टँकरच्या धडकेने कारचा जागीच झाला कोळसा; 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू

Delhi Accident : दिल्ली-जयपूर महामार्गावर (Delhi Jaipur highway) शुक्रवारी रात्री उशिरा भीषण अपघात झाला. दिल्ली-जयपूर महामार्गावरील गुरुग्राममधील सिद्रावली गावाजवळ शुक्रवारी रात्री तेलाच्या टँकरने कार आणि पिकअप व्हॅनला धडक दिल्याने चार जण ठार झालेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले होते. धक्कादायक बाब म्हणजे अपघातानंतर कारने पेट घेतल्याने चारही जणांचा जळून मृत्यू झाला.

दिल्ली-जयपूर महामार्गावर सिद्रावलीजवळ एका टँकरने कार आणि पिकअप वाहनाला धडक दिली. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे. दिल्ली-जयपूर महामार्गावर तेलाच्या टँकरने दुभाजकाला धडक दिल्याने आणि कार आणि पिकअप व्हॅनला धडकल्याने हा भीषण अपघात घडला आहे. या धडकेनंतर कारने पेट घेतला होता.

 बिलासपूर पोलीस ठाण्याचे तपास अधिकारी विनोद कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, जयपूरहून येणाऱ्या तेलाच्या टँकरने दुभाजक तोडून कारला धडक दिली. आतील प्रवासी बहुधा जयपूरला जात होते. धडक बसल्याने कारमधील सीएनजी सिलेंडरमुळे भीषण आग लागली आणि काही वेळातच संपूर्ण गाडीने पेट घेतला. धडक बसल्यानंतर आग लागल्यामुळे तिन्ही प्रवाशांचा मृत्यू झाला. कारला धडक दिल्यानंतर ऑइल टँकरची महामार्गावरील पिकअप व्हॅनला धडक बसली, त्यामुळे व्हॅन चालकाचा जागीच मृत्यू झाला.

‘दिल्ली-जयपूर महामार्गावर अपघात झाल्याची माहिती आम्हाला मिळाली. आम्ही घटनास्थळी पोहोचलो तेव्हा आम्ही पाहिले की एक कार जळून राख झाली होती आणि तीन लोकांचा मृत्यू झाला होता. नंतर आम्हाला असेही कळले की पिकअप व्हॅनची एका ऑइल टँकरला टक्कर झाली, त्यामुळे व्हॅनचा चालक जागीच मरण पावला. मात्र, ऑइल टँकरचा आरोपी चालक पळून गेला असून त्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे,’ असे तपास अधिकारी विनोद कुमार यांनी सांगितले.

हेही वाचा :  Video: पुण्यात रस्ता ओलांडणाऱ्याला बाईकस्वाराने उडवलं; बाईकस्वाराचा जागीच मृत्यू



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘पत्नीसोबत अनैसर्गिक शरीर संबंध गुन्हा नाही’, कोणत्या प्रकरणात हायकोर्टाने दिला निर्णय?

Unnatural Intercourse: पती पत्नीमध्ये अनेक कारणांवरुन वाद होत असतात. हे वाद टोकाला गेले की कोर्टाची …

पाणीटंचाईमुळे गावातील तरुणांचं लग्न थांबलं, वर्ध्याच्या 8 गावांची 60 वर्षांपासून पाण्यासाठी लढाई

Wardha Drought 8 village : उन्हाळा लागला की पाणी समस्या सगळीकडे बिकट होताना बघायला मिळते. …