लाइफ स्टाइल

महाराष्ट्रातील 500 वर्ष जुना समुद्री किल्ला; अभेद्य आणि अंजिक्य, महाराजांनाही जिंकता आला नाही

Murud Janjira Fort  : अथांग समुद्र आणि समुद्राच्या मध्यभागी भक्कमपणे दिमाखता उभा असलेला अभेद्य किल्ला पाहताक्षणीच अंगावर रोमांच उभा राहतो. रायगड जिल्ह्यातील मुरूड जंजीरा किल्ला हा महाराष्ट्रातील 500 वर्ष जुना समुद्री किल्ला आहे.  छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी हा किल्ला जिंकण्यासाठी अथक प्रयत्न करूनही आजवर कुणालाही हा किल्ला जिंकने त्यांना शक्य झाले नाही.  मुरूड जंजीरा किल्ला हा …

Read More »

अंत्यविधीआधी शंका आली अन् पोलिसांनी घरी नेला मृतदेह; शवविच्छेदनातून समोर आलं सत्य

Yavatmal Crime : यवतमाळमध्ये अंत्ययात्रा थांबवून पोलिसांनी मृत महिलेचे शवविच्छेदन केल्याची घटना समोर आली आहे. यवतमाळच्या जामनकरनगरमध्ये विवाहितेचा हृदयविकाराने मृत्यू झाल्यामुळे अंत्यविधीसाठी तिची अंत्ययात्रा काढण्यात आली होती. मात्र पोलिसांना विवाहितेच्या मृत्यूची तक्रार मिळताच चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली आहे. पतीनेच कौटुंबिक वादातून पत्नीची हत्या केल्याचे तपासातून समोर आलं आहे. हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर यवतमाळमध्ये खळबळ उडाली आहे. …

Read More »

कामासाठी मुलांना आजीकडे सोडलं अन्…; बहिण भावाचा आगीत होरपळून मृत्यू

प्रशांत परदेशी, झी मीडिया, धुळे : धुळ्यातून हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. झोपडीला लागलेल्या आगीत होरपळून दोन भावंडांचा जागीच मृत्यू झाला आहे. धुळ्यातील लोणखेडी येथे झोपडीला आग लागून आजोळी आलेल्या नाशिक येथील दोघा बालकांचा होरपळून मृत्यू झाला. या घटनेनं धुळ्यात शोककळा पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच बचाव पथक आणि स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत दोन्ही भावंडांचा …

Read More »

‘साहेबांची उणीव नेहमीच…’ विलासरावांबद्दल बोलताना रितेश देशमुखला अश्रू अनावर

Ritesh Deshmukh Emotional: विलासराव आणि दिलीपरावांनी एकमेकांना जपलं. आपल्या भावाला आपण काय देऊ शकतो, ही भावना एकमेकांनी कायम ठेवली. साहेबांना जाऊन जवळपास 12 वर्षे झाली, असे रितेश सांगत असतानाच भावूक झाला. त्यांची उणीव नेहमीच भासते हे सांगताना त्याला हुंदका आला. पण त्याने स्वत:ला सावरुन भाषण सुरु ठेवले.  साखर कारखान्यात विलासरावांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. दिग्गज कॉंग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत अनावरणाचा सोहळा …

Read More »

अमित ठाकरेंवर मारहाणीचा आरोप करणाऱ्या महेश जाधवांनी घेतला मोठा निर्णय

Mahesh Jadhav: गेल्या महिन्यात मनसे नेते पदावरुन हटवण्यात आलेले माथाडी कामगार नेते महेश जाधव यांनी वेगळी वाट धरली आहे. मनसे नेते अमित ठाकरे यांच्याशी फोनवरून वाजल्यानंतर त्यांनी आपला मनसेतील पदाचा राजीनामा दिला होता. महेश जाधव आणि अमित ठाकरे यांच्या संभाषणाची ही कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. यानंतर कामगाराची बाजू लावून धरल्याने मला मारहाण केल्याचा आरोप जाधव यांनी मनसे नेत्यांवर केला …

Read More »

वाशिम : जेवणाच्या ताटावरच मित्राने केली मित्राची हत्या; मानेवर थेट…

गणेश मोहळे, झी मीडिया, वाशिम : मानेवर कुऱ्हाडीने घाव घालून निर्घृण हत्या केल्याची घटना वाशिमच्या कारंजा तालुक्यातील टाकळी गावात घडली. या हत्येच्या घटनेमुळे टाकळी परिसरात एकच खळबळ उडाली आहे. जेवत असतानाच मित्रानेच मित्राची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. मानेवर कुऱ्हाडीने वार करत मित्रानेच त्याच्या मित्राचा जीव घेतल्याचं समोर आलं आहे. मृतकाचं नांव संतोष घोरमोडे असून त्याच्या हत्येचं कारण अद्याप …

Read More »

