बाबासाहेबांची ओळख एक न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी आणि समाजसुधारक अशी आहे. ते संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री होते. देशासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल दरवर्षी त्यांची जयंती साजरी केली जाते. तसेच ६ डिसेंबर रोजी चैत्यभूमीवर लाखो भीमसैनिक एकत्र येऊन आदरांजली वाहतात.
आंबेडकरांच्या विचारांनी लाखो तरुणांना प्रेरणा दिली आणि त्यांच्या विचारांचे अनुसरण केल्याने अनेक तरुणांचे जीवन बदलले. बाबासाहेबांते १० विचार तुम्हाला आयुष्यातील प्रत्येक कठीण क्षणात प्रेरणा देतील..
डॉ भीमराव आंबेडकरांचे विचार
१) मला तो धर्म आवडतो जो स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव शिकवतो.
२) महिलांनी ज्या प्रमाणात समाजाची प्रगती साधली आहे त्यावरून मी समाजाची प्रगती मोजतो.
३) जे इतिहास विसरतात ते इतिहास घडवू शकत नाहीत.
४) शिक्षित व्हा, संघटित व्हा
५) धर्म माणसासाठी आहे आणि माणूस धर्मासाठी नाही.
६) माणूस नश्वर आहे, तसेच विचारही आहेत. वनस्पतीला पाण्याची आवश्यकता असते, अन्यथा ते कोमेजून मरतात. तसेच एखाद्या कल्पनेच्या प्रचार प्रसाराची गरज असते.
७) महान माणूस एखाद्या प्रतिष्ठित माणसापेक्षा वेगळा असतो कारण तो समाजाचा सेवक होण्यास तयार असतो.
८) समानता ही काल्पनिक गोष्ट असू शकते, परंतु तरीही ती एक नियमन तत्त्व म्हणून स्वीकारली पाहिजे.
९) बुद्धीचा विकास हे मानवी अस्तित्वाचे अंतिम ध्येय असले पाहिजे.
१०) मानता एक काल्पनिक असू शकते, परंतु तरीही ते एक नियमन तत्त्व म्हणून स्वीकारले पाहिजे.