माझा नवरा लग्नापासूनच इतर महिलांसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. माझी एवढी फसवणूक करूनही त्याला कधी पश्चाताप झाला नाही हे दुर्दैव! मला वाटत होते की मला जगातील सगळ्यात चांगला जोडीदार मिळाला आहे. पण हा माझा गैरसमज ठरला आणि मी पुरती फसली आहे. (गोपनीयतेच्या कारणामुळे आम्ही व्यक्तीची ओळख उघड करत नाही.) (फोटो सौजन्य :- iStock)
मी हतबल आहे
त्याच्या मोबाईलमध्ये मी अनेक मुलींचे मेसेज-व्हिडीओ पाहिले आहेत. म्हणून एकदा मी त्याला याबाबत जाब विचारला. तेव्हा त्याने उलट मलाच दोष दिला. सुरुवातीला मला वाटले की त्याच्याकडून चुकून ही गोष्ट झाली असावी. चुकून तो कोणाच्या तरी मुलीच्या जाळ्यात अडकला असावा. पण मला कळून चुकले की तो साळसूदपणाचा आळ आणत मला मूर्ख बनवत आहे. हे सगळं कळत असूनही मी काहीच करू शकत नाही आहे. मला दोन मुले आहेत. मला हे नातं तोडायचं नाहीये, पण मलाही समजत नाही की त्याच्यासोबत कसं जगायचं? सगळं कळूनही मी गप्प आहे. मला सांगा मी काय करू ?
(वाचा :- 6 वर्ष डेट करूनही मी त्या राक्षसाला ओळखलं नाही,लग्नानंतर रोज ती गोष्ट करावी लागतेय ज्याची माझी मला लाज वाटतीये)
जाणकारांचे उत्तर
रिलेशनशिप कोच आणि प्रेडिक्शन्स फॉर सक्सेसचे संस्थापक विशाल भारद्वाज म्हणतात की, क्षणभराच्या आनंदासाठी लोक त्यांचे वैवाहिक जीवन उध्वस्त करतात हे पाहून मला वाईट वाटते. मी तुमच्या मनाची स्थिती चांगल्या प्रकारे समजू शकतो. एखादी व्यक्ती जेव्हा मनापासून माफी मागते तेव्हाच त्याला माफ करता येते. परंतु वारंवार फसवणूक करून तुमच्या पतीने हे स्पष्ट केले आहे की तो तुमच्यावर प्रेम करत नाही आणि त्यांना याचा पश्चाताप सुद्धा वाटत नाही.
(वाचा :- भारतीय मुलींची पहिली पसंत आहेत दर महिन्याला इतरी सॅलरी घेणारे पुरूष, स्टडीमध्ये झाला हा आश्चर्यजनक खुलासा)
पतीला स्पष्ट सांगा
तुम्ही म्हणालात की तुम्हाला हे लग्न मोडायचे नाही. अशा परिस्थितीत, मी तुम्हाला सांगेन की तुम्ही तुमचे नाते वाचवण्यासाठी एक शेवटचा प्रयत्न नक्कीच करू शकता. जर तुमचा पार्टनर त्याच्या चुकांसाठी तुम्हाला दोषी ठरवत असेल तर तुम्ही एकदा त्यांच्यासोबत बसून बोला. तुम्हाला ह्या नात्याची त्यांची किती गरज आहे याची जाणीव त्यांना करून द्या.
(वाचा :- युट्यूबर व अभिनेता भुवन बाम 14 वर्षे करतोय एकाच मुलीला डेट, या 3 गोष्टी नसत्या पाळल्या तर कधीच तुटलं असतं नातं)
मोकळा संवाद साधा
एवढेच नाही तर तुम्ही त्यांच्याशी याविषयी मोकळेपणाने बोलले पाहिजे आणि वैवाहिक नातेसंबंधात निष्ठा आणि प्रामाणिकपणा किती महत्त्वाची आहे हे देखील स्पष्ट केले पाहिजे. या दरम्यान तुम्ही त्यांना याची देखील जाणीव करून दिली पाहिजे की जर हे नाते तुटले तर त्याचा परिणाम तुमच्या दोन्ही मुलांवर होईल. जर तुमचे पती संवेदनशील असतील तर नक्कीच तुमची ही भावनिक साद त्यांना कळेल.
(वाचा ;_ सासूही एक वात्सल्याने भरलेली आईच, पण तिने जे विचित्र कृत्य माझ्या बाळासोबत केलं ते बघून डोक्यात तिडीकच गेलीये)
घरच्यांशी बोला
जर तुमचा नवरा खूप प्रयत्न करूनही आपली चूक मान्य करायला तयार नसेल तर तुम्ही तुमच्या घरच्यांशी याबाबत बोलले पाहिजे. नातं तुटलं तर आपलं काय होईल? ह्या विचाराने आपण अनेकदा गप्प राहतो. अर्थात एका बाजूला ही गोष्ट बरोबर असली तरी अशा प्रकारे शांत राहिल्याने वा सहन केल्याने काही काळाने तुम्हीच मोठ्या संकटात सापडू शकता. त्यामुळे एवढी मोठी गोष्ट कधीच एकटीने सहन करू नका. ती घरच्यांशी नक्की शेअर करा.
(वाचा :- Aamir Khanचं दोन्ही Ex-Wives सोबत आजही घट्ट नातं, Mr. Perfectionist चे लग्नाबाबत विचार ऐकून अक्षरश: थक्क व्हाल)
मुलांचा विचार करा
जर तुम्ही आता काम करत नसाल तर तुम्ही स्वतःसाठी आर्थिक पर्याय देखील शोधू शकता. मी हे यासाठी सांगत आहे कारण आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहून तुम्ही तुमच्या स्वाभिमानासाठी चांगले निर्णय घेऊ शकाल. मुलांचे संगोपन करण्याची जबाबदारी दोन्ही पालकांची आहे. मुले त्यांच्या पालकांना आदर्श मानतात. त्यांना योग्य नात्याची व्याख्या शिकवण्याची जबाबदारी तुम्हा दोघांची आहे. मुले स्वत: कोणत्या गोष्टी करत नाहीत. आईवडील जे करतात तेच मुले देखील करतात. त्यामुळे तुमच्या आयुष्यात जे काही समस्या आहेत त्याचा मुलांवर परिणाम होणारच, त्यामुळे जो काही निर्णय घ्याल तो त्यांचा विचार करूनच घ्या!
(वाचा :- लग्नानंतरही पुरूष का होतात दुस-या महिलांकडे आकर्षित? अखेर समोर आली 5 धक्कादायक खरी कारणं, पायाखालची जमिन सरकेल)