Govt Job: आरोग्य संचालनालय अंतर्गत बंपर भरती, 2 लाखांवर मिळेल पगार

Maharashtra Govt Job: चांगल्या पगाराची सरकारी नोकरी शोधत असलात तर तुमच्यासाठी ही अत्यंत महत्वाची अपडेट आहे. वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन केंद्र अंतर्गत शेकडो पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. राज्यभरातील विविध जिल्ह्यांमध्ये ही भरती केली जाणार असून यासाठी इच्छुक आणि …

Read More »

शिवजयंतीनिमित्त पुण्यात वाहतुकीत मोठा बदल; ‘हे’ महत्त्वाचे रस्ते राहणार बंद

Shiv Jayanti 2024 : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची  394 वी जयंती साजरी सोमवारी जगभरात साजरी करण्यात येणार आहे. त्यामुळे सगळीकडे उत्साहात ही साजरी केली जाणार आहे. अशातच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पुण्यात वाहतुकीमध्ये सोमवारी मोठे बदल करण्यात आला आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळता सोमवारी सकाळी सात ते गर्दी संपेपर्यंत नेहरू रस्ता, लक्ष्मी रस्ता, शिवाजी रस्ता, बाजीराव …

Read More »

खासदार श्रीकांत शिंदेंच्या शिरपेचात मानाचा तुरा, संसद रत्न पुरस्काराने गौरव!

MP Shrikant Shinde Parliament Ratna Award: शिवसेनेचे कल्याण मतदारसंघाचे खासदार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवण्यात आलाय. श्रीकांत शिंदे यांना नुकताच 14 व्या संसद रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 17 व्या लोकसभेत बजाविलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला असून तेलंगणाच्या राज्यपाल तमिळीसई सौंदरराजन यांच्याहस्ते शिंदे यांचा गौरव करण्यात आला.  महाराष्ट्र …

Read More »

Maharastra Politics : ‘…म्हणून अजितदादा भाजपसोबत गेले’, रोहित पवारांचा खळबळजनक दावा, म्हणाले ‘मलाही ऑफर…’

NCP Political Crisis : लोकसभा निवडणूक (LokSabha Election) तोंडावर आल्याने आता राजकीय वर्तुळात देखील आरोप प्रत्यारोपाच्या फेऱ्या वाढल्या आहेत. राज्यात गेल्या 5 वर्षात माजलेल्या (Maharastra Politics) राजकीय अराजकतेनंतर आता गटाचं राजकारण सुरू झालंय. त्यामुळे आता राज्याचं राजकारण नेमकं कोणत्या दिशेला जातंय? असा सवाल विचारला जात आहे. अशातच आता आळंदी येथे बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit …

Read More »

नाशिकच्या विद्यार्थ्याने दिल्ली आयआयटीच्या वसतीगृहात संपवलं आयुष्य

सोनू भिडे, झी 24 मीडिया, नाशिक: नाशिकच्या विद्यार्थ्याने दिल्ली आयआयटीच्या वसतिगृहात आत्महत्या केली. यामुळे वसतिगृह परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. वरद नेरकर असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. मूळचा नाशिक येथे राहणारा वरद दिल्ली आयआयटीमध्ये शिक्षण घेत होता.  गुरुवारी त्याने स्वत:चे आयुष्य संपवम्याचा दुर्देवी निर्णय घेतला. प्रोजेक्टमध्ये आवश्यक ते …

Read More »

मराठा आरक्षणासंदर्भात मागवलेल्या हरकतींचा अहवाल समोर, 40 टक्के लोकांना वाटतंय…

Maratha Reservation: मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील आंतरवाली सराटी येथे पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. त्यांनी पूर्णपणे अन्नपाण्याचा त्याग केलाय. त्यांची परिस्थितीत दिवसेंदिवस खालावत चालली आहे. तसतसा मराठा समाजाचा आक्रोशही वाढत आहे. दुसरीकडे मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण देण्याचा पुनरोच्चार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलाय. या सर्वाच्या पार्श्वभूमीवर आरक्षणासंदर्भात एक मोठी बातमी समोर येत आहे. मराठा समाज …

Read More »

शिवसैनिकांचे खच्चीकरण…शिवसेना वाचवण्यासाठी आम्ही हे धाडस केलं- मुख्यमंत्री शिंदे

CM Eknath Shinde: शिवसैनिकांचे खच्चीकरण केलं गेल. त्यामुळे शिवसेना वाचवण्यासाठी आम्ही हे धाडस केलं. जगात असं धाडस कुणी करणार नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. कोल्हापुरात सुरु असलेल्या शिवसेनेच्या अधिवेशनात त्यांनी हे विधान केले. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. 50 आमदार सोबत आले, पुढे काय होणार माहीत नव्हतं, बाळासाहेबांचे विचार टिकवण्यासाठी सत्तेबाहेर जाण्याचा हा निर्णय घेतला. शिवसेना वाचवण्यासाठी तुम्ही …

Read More »

मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी खूशखबर! ‘या’ मार्गावर धावणार विशेष गाड्या

special train for mumbai nagpue pune amravati : मध्य रेल्वेकडून अनेकदा महत्त्वाचे निर्णय घेण्यात येतात. याचदरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये गाड्यांचे 90 फेऱ्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे प्रतीक्षा यादीचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. मुंबई, नागपूर आणि पुणे या मार्गावरुन धावणार असून  पश्चिम विदर्भातील प्रवाशांना याचा फायदा होणार …

Read More »

लेक सुप्रियाविरोधात सून सुनेत्रा मैदानात! शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले ’55 ते 60 वर्षं आम्ही…’

Sharad Pawar on Senetra Pawar: लोकसभा निवडणुकीत (LokSabha Election 2024) बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्याविरोधात अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. याचं कारण बारामतीमध्ये सूनेत्रा पवार यांच्या कार्याचा आढावा देणारा चित्ररथ फिरताना दिसत आहे. यामुळे बारामतीत थेट  ननंद-भावजय यांच्यात लढत होऊ शकते. शरद पवार यांनी पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना यावर प्रतिक्रिया …

Read More »

‘मी तुमच्या भावाचा मुलगा’ म्हणणाऱ्या अजित पवारांना शरद पवारांचं प्रत्युत्तर, म्हणाले ‘उगाच भावनिक…’

Sharad Pawar on Ajit Pawar: शरद पवार यांनी पक्षाचं नाव आणि चिन्ह निवडणूक आयोगाला देण्याचा विधानसभा अध्यक्ष आणि निवडणूक आयोगाच्या निर्णयावर सडकून टीका केली आहे. असा निर्णय होईल याची आम्हाला खात्री होती. त्याचं कारण विधानसभेचया अध्यक्षांनी पदाची प्रतिष्ठा ठेवलेली नाही. त्यांनी अपेक्षा होती तसाच निर्णय घेतला आहे. शिवसेनेच्या बाबतीतही त्यांना असाच निर्णय घेत, त्याची पुनरावृत्ती केली अशी टीका त्यांनी केली …

Read More »

मराठा समाजाने मुंबई-आग्रा महामार्ग रोखल्यानंतर मनोज जरांगेंचं मोठं विधान; समाजाला केलं आवाहन

Manoj Jarange: मनोज जरांगे मराठा आरक्षणासाठी उपोषणावर बसले असताना दुसरीकडे मराठा समाज आक्रमक झाला आहे. मराठा समाजाने आज मुंबई आग्रा महामार्गावर रास्ता रोको केला. सकल मराठा बांधवांच्या वतीने नाशिकमध्ये मुंबई-आग्रा रोड वर रस्ता अडवण्यात आला. या आंदोलनात शेकडो मराठा सहभागी झाले होते. मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ हा रास्ता रोको केल्याचं त्यांनी सांगितलं. यादरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी 10 वी, …

Read More »

छत्रपती शिवाजी महाराज नेमके कसे दिसायचे? महाराजांचं मूळ चित्रं पाहिलं आहे का?

Chhatrapati Shivaji Maharaj Original Photo : भारताचं आराध्य दैवत, आपले राजे, आपला देव असे छत्रपती शिवाजी महाराज आजही भारतीयांच्या श्वासा श्वास वसले आहेत. जय शिवाजी जय भवानीचा नारा देताच एक वेगळाच संचार आपल्याला रक्ता रक्तात होतो. येत्या सोमवारी 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांची तारखेनुसार जयंती आहे. महाराष्ट्रासाठी हा सर्वात उत्साहाचा दिवस असतो. आजही अनेक घरांमध्ये मुलं महाराजांची शौर्य कथा ऐकून …

Read More »

वन रक्षक विभागाची लेखी परीक्षा उत्तीर्ण झाली, पण मैदानावर सराव करतानाच घडलं भयंकर, तरुणीचा मृत्यू

कुणाल जमदाडे, झी मीडिया Marathi News Today:  वनरक्षक पदाची लेखी परीक्षा उत्तीर्ण होऊन काही दिवसांनंतर असलेल्या शारीरिक चाचणीसाठी मैदानावर धावण्याचा सराव करणाऱ्या 27 वर्षे विवाहितेचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.  संगमनेर शहरातील मनीषा दीपक कडणे (वय 25) असे मयत विवाहितेचे नाव असून गुंजाळवाडी ग्रामपंचायत हद्दीतील गोल्डन सिटी परिसरात मैदानावर ही …

Read More »

टोमॅटोच्या नावे कांद्याची होतेय परदेशात तस्करी, 82.93 मेट्रिक टन कांदा…

Smuggling Of Onion In Marathi: देशात कांद्यावर निर्यातबंदी लावण्यात आली आहे. मात्र, टोमॅटोच्या नावे कांद्याची परदेशात तस्करी होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. नागपूरात ही घटना घडली आहे. टोमॅटोच्या कंटेनरमध्ये 82.93 मॅट्रिक टन कांदा लपवून परदेशात पाठवण्यात येत होता.  कांदा निर्यातबंदी असताना यूएईला पाठवण्यात येत असल्याची माहिती सीमा शुल्क विभागाला मिळाली होती. नाशिकच्या दोन निर्यातदारांनी टोमॅटोच्या कंटेनरमध्ये टोमॅटोच्या पेट्यांमागे कांदा …

Read More »