प्रथमेशने बालक-पालक या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत प्रवेश केला. त्यानंतर तो टाइमपास सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला. या सिनेमाला मिळालेली पसंती पाहता पुन्हा टाईमपास २ मधून त्याने धम्माल उडवून दिली. अरे हम गरीब हुए तो क्या हुआ, दिल के अमीर है हा त्याला डायलॉग लोकांच्या तोंडपाठ झाल. यानंतर प्रथमेश परब हा उर्फी या सिनेमात अभिनय करताना दिसला.
लालबागची राणी, पस्तीस टक्के काठावर पास, झिपऱ्या, ह्दयी वसंत फुलताना यांमधून त्याने आपल्या अभिनयाची चुणूक दाखविली.