक्षक सुधीर रसाळ बोलत होते.
“असे काही तरी घडतंय असं सांगणाऱ्यांना सामाजिक पातळीवर दोषी मानलं पाहिजे. समीक्षक म्हणून स्वतंत्र भूमिका असू शकत नाही, विचार करणारा नागरिक म्हणून अशा प्रकारच्या बातम्या देणं आणि लोकांनी त्यावर विश्वास ठेवणे, या सगळ्या मधून आपला समाज अजून किती बदलण्याची गरज आहे हे कळतं, आधुनिकीकरण होणं आवश्यक आहे. मात्र दुर्दैवाने या दृष्टीने समाजात काही होताना दिसत नाही, आधुनिकिकरण केव्हा होईल जेव्हा विचारवंतांचा मोठा वर्ग सतत अनेक सामाजिक प्रश्नांवर विचार मांडत राहील. एकेकाळी हा वर्ग होता, दुर्दैवाने आता तो अस्तित्वातच नाही. त्यामूळे अशा गोष्टी होतात. मुख्य आपला समाज आजही मध्ययुगीन पातळीवर जगतोय हेच यातून स्पष्ट होतय असं मला वाटतं.” असे डॉ. सुधीर रसाळ यांनी सांगितले.
“अभिजात भाषेसंदर्भात तज्ज्ञांनी निर्णय घ्यायचा असतो. त्याबाबद्दल आपण अकारण राजकारण करतो. अभिजात भाषा कशी ठरवायची याबाबत निकष आहे, समिती आहे त्यांनी हा प्रश्न सोडवायला पाहिजे होता, सादर केलेले पुरावे तपासून निर्णय घ्यायला पाहिजे होता. कोणत्याही प्रश्नांची योग्य प्रकारे सोडवणूक करत नाही ही दुर्दैवी बाब आहे.” असं देखील डॉ. रसाळ यांनी यावेळी बोलून दाखवलं.