औरंगजेबाला मरण्यासाठी असं सोडून दिलं की आजपर्यंत त्याला कोणी विचारत नाही – योगी आदित्यनाथ

CM Yogi Adityanath : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ रविवारी महाराष्ट्राच्या पुणे दौऱ्यावर आहेत. यादरम्यान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी वेद श्री तपोवन मठात आध्यात्मिक गुरू गोविंद देव गिरी महाराज यांची भेट घेतली. आळंदीमध्ये आज गीता-भक्ती अमृत महोत्सवाचा समारोप होत आहे. या कार्यक्रमासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, बाबा रामदेव, श्री श्री गोविंद महाराज, दिलीप वळसे पाटील हे उपस्थित होते. यावेळी बोलताना योगी आदित्यनाथ यांनी औरंगजेबाला कोणी विचारत नाही असं म्हटलं आहे.

पुण्याच्या आळंदीमध्ये गीता भक्ती अमृत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात अनेक प्रतिष्ठित साधू संत सहभागी झाले होते. यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील सामील झाले होते. या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भक्तीतून निर्माण होणारी ही शक्ती नेहमी शत्रूंचा पराभव करते असे म्हटलं आहे.

काय म्हणाले योगी आदित्यनाथ?

“महाराष्ट्र नशीबवान आहे कारण शेकडो वर्षांपासून तुम्हाला संतांचा आशीर्वाद मिळत आहे. भक्तीतून निर्माण झालेली ही शक्तीच शत्रूंचा नेहमीच पराभव करते. समर्थ रामदास, छत्रपती शिवाजी महाराज इथूनच आलेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी संपूर्ण भारतात तेज पसरवलं होतं. त्या कालखंडात त्या औरंगजेबाच्या साम्राज्याला आव्हान दिलं होतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला तफडण्यासाठी आणि मरण्यासाठी असं सोडून दिलं की आजपर्यंत त्याला कोणी विचारत नाही,” असे योगी आदित्यनाथ म्हणाले.

मी नाथ संप्रदायाचा सामान्य अनुयायी आहे. आमचे नाते छत्रपती शिवाजी महाराजांशी आहे, मुघलांशी नाही, असेही योगी आदित्यनाथ म्हणाले.

हेही वाचा :  viral video: पुण्यात घडलंय - बिघडंलय... बटाटे पाहण्यासाठी लोकं का करतायेत गर्दी? जाणून घ्या



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

NDA vs ‘INDIA’: तिसऱ्या टप्प्यात 93 जागांवर मतदान, मतदारांचा कौल कोणाला?

Loksabha Election 2024: तिस-या टप्प्यात म्हणजे 7 मे रोजी देशात 93 जागांवर मतदान होणार आहे… …

मुंबईत मराठी-गुजराती वाद पेटला! आदित्य ठाकरे आक्रमक; मराठी उमेदवाराला प्रचार न करु दिल्याचा आरोप

Loksabha Election 2024 : नोकरीसाठी मराठी माणूस नको ही एका एचआरची पोस्ट व्हायरल झालेली असतानाच …