म्हणूनच काही लोकांसाठी कोमट पाणी आरोग्यदायी असू शकते, तर काही लोकांनी नॉर्मल पाणी पिणे हे त्यांच्या फायद्याचे असते. पण असे का? हीच गोष्ट आज आपण या लेखातून जाणून घेणार आहोत. आपण पाणी तर पितो पण त्यामागची ही महत्त्वाची गोष्ट माहित असणे सुद्धा गरजेचे आहे. चला तर जाणून घेऊया. तुम्ही यातील कोणत्या गटात येता हे सुद्धा बघा.
आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितले सूत्र
आयुर्वेद तज्ज्ञ डॉ.रेखा यांनी ‘अष्टांगहृदय सूत्रस्थान’चे उदाहरण देत कोणत्या व्यक्तीने कोणते पाणी प्यावे, याची माहिती दिली. त्या सांगतात की पाणी हे जीवन देणारे, तृप्त करणारे, आनंद देणारे आणि अमृतसारखे मानले जाते.
(वाचा :- Oil For Kidney : खराब झालेल्या दोन्ही किडन्या होतील मजबूत व स्वच्छ, रोज जेवणात फक्त इतके चमचे वापरा हा पदार्थ)
नॉर्मल पाणी कोणी प्यावे?
आयुर्वेदिक डॉक्टर रेखा यांच्या मते, खाली दिलेल्या परिस्थितीत किंवा समस्यांनी ग्रस्त असलेल्या लोकांनी फक्त सामान्य पाणी प्यावे. कोमट पाणी प्यायल्याने त्यांच्या समस्या वाढू शकतात.
- मद्यपान केल्यानंतर
- थकवा किंवा चक्कर आल्यावर
- खूप तहान लागली असेल तेव्हा
- सूर्यप्रकाशात राहिल्यानंतर
- ब्लीडिंग डिसऑर्डरने ग्रस्त असल्यास
- अन्न विषबाधेला बळी पडल्यास नॉर्मल पाणी पिणे इष्ट ठरते.
(वाचा :- जेवणासोबत सॅलेड खात असाल तर थांबा नाहीतर नुकसान अटळ, न्युट्रिशनिस्टने सांगितली सॅलेड खायची योग्य वेळ आणि पद्धत)
नॉर्मल पाणी म्हणजे नेमके काय?
आयुर्वेदात सामान्य पाणी कशाला म्हणतात हेही डॉक्टरांनी सांगितले. आयुर्वेद सांगते की, पाणी पिण्यापूर्वी उकळून घ्यावे. यानंतर, हे पाणी रूम टेम्परेचरवर थंड होऊ द्यावे. अशा पाण्याला नॉर्मल पाणी म्हणतात.
(वाचा :- कोलेस्ट्रॉल व ट्रायग्लिसराईड नसा आतून पोखरते व पूर्ण रक्त आटवते, हार्ट व ब्रेन अटॅक येण्याआधी सुरू करा हे उपाय)
कोमट पाणी कोणी प्यावे?
आयुर्वेदिक डॉक्टर रेखा यांच्या मते, पुढील परिस्थिती किंवा समस्यांनी ग्रस्त असलेल्यांनी कोमट पाणी प्यावे.
- भूक न लागणे
- कमी पचनशक्ती असणे
- घसा खवखवणे किंवा घशात सूज येणे
- ताप
- खोकला किंवा सर्दीमध्ये
- शरीरात वेदना होत असतील तेव्हा कोमट पाणी प्यावे.
(वाचा :- घसा व नाकात साचलेला कफ मुळापासून होईल साफ व टायफॉईड, करोनाचा धोकाही टळेल, सर्दी-खोकला सुरू होताच करा हे 5 उपाय)
ना जास्त गरम ना थंड पाणी
पाणी पिताना आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा ती म्हणजे त्याचे तापमान जास्त गरम किंवा खूप थंड नसावे. यामुळे शरीराला त्रास होऊन तुम्ही आजारी पडू शकता. मंडळी, ही माहिती नक्की लक्षात ठेवा आणि पाणी सेवन करताना काळजी घ्या.
(वाचा :- Diabetes Remedy : घरातील झाडांची ही पानं तोडून रोज उपाशी पोटी पाण्यात घालून प्या, कधीच वाढणार नाही Blood Sugar )
टीप : हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा.
कोणी कोणतं पाणी प्यावं?