बांगलादेशविरुद्धच्या पराभवानंतर रोहित शर्माची मोठी प्रतिक्रिया

IND vs BAN 1st ODI: भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यात रविवारी पहिला एकिदवसीय सामना खेळण्यात आला. या रोमहर्षक सामन्यात भारताला एका विकेट्सनं पराभव स्वीकारावा लागलाय. या पराभवासह भारतीय संघ तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत 1-0 नं पिछाडीवर गेलाय. मेहंदी हसन आणि मुस्तफिजुर रहमान भारताच्या पराभवाला कारणीभूत ठरले. दोघांनी दहाव्या विकेट्ससाठी नाबाद 51 धावांची खेळी करत बांगलादेशला विजय मिळवून दिला. बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यातील पराभवानंतर भारताचा कर्णधार रोहित शर्मानं (Rohit Sharma) मोठी प्रतिक्रिया दिली. “खराब खेळपट्ट्यांवर फिरकीपटूंचा सामना करण्यासाठी फलंदाजीत सुधारणा करण्याची गरज आहे”, असं रोहित शर्मानं म्हटलंय. 

सामन्याच्या प्रजेंटेशन सेरेमनीदरम्यान रोहित शर्मा म्हणाला की,”खेळपट्टी थोडी आव्हानात्मक होती. या खेळपट्टीवर चेंडूला टर्न मिळत होता. फलंदाजी कशी करायची? हे समजून घ्यायला हवे. कोणतंही कारण नकोय. अशा परिस्थितीची आपल्याला सवय झालीय.गोलंदाजांविरुद्ध फलंदाजी कशी करायची? याचा विचार करायला हवा. हे लोक अशा परिस्थितीत खेळून मोठे झाले आहेत. हे सर्व दबाव हाताळण्याबद्दल आहे.”

ट्वीट-

 

हेही वाचा :  'तुमचे 41 राजदूत माघारी बोलवा, अन्यथा...'; भारताचं कॅनडाला जशास तसं उत्तर; ट्रुडो सरकारला जोरदार दणका

रोहित शर्माकडून गोलंदाजांचं कौतूक
कर्णधार रोहित शर्मा मते भारतानं बांगलादेशसमोर ठेवलेलं लक्ष्य कमी पडलं.भारताच्या 30-40 धावा कमी पडल्या. आम्ही केएल राहुल आणि वॉशिंग्टन सुंदर भारताची धावसंख्येत भर घालू शकले असते. पण आम्ही मिडल ओव्हर्समध्ये विकेट गमावले आहेत. ज्यामुळं भारतीय संघाला पुनरागमन करता आलं नाही. पण रोहित शर्मानं गोलंदाजांचं मनभरून कौतूक केलं. हा खूप रोमहर्षक सामना ठरला. आम्ही फलंदाजी चांगली नाही केली.पण गोलंदाजांनी जबरदस्त कामगिरी करत बांगलादेशच्या संघावर दबाव निर्माण केला. 

भारत 1-0 नं पिछाडीवर
पहिल्या एकदिवसीय सामन्यात नाणेफेकीचा कौल बांगलादेशच्या बाजूनं लागला. त्यानंतर बांगलादेशचा कर्णधार शाकीब अल हसननं भारताला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलं. बांगलादेशच्या भेदक गोलंदाजीसमोर भारतीय संघ संघर्ष करताना दिसला. भारतीय संघ निर्धारित 50 षटकात 186 धावांवर ऑलआऊट झाला. या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशच्या संघाचीही दमछाक झाली. मोहम्मद सिराज, कुलदीप सेनच्या भेदक माऱ्यापुढं बांगलादेशच्या संघानं गुडघे टेकले. बांगलादेशनं 136 धावांवर हसन महमूदच्या रुपात नववी विकेट गमावली. परंतु,  मेहंदी हसन आणि मुस्तफिजूर रहमानची महत्वपूर्ण भागिदारी करत बांगलादेशला विजय मिळवून दिला.

हेही वाचा :  अर्जून तेंडुलकरनं सलामीच्या सामन्यात ठोकलं शतक, वडिलांच्या रेकॉर्डशी केली बरोबरी

हे देखील वाचा-



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

विराटचा फोन हरवल्यावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया, झोमॅटोवाले म्हणतात ‘अनुष्काचा फोन वापर’

Virat Kohli Lost Phone tweet : भारतीय संघाचा (Team India) माजी भारतीय कर्णधार विराट कोहली …

IND vs AUS : केएस भरत की ईशान किशन? कोणाला मिळणार प्लेईंग 11 मध्ये जागा?

IND vs AUS, Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना …