गडगंज श्रीमंत घराण्याची सून झाली पण नव-याने जे केलं ते ऐकून हादराल,जबाबदार ठरले सासरचे लोक

जेव्हा एखादी मुलगी लग्न झाल्यावर आपले माहेरचे घर सोडून सासरी जाते आणि तिच्या नवीन आयुष्यात पाऊल ठेवते तेव्हा तिच्या मनात विचित्र प्रकारची भिती असते, अनेक प्रकारचे संकोच असतात. कारण ते घर त्याच्यासाठी पूर्णपणे नवीन असते. तिला माहित नसते की ज्या घरात ती चालली आहे तिथे तिला कशी वागणूक मिळेल आणि तिचे भवितव्य काय असेल? पण सासरी गेल्यावर हळूहळू त्या वातावरणाची आणि तिथल्या माणसांची तिला सवय होऊ लागते.

त्यात घरच्यांच्या मदतीने ती पत्नी आणि सून म्हणून दोन्ही जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडू लागते. पण अर्थात ही प्रक्रिया तेवढी सोप्पी नक्कीच नसते. जर सासरची मंडळी चांगली असतील तर मुलगी अवघ्या महिन्याभरात तिथे रुळते. पण परिस्थिती उलट असेल तर मात्र मुलीला त्या घरात रुळायला आणि एक चांगली सून बनवून दाखवायला वर्ष सुद्धा लोटू शकतात. (गोपनीयतेच्या कारणामुळे आम्ही व्यक्तीची ओळख उघड करत नाही.) (फोटो सौजन्य :- iStock, सर्व फोटो प्रातिनिधिक आहेत)

आदर्श सून बनाने नसते सोप्पे

आदर्श सून बनाने नसते सोप्पे

एक आदर्श सून होण्यासाठी नवविवाहितेला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. सासरच्यांची जणू अपेक्षा असते की गृहप्रवेशासोबत घरात पाऊल टाकल्या टाकल्या त्या अल्लड मुलीने एक आदर्श सून म्हणून भूमिका स्वीकारावी आणि एका रात्रीत सगळ्या घरची जबाबदारी घ्यावी. जेव्हा मी लग्न करून माझ्या सासरी गेले तेव्हा मी अशा अनेक गोष्टींचा अनुभव घेतला ज्या मी सून आहे म्हणून माझ्या सोबत होत होत्या आणि या आधी मी कधीच अशा गोष्टींचा अनुभव घेतला नव्हता.
(वाचा :- लव्ह मॅरेज करून सासरी आले अन् एक दिवस अचानक नव-याच्या रूममध्ये असं काहीतरी सापडलं जे पाहून काळजात चर्रर्र झालं..!)​

हेही वाचा :  आमदार पडळकर यांच्या बंधुनी केलेल्या पाडकामाविरोधात आज मिरज बंदची हाक

स्वत:ची जागा मिळवण्यासाठी झगडावे लागले

स्वत:ची जागा मिळवण्यासाठी झगडावे लागले

जेव्हा तुम्ही विभक्त कुटुंबाऐवजी संयुक्त कुटुंबात लग्न करता तेव्हा तिथे तुमचे स्थान निर्माण करण्यासाठी तुम्हाला खूप कष्ट करावे लागतात. याचे कारण म्हणजे तिथे अनेक लोक असतात आणि सर्वांनाच तुम्ही आवडालं याची खात्री नसते. शिवाय तुम्ही त्या घरात नवीन असता आणि आधीपासूनच तेथे असणाऱ्या अनेकांना स्वत:चे महत्त्व कमी होईल का याची भीती असते. त्यामुळे त्यांची मने जिंकून घेण्यासाठी आणि घरची जबाबदारी हळूहळू आपल्या हाती घेण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते.

(वाचा :- 6 वर्ष डेट करूनही मी त्या राक्षसाला ओळखलं नाही,लग्नानंतर रोज ती गोष्ट करावी लागतेय ज्याची माझी मला लाज वाटतीये)​

न मागता मिळतो सल्ला

न मागता मिळतो सल्ला

सासरच्या घरी तुम्हाला असे अनेक लोक भेटतील जे घर कसे सांभाळायचे याचा सल्ला द्यायला नेहमी तयार असतात. तुम्हाला नेमके काय वाटते याने त्यांना काही फरक पडत नाही. असे लोक एकच सांगतात की त्यांच्या घरात ते कसे वागतात आणि तुम्हालाही तसेच वागण्यास सांगतात. पण आपण मात्र आपल्या मनाला आणि बुद्धीला पटेल तेच करावे. कधी कधी असे वायफळ सल्ले ऐकून कंटाळा येऊ लागतो. पण ती लोकं सासरची असल्याने त्यांना उलट बोलता येत नाही. त्यांची प्रत्येक गोष्ट हसून मान्य करावी लागते.
(वाचा :- युट्यूबर व अभिनेता भुवन बाम 14 वर्षे करतोय एकाच मुलीला डेट, या 3 गोष्टी नसत्या पाळल्या तर कधीच तुटलं असतं नातं)​

हेही वाचा :  'विरोधक तुम्हाला दगड म्हणतात', प्रश्न ऐकताच एकनाथ शिंदे म्हणाले "हे सर्व छोटे, मोठे..."

जबाबदारी वाढते

जबाबदारी वाढते

कोणीतरी अगदी बरोबरच म्हटले आहे की लग्न हे रोलर कोस्टर राईडसारखे असते ज्यामध्ये खूप चढ-उतार येत असतात. लग्न झाल्यावर मी स्वतःची वेगळी बाजू देखील शोधली. खरे सांगायचे तर लग्नानंतर मी आधीपेक्षा जास्त जबाबदार झाले. कदाचित संपूर्ण घर सांभाळण्याची जबाबदारी अचानक माझ्या खांद्यावर येऊन पडली म्हणून मी स्वत:च्या मनाची तयारी केल्याने हा बदल घडला असावा. लग्नाआधी मी कधीच चार-पाच लोकांसाठी जेवण बनवले नव्हते. मात्र, लग्नानंतर आता मी हे रोजच करते आहे. स्वयंपाक करणे आणि भांडी धुणे या गोष्टी मला रोज कराव्या लागतील असे मला कधीच वाटले नव्हते,पण आता त्या माझ्या आयुष्याचा भाग झाल्या आहेत.

(वाचा :- भारतीय मुलींची पहिली पसंत आहेत दर महिन्याला इतरी सॅलरी घेणारे पुरूष, स्टडीमध्ये झाला हा आश्चर्यजनक खुलासा)​

लहान सहान गोष्टींमधला बदल

लहान सहान गोष्टींमधला बदल

प्रत्येक मुलीची स्वतःची जीवनशैली वेगळी असते. तिला स्वतःच्या मनाप्रमाणे जगायला आवडते, पण सासरच्या घरात हे चालत नाही. लग्नानंतर मला कळले की, सासरच्या लोकांच्या आवडीनिवडी आणि नापसंतीचीही काळजी घ्यावी लागते. जर त्यांना तुमच्या चेहऱ्यावरील लहान टिकली आवडत नसेल, तर नाईलाजाने तुम्हाला त्यांच्या समाधानासाठी मोठी टिकली लावावी लागते. नाहीतर वाद अटळ असतात. जर त्यांना वाटते की तुम्ही साडीच परिधान करून रहावे तर ते देखील निमूटपणे करावे लागते. माझ्या लग्नाच्या सुरुवातीच्या दिवसात मला सगळ्या गोष्टी त्यांच्या प्रमाणे करणे अवघड गेले. पण हळूहळू मी त्या मान्य केल्या.

हेही वाचा :  मेकअप प्रोडक्ट्स विकून दिवसाला करोडो रूपये कमावते ही महिला, कधीकाळी 10,000 ची नोकरी करण्याची आली होती वेळ..!

(वाचा :- लग्नानंतरही पुरूष का होतात दुस-या महिलांकडे आकर्षित? अखेर समोर आली 5 धक्कादायक खरी कारणं, पायाखालची जमिन सरकेल )

नवरा झाला बेस्ट फ्रेंड

नवरा झाला बेस्ट फ्रेंड

पुरुषप्रधान घरातील स्त्रियांचे स्थान थोडे वेगळे असते हे नाकारता येत नाही. शिवाय जॉब करत असताना, घर आणि जॉबचा समतोल राखणे खूप कठीण होऊन बसते. माझे हनिमून पर्यंतचे दिवस खूप गोड गेले पण त्यानंतर मात्र घर आणि जॉब हे नक्की सांभाळायचं कसं त्या टेन्शनने माझी झोप उडाली होती. पण मी याबाबतीत स्वत:ला लकी मानते कारण माझ्या पतीने मला या गोष्टीत खुप मदत केली. त्याला माझा जॉब माहित असल्याने प्रत्येक बाबतीत तो माझ्या पाठीशी होता. शेवटी मी एवढचं सांगेन की सासरच्या घरी गेल्यावर तेच मुलीच घर असतं आणि जर पतीची साथ लाभली तर सर्व गोष्टी सोप्प्या होतात.
(वाचा :- सासूही एक वात्सल्याने भरलेली आईच, पण तिने जे विचित्र कृत्य माझ्या बाळासोबत केलं ते बघून डोक्यात तिडीकच गेलीये)​

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha : बारामतीच्या सभेत बोलताना रोहित पवारांना अश्रू अनावर, अजितदादांनी केली नक्कल, म्हणाले ‘आमच्या पठ्ठ्यानं…’

Rohit Pawar burst into tears : येत्या सात मे रोजी होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लोकसभेच्या (Loksabha Election) …

‘मुंबईत गिरगावमध्ये नोकरीची संधी पण मराठी उमेदवार नको’; महिला HR ची संतापजनक पोस्ट

HR LinkedIn Post Related to Marathi People : सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत …